शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

Thane: दिल्लीतील शेतकरी माेर्चाला पाठिंबा देण्यासाठी ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे धरणे आंदोलन

By सुरेश लोखंडे | Updated: February 20, 2024 15:08 IST

Thane News: ठाणे येथील राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पंजाब, हरयाणा येथील हजाराे शेतकऱ्यांनी एमएसपीच्या मागणीसाठी संसदेवर काढलेल्या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मंगळवारी धरणे आंदाेलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

- सुरेश लोखंडेठाणे -  येथील राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पंजाब, हरयाणा येथील हजाराे शेतकऱ्यांनी एमएसपीच्या मागणीसाठी संसदेवर काढलेल्या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मंगळवारी धरणे आंदाेलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. यावेळी या आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन दिले.

येथील शासकीय विश्रामगृहासमाेर या कार्यकर्त्यांनी या राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस, आमदार  डाॅ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली हे धरणे आंदाेलन छेडले. या आंदाेलनाचे नेतृत्व या पक्षाच्या ठाणे-पालघर विभागिय महिला अध्यक्षा ऋता आव्हाड आणि ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांनी केले. शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमेवरच अडवून ठेवले आहे. त्यांच्यावर गोळीबार, लाठीचार्ज केला जात आहे. या प्रकाराचा निषेध करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना समर्थन देण्यासाठी या राष्ट्रवादी काँग्रेस ने हे आंदाेलन छेडले. शेतीमालाच्या हमीभावासाठी कायदा बनवावा आणि स्वामिनाथन आयोगाच्या सगळ्या शिफारशी लागू करण्यात याव्या या दोन प्रमुख मागण्या घेऊन उत्तरेकडील राज्यांमधील शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन संसदेवर हा माेर्चा काढला आहे.

संसदेवर माेर्चा घेऊत येत असलेल्या या शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमेवर आढवण्यासाठी केंद्र शासनाने तारांचे कुंपण टाकण्यापासून ते सिमेंट काँक्रीटचं मजबूत कुंपण उभारण्यापर्यंत उपाययोजना केल्या आहेत. आंदोलक शेतकऱ्यांवर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून प्रसंगी ड्रोनचा वापर करून ही कारवाई केली जात आहे. या प्रकाराचा निषेध करण्यासाठी आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्र्टवादीच्या या कार्यकत्यांनी तीव्र आंदाेलन छेडून प्रशासनाचे लक्ष वेधले. या आंदाेलनकर्त्यांनी ‘शेतकऱ्यांवर गोळीबार , आता नाही सहन होणार’, शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा, जगाच्या पोशिंद्याला जगू द्या आदी घाेषणांचे फलक हाती घेऊन केंद्र शासनाच्या या मनमानीचा त्यांनी निषेध केला.

या आंदाेलन महिलांनी माेठ्या संख्येने सहभाग घेतल्याचे निदर्शनात आले. आजच्या या आंदाेलनात येथील राष्र्टवादीचे कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिला कार्याध्यक्ष सुरेखा पाटील, विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल कांबळे , युवती अध्यक्षा पल्लवी जगताप, प्रदेश सेवादल सरचिटणीस तसबीर सिंह,प्रदेश सरचिटणीस कैलास हावळे,विद्यार्थी कार्याध्यक्ष राहु पाटील,ओबीसी सेलचे अध्यक्ष गजानन चौधरी,असंघटित कामगार सेलचे राजु चापले, व्यापारी सेलचे अध्यक्ष दीपक क्षेत्रीय,वैद्यकीय सेलचे अध्यक्ष आसद चाऊस,कार्याध्यक्ष सुभाष यादव, महेंद्र पवार, अंकुश मढवी, रचना वैद्य, एकनाथ जाधव, रोहिदास पाटील, शिवा कालूसिंह, संजीव दत्ता, विशाल खामकर, पप्पू अस्थाना, सुरेंद्र यादव, इकबाल शेख, स्वरूप सिंग, वैभव खोत, हरपाल सिंग, संतोष मोरे, कुणाल भोईर आदी कार्यकर्ते माेठ्या संख्येने सहभागी झाले हाेते.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनthaneठाणे