शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

ठाणेच्या गारेगार शिवशाहीने महापालिकांच्या परिवहन सेवांना फोडला घाम गारेगार

By सुरेश लोखंडे | Updated: January 25, 2018 19:56 IST

ठाणे-बोरिवली या मार्गावरील घोडबंदरचा हा परिसर उच्चभू्र लोकवस्तीचा आहे. मुंबईला जाण्यासाठी किंवा ठाणे गाठण्यासाठी कमी तिकीट असलेल्या या वातानुकूलित शिवशाहीला प्रवाशांची अधिक पसंती मिळणे सहज शक्य आहे. सध्या या मार्गावर सहा शिवशाही बस धावत आहेत.

ठळक मुद्दे* निम्म्या भाड्यासह पुशबॅक सीट अन् वायफायची सुविधाही मोफत * महापालिकां परिवहनसह खाजगी बसेसचा होणार तोटाआरक्षणकर कमी केल्यामुळे ५८ ऐवजी केवळ ४८ रुपये तिकीटठाणे विभागासाठी पुन्हा गुरुवारी सहा बस मिळाल्या

सुरेश लोखंडे

ठाणे : अवघे ४८ रुपये भाडे असलेली शिवशाही वातानुकूलित बस ठाणे ते बोरिवली या मार्गावर नुकतीच सुरू झाली आहे. महापालिकांच्या परिवहन सेवेसह खाजगी संस्थांच्या वातानुकूलित बसच्या तिकिटापेक्षा ५० टक्के कमी भाडे असलेल्या सुमारे १२ शिवशाही बस या मार्गावर धावत आहेत. कमी तिकीटदरामुळे अन्य सर्वच प्रकारच्या बस चालवणा-या संस्थांना यामुळे घाम फुटला आहे. त्यामुळे आपल्या सेवा तोट्यात जाऊ नये, यासाठी त्यांनाही शिवशाहीच्या तुलनेत भाडे करावे लागणार आहे.ठाणे-बोरिवली या मार्गावरील घोडबंदरचा हा परिसर उच्चभू्र लोकवस्तीचा आहे. मुंबईला जाण्यासाठी किंवा ठाणे गाठण्यासाठी कमी तिकीट असलेल्या या वातानुकूलित शिवशाहीला प्रवाशांची अधिक पसंती मिळणे सहज शक्य आहे. सध्या या मार्गावर सहा शिवशाही बस धावत आहेत. एसटी महामंडळाच्या मालकीच्या या बस असून ठाणे विभागासाठी पुन्हा गुरुवारी सहा बस मिळाल्या आहेत. या सर्व म्हणजे १२ बस ठाणे-बोरिवली यादरम्यान धावणार आहेत. ठाणे स्टेशनहून सुटणा-या या बस दिवसभरात १४४ फे-या करणार असल्याचे एसटी महामंडळाच्या ठाणे विभागीय वाहतूक नियंत्रक आर.एच. बांदल यांनी लोकमतला सांगितले.ठाणे ते बोरिवली या मार्गवर सद्य:स्थितीला साध्या चार बस धावत बसून त्या २४ फे-या करत आहेत. या बसचे तिकीट ३३ रुपये आहे, तर निमआराम म्हणजे हिरकणी बसच्या ३६ फे-या होत असून त्यांचे तिकीट ४४ रुपये आहे. तर, सध्या धावत असलेल्या सहा शिवशाहीच्या बसमध्ये पुन्हा सहा बसची भर पडून सुमारे १२ बस या मार्गावर धावणार असून केवळ त्या केवळ ४८ रुपये भाडे आकारत आहेत. आधी त्यांचे तिकीट ५८ रुपये असल्याचे सांगितले जात होते. पण, ते आता ४८ रुपये झाले आहे. या तिकिटावरील १० रुपये आरक्षणकर कमी केल्यामुळे ५८ ऐवजी केवळ ४८ रुपये तिकीट या वातानुकूलित शिवशाहीचे करण्यात आले आहे. या नव्या करकरीत १२ बस या मार्गावर सोडण्याचे नियोजन केल्यामुळे निमआराम म्हणजे हिरकणी बस बंद करण्यात येणार आहेत.*शिवशाहीत सीसीटीव्हीसह मोफत वायफायसंपूर्ण वातानुकूलित असलेल्या या शिवशाहीमध्ये ४४ सीट आहेत. यामध्ये सध्या एलसीडी स्क्रीनची कमी असली तरी पुशबॅक सीट, फायर डिटेक्शन संपे्रशन, मोबाइल चार्जिंग सुविधा, सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, वायफाय सेवा व जीपीएस सुविधा असलेल्या या बसच्या प्रवासाकरिता चार व सात दिवसांच्या पासचीदेखील सुविधा आहे. या सोयीसुविधा पूर्ण असलेल्या या बसमध्ये कंडक्टर मात्र नाही. केवळ ४८ रुपये तिकीटदर असलेल्या या शिवशाहीच्या तुलनेत अन्य बसचे तिकीटदर जास्त आहेत. यामध्ये नवी मुंबई महापालिकेच्या एनएमएमटीचा दर ९५ रुपये असून टीएमटीचा ८५ रुपये आहे. बेस्टची प्रवासी सेवा बंद झाली आहे. त्याही ८० रुपये तिकीट आकारत होत्या.महापालिकांच्या या वातानुकूलित परिवहन सेवेप्रमाणेच खाजगी व्होल्वोसाठी १७०, तर उबेरदेखील १९० रुपये भाडे आकारत आहे. यापेक्षा शिवशाहीचा तिकीटदर सुमारे ५० टककयांपेक्षा कमी असल्याचा दावा बांदल यांनी केला आहे. शिवशाही या बस प्रासंगिक करारासाठीदेखील दिल्या जाणार आहेत. लग्न समारंभासाठीही त्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. कमीतकमी ३५० किमीच्या प्रवासाकरिता या शिवशाही बस प्रासंगिक करारावर भाड्याने दिल्या जाणार आहेत. यासाठी दोन्ही बाजूंच्या सेवेसाठी सुमारे ५४ रुपये किलोमीटर, तर एका बाजूच्या सेवेसाठी ९४ रुपये किमी भाडे आकारले जाणार असल्याचे बांदल यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेcollectorतहसीलदार