शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
2
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
3
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
4
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
5
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 
6
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
7
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
8
रणथंबोरची राणी, मगरींच्या शिकारीसाठी प्रसिद्ध; 'अ‍ॅरोहेड'ने घेतला अखेरचा श्वास...
9
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
10
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
11
जगाच्या नकाशावर नाहीसा होऊ लागलाय 'हा' सुंदर देश; शास्त्रज्ञांनाही फुटलाय घाम!
12
युद्धातही श्रीमंतीचा डंका! इस्रायलची सर्वात श्रीमंत महिला चर्चेत! कसं उभं केलं ५.१६ लाख कोटींचं साम्राज्य?
13
तीन वेळा पतीचा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
14
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
15
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड मारली, आता 'चावी' इराणकडे!
16
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
17
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
18
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
19
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
20
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...

ठाण्यात तीन दिवस पाणीबाणी; सर्वाधिक फटका घोडबंदरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 05:11 IST

भातसा धरणात तांत्रिक बिघाड : शुक्रवार, शनिवारी कमी दाबाने पुरवठा

ठाणे : भातसा धरणाच्या झडपा उघडण्यात काही तांत्रिक बिघाड झाल्याने ठाणे शहराचा पाणीपुरवठा बुधवारपासून बंद झाला आहे. याचा सर्वाधिक फटका हा घोडबंदर भागाला बसला असून त्या खालोखाल कोपरी, टेकडी बंगला, अंबिकानगर आदी पसिराचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. परंतु, आता दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याने कमी दाबाने पाणीपुरवठा सुरूकरण्यात येणार आहे. असे असले तरी १४ जूनपर्यंत शहराला कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. त्यामुळे ठाण्याला गुरूवारी ६० टक्के पाणीकपातीचा फटका बसला आहे.

ठाणे आणि मुंबईला भातसा धरणातून पाणीपुरवठा होत आहे. ११ जून रोजी दुपारी या धरणाच्या झडपा उघडण्यात काही तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा करणारे २८ आणि ठाणे शहराला पाणीपुरवठा करणारे ४ ही पंप बंद पडले होते. अखेर १२ जून रोजी सकाळी १० वाजता हा तांत्रिक बिघाड दुरुस्त झाला असून पाणी उचलण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाल्याची माहिती पालिकेने दिली. परंतु, भातसापासून पिसेपर्यंत पाणी उचलण्यात येत असून हे १६ किमीचे अंतर आहे. त्यामुळे या १६ किमीच्या कॅनालमध्ये खडखडाट झाला होता. नंतर जेव्हा पाणीपुरवठा सुरू झाला, तेव्हा या कॅनालमधून पाणी पिसेपर्यंत जाण्यात अडचणी निर्माण होऊन त्याचा फटका ठाणे शहराच्या पाणीपुरवठ्यावर झाला. या कॅनालमध्ये पाणी सुरुवातीला न आल्याने ते सुकले होते. त्यातच त्यामध्ये प्रचंड प्रमाणात गाळ असल्यामुळे येथून पुढे पाणी जाईपर्यंत अडथळे निर्माण झाले होते. या अडथळ्यांमुळे मुंबईने पाणी उचलण्यासाठी आपला प्रेशर ६५ वरून ३५ वर आणला होता. तर ठाणे महापालिकेला मात्र शून्य प्रेशर मिळाला. मुंबईचे २८ पैकी सुरुवातीला १५ पंप सुरू होते. तर ठाणे महापालिकेचा केवळ १ पंप सुरू होता. त्यामुळे ठाण्याला मात्र ६० टक्के फटका बसल्याची माहिती पालिकेने दिली. ठाणे महापालिका बीएमसीकडून ६० एमएलडी पाणी उचलत असल्याने त्याचाही फटका ठाण्यालाच अधिक बसल्याचे दिसून आले. त्यामुळे ठाण्यातील अनेक भागांत पाण्याचा खडखडाट होता. घोडबंदर भागाला याचा सर्वाधिक फटका बसला असून बुधवारी सायंकाळपासून या भागाचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. शहरातील कोपरी,अंबिकानगर, टेकडी बंगला याशिवाय उंचावरील भागांनाही याचा अधिक फटका बसला आहे.टँकरची संख्या वाढली दुपटीनेच्ज्या ज्या भागांना पाणी नाही, त्या भागात पालिकेच्या माध्यमातून २५ टँकरेद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता. परंतु, रोज होणाऱ्या मागणीमध्ये दुप्पट वाढ झाल्याचे दिसून आले.च्शुक्रवार आणि शनिवारीही कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागणार आहे.तांत्रिक बिघाडामुळे पाणीपुरवठा खंडित झाल्यानंतर भातसा ते पिसेर्पयतच्या कॅनालमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याचे निदर्शनास आले. नंतर पाणीपुरवठा सुरुळीत व्हावा म्हणून ठाणे महापालिकेने या कॅनालमधील गाळ काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले.इंदिरानगरमध्ये हाल : इंदिरानगर भागात आधीच ९ आणि १० जून रोजी एमएसईबीच्या वीज वितरण व्यवस्थेत बिघाड झाल्याने पाणीकपातीचा सामना येथील रहिवाशांना करावा लागत होता. त्यात आता पुन्हा येथील रहिवाशांना १४ जून पर्यंत पाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.आजचा शटडाऊन रद्द : तांत्रिक दुरुस्तीमुळे पाणीपुरवठा बंद झाल्याने ठाणेकरांचे आधीच हाल झाले आहेत. त्यामुळे शुक्रवारी ठाणे महापालिकेच्या वतीने घेण्यात येणारा शटडाऊन तूर्तास रद्द केला आहे.

टॅग्स :thaneठाणेWaterपाणी