शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

ठाणे महापालिकेचा आरक्षित जागांवर डल्ला ? ढीगभर प्रस्ताव : पाच (२) (२)नंतर आता ३५ (१) नियमाची पळवाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 02:11 IST

ठाणे महापालिकेच्या महासभेत यापुढे पटलावर पाच (२) (२) चे विषय मंजुरीसाठी घेतले जाणार नसल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ठाणे महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

ठाणे : ठाणे महापालिकेच्या महासभेत यापुढे पटलावर पाच (२) (२) चे विषय मंजुरीसाठी घेतले जाणार नसल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ठाणे महापालिका प्रशासनाने घेतला आहे. परंतु, आता यातून पळवाट काढण्यासाठी ३५ (१) अन्वये शहरातील अनेक आरक्षित भूखंडांचे आरक्षणबदलाचे विषय मंजुरीसाठी आणले आहेत. यामुळे प्रशासनाच्या या कारस्थानाविरोधात आता महासभेत या विषयांवरूनदेखील लोकप्रतिनिधी आक्रमक होण्याची शक्यता आहे.ठाणे महापालिकेच्या माध्यमातून पाच (२) (२) चे विषय पटलावर आणले जात होते. मागील तीन महिन्यांत अशा प्रकारे दोनशेहून अधिक विषय मंजूरदेखील झाले. परंतु, या विषयांमध्ये काही विषय जे अत्यावश्यक नसतानादेखील ते या सदराखाली मंजूर केल्याचा आक्षेप घेऊन शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती यांनी थेट न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर, हे प्रकरण चांगलेच तापले होते. अखेर, पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी यापुढे कोणतीही प्रकरणे पाच (२) (२) खाली आणली जाणार असून प्रत्येक प्रकरणाच्या निविदा काढून त्यानंतरच कामे केली जातील, असे स्पष्ट केले होते. त्यानुसार, या महासभेत तशा आशयाचे एकही विषय पटलावर घेण्यात आलेले नाहीत. परंतु, आता दुसरीकडे ३५ (१) चे विषय आता एकामागून एक पटलावर घेतले आहेत. त्यामुळे पाच (२) (२) मधून ही पळवाट तर पालिकेने शोधली नसेल ना, अशी शंका आता उपस्थित झाली आहे. ३५ (१) म्हणजे झालेली कामे असा अर्थ घेतला जातो. परंतु, स्थायी गठीत नसल्याने हे विषय आता महासभेच्या पटलावर घेतले जात आहेत. परंतु, पूर्वीचा अनुभव पाहता महासभेत हे विषय घेतले गेले, तर त्याबाबतही आक्षेप उपस्थित होऊ शकतात, असा कयास आहे. अशा प्रकारे हे विषय आताच पटलावर आणण्याची गरज काय? असा सवाल काही लोकप्रतिनिधींनी उपस्थित केला असून आता हीच मंडळी या विषयांविरोधात महासभेत आवाज उठवण्यासाठी सज्ज झाले आहेत.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका