शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं, गौरीकुंडजवळ अपघात; सात जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
6
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
7
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
8
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
9
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
10
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
11
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
12
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
13
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
14
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
15
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
16
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
17
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
18
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
19
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
20
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा

ठाणे ते दिवा रेल्वेमार्गाच्या दोन्ही बाजूचे रूपडे पालटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2017 16:35 IST

ठाणे - दोन्ही बाजूला इतस्ततः पडलेला कचरा, डोळ्यांत भिनणारे बकालपण, पडिक भिंतीवरील अवाचनीय संदेश. साधारणतः रेल्वे ट्रॅकच्या दोन्ही बाजूला दिसणारे हे चित्र.

ठाणे - दोन्ही बाजूला इतस्ततः पडलेला कचरा, डोळ्यांत भिनणारे बकालपण, पडिक भिंतीवरील अवाचनीय संदेश. साधारणतः रेल्वे ट्रॅकच्या दोन्ही बाजूला दिसणारे हे चित्र. पण हे चित्र आता बदलणार आहे. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आज ठाणे ते दिवा आणि दिवा ते ठाणे असा चक्क रेल्वेने प्रवास करून रेल्वेच्या दुतर्फा असलेला कचरा साफ करून तिथे रंगरंगोटी आणि पेंट दि वॉल मोहीम राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे, अशा पद्धतीने राबविण्यात येणारा भारतातील हा पहिलाच प्रयोग असणार आहे.आज दुपारी दीडच्या सुमारास जयस्वाल यांनी महापालिकेचे अधिकारी, नगरसेवक पूर्वेश सरनाईक, मुंबईच्या प्रसिद्ध लँडस्केप डिझायनर रुबल नागी, प्रसिद्ध चित्रकार किशोर नादावडेकर, वास्तुविशारद प्रवीण जाधव, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते बदलापूर ही लोकल ठाण्यात पकडून दिवा स्थानकापर्यंत प्रवास केला.या लोकल प्रवासात त्यांनी रेल्वे ट्रॅकच्या दोन्ही बाजूला पडलेला कचरा साफ करणे, झोपडपट्टयाच्या बाजूला पडलेला कचरा उचलणे, तिथे रंगरंगोटी करणे, त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी संरक्षक भिंती आहेत त्या ठिकाणी पेंट दी सिटी वॉल या मोहिमेच्या धर्तीवर विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय जयस्वाल यांनी घेतला आहे.यावेळी बोलताना जयस्वाल म्हणाले की, इंडोनेशियामधील कँगपूंग पीलंग, पोलंडमध्ये झलिपी, स्पेनमध्ये जुझकार, ब्राझिलमध्ये रियो आणि मेक्सिकोमधील पचुकास लास पल्मितास या गावांची संपूर्ण रंगरंगोटी करून त्या गावांना आकर्षक बनविण्यात आले आहे. त्याच धर्तीवर पेंट दि सिटी वॉल या मोहिमेच्या दुस-या टप्प्यात ठाणे, कळवा, मुंब्रा आणि दिवा या स्थानकांदरम्यान आकर्षक रंगरंगोटी करण्यात येणार आहे. जेणेकरून ठाणे ते दिवा आणि दिवा ते ठाणे असा प्रवास करणा-या प्रवाशांना प्रसन्नता वाटेल. याच धर्तीवर रूपादेवी पाड्याचा विकास करणार असल्याचेही जयस्वाल यांनी स्पष्ट केले.या महत्वाकांक्षी योजनेसाठी सर्वेक्षण करून संकल्पचित्र आणि कृती आराखडा एका महिन्यात तयार करून काम सुरू करणार असल्याचे सांगून जयस्वाल यांनी या नवीन मोहिमेमुळे ठाणे ते दिवा या रेल्वेच्या दोन्ही बाजूचे आजचे जे रूप आहे ते नक्कीच बदलेल, अशी आशा व्यक्त केली.

टॅग्स :thaneठाणे