शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2024 13:32 IST

Loksabha Election - ठाणे, पालघरसह महायुतीचे चारही उमेदवार जिंकून येतील असा विश्वास मनसे नेते अविनाश जाधव यांनी व्यक्त केला. 

ठाणे - Avinash Jadhav on Naresh Mhaske ( Marathi News ) लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून शिवसेनेचे नरेश म्हस्के यांना ठाण्यातून उमेदवारी घोषित झाली आहे. या उमेदवारीनंतर मनसेची पहिली प्रतिक्रिया आली असून येणाऱ्या ४ जूनला महायुतीचं सरकार या देशात असेल असा विश्वास व्यक्त करत ठाण्यात नरेश म्हस्के यांचा विजय होईल असा विश्वास मनसे नेते अविनाश जाधव यांनी व्यक्त केला आहे.

मनसे नेते अविनाश जाधव म्हणाले की, नरेश म्हस्के यांचा विजय खूप सोपा आहे. भाजपाचे नगरसेवक, मुख्यमंत्र्यांचे वर्चस्व असलेला हा भाग आहे. मागील १० वर्षाचा राजन विचारेंचा कार्यकाळ पाहिला तर मागच्या २ वर्षात ते दिसायला लागले, पहिले ८ वर्ष आम्हाला खासदार शोधावे लागत होते. त्यामुळे ही लढाई कठीण असेल असं वाटत नाही. मनसेची २ लाख मते या मतदारसंघात आहेत. मागच्या विधानसभेची आकडेवारी पाहिली तर २ लाखाच्या आसपास मनसेचं मतदान आहे. त्यामुळे मनसेच्या मतांवर नरेश म्हस्के ठाण्यातून निवडून येतील असं त्यांनी म्हटलं.

तसेच प्रचार किती केला हे महत्त्वाचे नाही, अनेकजण २ वर्ष प्रचार करूनही पडतात. तुल्यबळ काय हे आपण पाहिले पाहिजे. ठाण्यात भाजपा-शिवसेना प्रचंड ताकदीने आहे. त्यासोबत मनसेची २ लाख मते ही महायुतीच्या बाजूने आहेत. त्यामुळे ठाण्यातील विजय एकतर्फी वाटतो असंही मनसे नेते अविनाश जाधव यांनी सांगितले.

दरम्यान, पालघरच्या बाबतीत लवकर निर्णय झाला पाहिजे, इतर पक्षांनी त्यांचे उमेदवार जाहीर केलेत, तिथल्या स्थानिक शिवसेनेच्या खासदारांवर लोकांची नाराजी आहे. परंतु याबाबत आज निर्णय होईल. पालघरमध्ये जो कुणी महायुतीचा उमेदवार असेल त्याच्यासोबत मनसे काम करेल. भाजपा-शिवसेना-मनसे हे ताकदीने पालघरमध्ये प्रचारात उतरणार आहेत. ठाणे, पालघर जिल्ह्यातील चारही जागा महायुती जिंकेल असा दावाही मनसे नेते अविनाश जाधव यांनी केला. 

टॅग्स :Avinash Jadhavअविनाश जाधवnaresh mhaskeनरेश म्हस्केrajan vichareराजन विचारेthane-pcठाणेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४