शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात तीन दिवस पाणीबाणी; सर्वाधिक फटका घोडबंदरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 05:11 IST

भातसा धरणात तांत्रिक बिघाड : शुक्रवार, शनिवारी कमी दाबाने पुरवठा

ठाणे : भातसा धरणाच्या झडपा उघडण्यात काही तांत्रिक बिघाड झाल्याने ठाणे शहराचा पाणीपुरवठा बुधवारपासून बंद झाला आहे. याचा सर्वाधिक फटका हा घोडबंदर भागाला बसला असून त्या खालोखाल कोपरी, टेकडी बंगला, अंबिकानगर आदी पसिराचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. परंतु, आता दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याने कमी दाबाने पाणीपुरवठा सुरूकरण्यात येणार आहे. असे असले तरी १४ जूनपर्यंत शहराला कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. त्यामुळे ठाण्याला गुरूवारी ६० टक्के पाणीकपातीचा फटका बसला आहे.

ठाणे आणि मुंबईला भातसा धरणातून पाणीपुरवठा होत आहे. ११ जून रोजी दुपारी या धरणाच्या झडपा उघडण्यात काही तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा करणारे २८ आणि ठाणे शहराला पाणीपुरवठा करणारे ४ ही पंप बंद पडले होते. अखेर १२ जून रोजी सकाळी १० वाजता हा तांत्रिक बिघाड दुरुस्त झाला असून पाणी उचलण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाल्याची माहिती पालिकेने दिली. परंतु, भातसापासून पिसेपर्यंत पाणी उचलण्यात येत असून हे १६ किमीचे अंतर आहे. त्यामुळे या १६ किमीच्या कॅनालमध्ये खडखडाट झाला होता. नंतर जेव्हा पाणीपुरवठा सुरू झाला, तेव्हा या कॅनालमधून पाणी पिसेपर्यंत जाण्यात अडचणी निर्माण होऊन त्याचा फटका ठाणे शहराच्या पाणीपुरवठ्यावर झाला. या कॅनालमध्ये पाणी सुरुवातीला न आल्याने ते सुकले होते. त्यातच त्यामध्ये प्रचंड प्रमाणात गाळ असल्यामुळे येथून पुढे पाणी जाईपर्यंत अडथळे निर्माण झाले होते. या अडथळ्यांमुळे मुंबईने पाणी उचलण्यासाठी आपला प्रेशर ६५ वरून ३५ वर आणला होता. तर ठाणे महापालिकेला मात्र शून्य प्रेशर मिळाला. मुंबईचे २८ पैकी सुरुवातीला १५ पंप सुरू होते. तर ठाणे महापालिकेचा केवळ १ पंप सुरू होता. त्यामुळे ठाण्याला मात्र ६० टक्के फटका बसल्याची माहिती पालिकेने दिली. ठाणे महापालिका बीएमसीकडून ६० एमएलडी पाणी उचलत असल्याने त्याचाही फटका ठाण्यालाच अधिक बसल्याचे दिसून आले. त्यामुळे ठाण्यातील अनेक भागांत पाण्याचा खडखडाट होता. घोडबंदर भागाला याचा सर्वाधिक फटका बसला असून बुधवारी सायंकाळपासून या भागाचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. शहरातील कोपरी,अंबिकानगर, टेकडी बंगला याशिवाय उंचावरील भागांनाही याचा अधिक फटका बसला आहे.टँकरची संख्या वाढली दुपटीनेच्ज्या ज्या भागांना पाणी नाही, त्या भागात पालिकेच्या माध्यमातून २५ टँकरेद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. परंतु, रोज होणाऱ्या मागणीमध्ये दुप्पट वाढ झाल्याचे दिसून आले.च्शुक्रवार आणि शनिवारीही कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागणार आहे.तांत्रिक बिघाडामुळे पाणीपुरवठा खंडित झाल्यानंतर भातसा ते पिसेर्पयतच्या कॅनालमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याचे निदर्शनास आले. नंतर पाणीपुरवठा सुरुळीत व्हावा म्हणून ठाणे महापालिकेने या कॅनालमधील गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले.इंदिरानगरमध्ये हाल : इंदिरानगर भागात आधीच ९ आणि १० जून रोजी एमएसईबीच्या वीज वितरण व्यवस्थेत बिघाड झाल्याने पाणीकपातीचा सामना येथील रहिवाशांना करावा लागत होता. त्यात आता पुन्हा येथील रहिवाशांना १४ जून पर्यंत पाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.आजचा शटडाऊन रद्द : तांत्रिक दुरुस्तीमुळे पाणीपुरवठा बंद झाल्याने ठाणेकरांचे आधीच हाल झाले आहेत. त्यामुळे शुक्रवारी ठाणे महापालिकेच्या वतीने घेण्यात येणारा शटडाऊन तूर्तास रद्द केला आहे.

टॅग्स :thaneठाणेWaterपाणी