शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे, कल्याण मतदारसंघ : निवडणूक मैदानात चारचौघी लढल्या अन पडल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 03:53 IST

जुन्या ठाणे लोकसभा मतदारसंघाचे आता तीन मतदारसंघ झाले आहेत. आतापर्यंत झालेल्या लोकसभा निवडणुकीत चार महिलांना लढण्याची संधी मिळाली होती. परंतु त्या पराभूत झाल्या.

- अजित मांडकेठाणे - जुन्या ठाणे लोकसभा मतदारसंघाचे आता तीन मतदारसंघ झाले आहेत. आतापर्यंत झालेल्या लोकसभा निवडणुकीत चार महिलांना लढण्याची संधी मिळाली होती. परंतु त्या पराभूत झाल्या. त्यापैकी एका महिलेला समाजवादी पार्टीने उमेदवारी दिली होती तर २००९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत कल्याणमधून मनसेने एका महिलेला संधी दिली होती. २०१४ च्या निवडणुकीत कल्याण लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून दोन महिला लढल्या होत्या.ठाणे लोकसभा मतदारसंघाला इतिहास आहे. या मतदारसंघाची धुरा सांभाळत असतानाच १९९८ च्या निवडणुकीत तत्कालीन खासदार प्रकाश परांजपे यांच्या समोर तत्कालीन लोकशाही आघाडीचा घटक पक्ष असलेल्या समाजवादी पार्टीने चंद्रिका केनिया यांना उमेदवारी दिली होती. स्थानिक उमेदवार म्हणून राजाराम साळवी यांना डावलून केनिया यांना उमेदवारी दिल्याने पहिल्यांदाच एका महिलेला निवडणूक लढवण्याची संधी प्राप्त झाली होती. ‘दिल्ली मे सोनिया आणि ठाणे मे केनिया’, अशी त्या निवडणुकीत केनिया यांची घोषणा होती. त्यामुळे या निवडणुकीत त्या काही तरी कमाल करतील अशी शक्यता वाटत होती. परंतु कॉंग्रेसने समाजवादीला दिलेल्या या संधीचा फायदा घेता आला नाही. उलट केनिया यांची उमेदवारी शिवसेनेचे प्रकाश परांजपे यांच्या पथ्यावरच पडली. तब्बल दोन लाख ४९ हजार ५८९ (५,५३,२१०) मतांची आघाडी घेवून परांजपे पुन्हा दणदणीत विजयी झाले. केनिया यांना तीन लाख तीन हजार ६३१ मते मिळूनही पराभव पत्करावा लागला. बहुजन समाज पार्टीचे उमेदवार अ‍ॅड. राहुल हुमणे यांना (२४,७०५) तिसऱ्या क्रमांकाची तर अरूण गवळी संस्थापक अध्यक्ष असलेल्या अखिल भारतीय सेनेचे उमेदवार शरद वासुदेव नाईक यांना (११,६७३) चौथ्या क्रमांकाची मते मिळाली होती. नॅशलन पँथर पार्टी, इंडियन युथ मुस्लीम लीग या राजकीय पक्षांसह दहा अपक्ष उमेदवार १९९८च्या निवडणूक रिंगणात होते. परंतु त्यानंतर केनिया यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करुन विधानसभा निवडणूक लढविली आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही भुषवले होते. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करुन २००१-२००२ च्या सुमारास राज्यसभेत प्रवेश केला होता.या निवडणुकीनंतर सुमारे १३ महिन्यांच्या कालावधीत केंद्रातील भाजपा सरकार पडले आणि परांजपे यांना १९९९ च्या निवडणुकीला तोंड द्यावे लागले. वर्ष दोन वर्षाने निवडणुका लादल्या गेलेल्या असतानाही गतवेळी मतदारांच्या पसंतीला उतरलेले परांजपे यांची उमेदवारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कायम ठेवली. परंतु कॉंग्रेसने ही जागा पुन्हा आपल्याकडे घेतली. त्यामुळे चंद्रीका केनिया यांना पुन्हा संधी मिळाली नाही.दरम्यान, ठाणे लोकसभा मतदार संघाची पुनर्रचना करण्यात आली. त्यानंतर वेगळ्या झालेल्या कल्याण लोकसभा मतदारसंघात २००९ मध्ये शिवसेना विरुध्द राष्टÑवादी आणि मनसे असा सामना रंगला. या निवडणुकीत शिवसेनेकडून प्रकाश परांजपे यांचे पुत्र आनंद परांजपे यांनी, तर राष्टÑवादीकडून वसंत डावखरे यांनी ही निवडणूक लढवली.२00९ मध्ये मनसेने प्रथमच लोकसभा निवडणूक लढवली आणि वैशाली दरेकर यांना संधी दिली. एक कणखर नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती. महिला असूनही त्यांनी पुरूष पुढाऱ्यांना टक्कर देत आंदोलनांच्या माध्यमातूनही एक वेगळा ठसा उमटवला होता. त्यामुळेच मनसेने त्यांच्यावर विश्वास टाकला होता.या नव्या मतदारसंघात पहिल्यांदाच एका महिलेचा सामना १३ पुरुष उमेदवारांशी झाला होता. अशा स्थितीतही त्यांनी तिसºया क्रमांकाची मते मिळवली होती. दरेकर यांना १ लाख २ हजार ६३ मते मिळाली होती. २०१४ मध्ये कल्याण लोकसभेत रिपब्लिकन बहुजन सेनेच्या वतीने सुलोचना सोनकांबळे रिंगणात होत्या.सोनकांबळे यांना १ हजार २२९ मते मिळाली. यावेळी अपक्ष म्हणून अस्मिता पुराणिक यांनीही निवडणूक लढवली होती. त्यांना १ हजार २४३ मते मिळाली. लोकसभा मतदारसंघ पुनर्रचेनंतर वेगळ्या झालेल्या भिवंडी लोकसभा मतदारसंघात मागील दोनही निवडणुकीत महिलांना संधी मिळालेली नाही.

टॅग्स :Electionनिवडणूक