शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

Thane: ठाणे जिल्ह्याला आनंदाची बातमी; बारवी धरण १०० टक्के भरले

By पंकज पाटील | Updated: August 11, 2022 19:40 IST

Baravi Dam: संपूर्ण ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणार्‍या बारवी धरणाने यंदा ठाणे जिल्ह्याला दिलासा दिला आहे. धरणाची उंची वाढल्यानंतर पहिल्यांदाच 15 ऑगस्ट च्या आधी हे धरण भरले आहे.

- पंकज पाटीलबदलापूर - संपूर्ण ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणार्‍या बारवी धरणाने यंदा ठाणे जिल्ह्याला दिलासा दिला आहे. धरणाची उंची वाढल्यानंतर पहिल्यांदाच 15 ऑगस्ट च्या आधी हे धरण भरले आहे. 11 पैकी धरणाचे आठ स्वयंचलित दरवाजे उघडले आहे. संपूर्ण ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारे बारवी धरण शंभर टक्के भरले असून गुरुवारी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान धरणाच्या अकरा दरवाजे पैकी आठ दरवाजे उघडले गेले आहेत. हे सर्व दरवाजे स्वयंचलित असल्यामुळे धरणात पाण्याचा साठा वाढल्यास या धरणाचे सर्वच्या सर्व अकरा दरवाजे उघडले जाणार आहेत. धरण भरल्याने आता धरणात 334 दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा निर्माण झाला आहे.

यंदा धरण क्षेत्रात एकूण एक हजार 752 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी 11 ऑगस्ट रोजी धरण अवघे 82 टक्के भरले होते. गेल्यावर्षी हे धरण सहा सप्टेंबर रोजी १०० टक्के भरले होते. मात्र यंदा 11 ऑगस्टलाच धरण भरल्याने संपूर्ण ठाणे जिल्ह्यावरील पाणी संकट संपुष्टात आले आहे. अंबरनाथ तालुक्यातील बारवी धरणातून ठाणे महानगरपालिका, ठाणे जिल्ह्यातील संपूर्ण एमआयडीसी क्षेत्र, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, उल्हासनगर, मीरा-भाईंदर, भिवंडी, नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील काही ग्रामीण भागांना देखील पाणी पुरवठा केला जातो. धरण क्षेत्रात जोरदार पाऊस पडत असल्याने बारवी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता असल्यामुळे बारावी नदीकिनारी असलेल्या सर्व गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच उल्हास नदीच्या पात्रात देखील वाढ झाल्याने आता बारवी धरणातील पाणी देखील थेट उल्हास नदीत जाणार असल्याने उल्हास नदीच्या किनारी असलेल्या गावांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अवघ्या दहा तासात दोन टक्के पाणीसाठा वाढलागुरुवारी सकाळी धरणाच्या पाण्याची पातळी तपासली असता सकाळी धरण 98 टक्के भरले होते. सायंकाळी पाच वाजता हे धरण भरून वाहू लागल्याने अवघ्या दहा तासात धरणातील दोन टक्के पाणीसाठा वाढला आहे. बारवी धरणाला जोडल्या लहान-मोठे ओढे भरून वाहत असल्याने हे धरण यंदा लवकर भरले आहे.  

टॅग्स :DamधरणWaterपाणीthaneठाणे