शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

"उद्धवजी, गणेशोत्सवाबद्दलची ठोस भूमिका जाहीर करून मार्ग मोकळा करा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 13:33 IST

ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय समितीचे मुख्यमंत्र्यांना पत्र

ठाणे: आगामी गणेशोत्सवाबाबत राज्य सरकारने आपली ठोस भूमिका जाहीर करावी आणि उत्सवांचा मार्ग मोकळा करावा अशी मागणी महाराष्ट्रातील तमाम गणेशोत्सव मंडळांनी व मूर्तिकारांनी केली आहे. याबाबत ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय समितीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तसे पत्र लिहिले आहे. मागील वर्षाची कोरोना परिस्थिती व या वर्षाची परिस्थिती यामध्ये खूप फरक पडला आहे. यावर्षी लस उपलब्ध झाली आहे. किमान २५% लसीकरण झालेले आहे व राहिलेले ७५% लसीकरण पुढील काही महिन्यात प्रशासन आपल्या नेतृत्वाखाली यशस्वीरित्या पूर्ण करेल. मागील वर्षी गणेशोत्सवाबाबत निर्णय हा खूप उशिरा घेतल्यामुळे मूर्तिकारांचे खूप मोठे नुकसान झाले होते व गणेशोत्सव मंडळांनादेखील खूप त्रास सहन करावा लागला होता. तरी देखील सर्व प्रशासनाच्या मागे खंबीरपणे उभे राहिलो होते असे समितीने या पत्रात म्हटले आहे.यावर्षी आपण संपूर्ण मंडळांना विश्वासात घ्याल व मागील वर्षाची बंधने तसेच मूर्तीच्या उंची बाबत असलेली बंधने हटवून हा उत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यास आम्हाला संपूर्ण सहकार्य कराल असा आम्हाला विश्वास आहे असे समितीचे अध्यक्ष समीर सावंत यांनी म्हटले आहे. सर्व गणेशोत्सव मंडळे प्रशासनाला सहकार्य करत आली आहेत आणि पुढेही करत राहतील. तसेच, भविष्यात यदाकदाचित तशीच कोरोनाची गंभीर परिस्थिती उद्धभवलीच तर प्रशाशन व मंडळे मिळून योग्य मार्ग काढतील व संपूर्ण सहकार्य शासनास करून खंभीरपणे आपल्या सोबत उभे राहतील असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला.  

 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे