शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्याला फटका : ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी , पावसाने भातपिके भुईसपाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 02:28 IST

दररोज जोरदार कोसळणा-या परतीच्या पावसाने ठाणे जिल्ह्यात हातातोंडाशी आलेले भाताचे पिक झोडपून काढले असून हा कापणीला आलेला भात भुईसपाट होऊन जमिनीला टेकला आहे.

कल्याण/शहापूर/मुरबाड/टिटवाळा/बदलापूर : दररोज जोरदार कोसळणा-या परतीच्या पावसाने ठाणे जिल्ह्यात हातातोंडाशी आलेले भाताचे पिक झोडपून काढले असून हा कापणीला आलेला भात भुईसपाट होऊन जमिनीला टेकला आहे. त्याच्या ओंब्यांमधील भरलेल्या दाण्यांत पाणी शिरल्याने ते कुजण्याची भीती आहे. काही ठिकाणी कापण्याच्या स्थितीत आलेल्या भाताचे दाणे तुटून पडले आहेत. पावसाच्या कहरामुळे झोडपल्या गेलेल्या शेतकºयांनी ओला दुष्काळ जाहीर करून भरपाई देण्याची मागणी केली आहे. त्यातच हवामान खात्याने अजून आठवडाभर पाऊस बरसण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.ठाणे जिल्ह्यातील शेतकरी कितीही अडचणीत आला तरी आत्महत्या करत नाही. पण या पावसाने त्यांच्या वर्षभर खाण्याच्या आणि विक्रीसाठीच्या भाताची नासाडी केल्याने वेगवेगळ््या ठिकाणच्या प्रतिनिधींनी, शेतकºयांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. तशी पत्रे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना पाठवली आहेत. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र घोडविंदे यांनीही ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट यासह दररोज कोसळणाºया परतीच्या पावसाने शेतात उभी असलेली पिके काही ठिकाणी भुईसपाट झाली, तर काही ठिकाणी जमिनीला टेकली. यंदा उशिरा का होईना, चांगला पाऊस झाल्याने भातशेती करणारा शेतकरी सुखावला होता. हवा तसा पाऊस झाल्याने शेतकºयांनी चांगल्या प्रकारे भातपेरणी केली होती. अपेक्षेप्रमाणे दिवाळीच्या तोंडावर शेतात भाताची पिके डुलू लागली. पण परतीच्या पावसाने पाठ न सोडल्याने आणि तो जोरदार कोसळत असल्याने शेतात उभी असलेली पिके पार झोपली. त्यामुळे भातशेती करणारा शेतकरी हवालदिल झाला. ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक भातशेती केली जाते. या एकाच हंगामातील पिकावर अनेक शेतकºयांची वर्षभराची गुजराण होते. त्यामुळे खरीपाचा हंगामच शेतकºयासाठी महत्त्वाचा असतो. त्यामुळे भातशेतीचे नुकसान त्यांना वर्षभराचा फटका देऊन गेले आहे.कल्याण तालुक्यात जवळपास पाच हजार ९०० हेक्टर शेतजमिनीवर भातशेती केली जाते. त्यातून दरवर्षी दोन हजार टन भात पिकवला जातो. झिनी, तोरणा, कर्जत, जया, वाडा कोलम या भाताच्या जातींवर सर्वाधिक भर दिला जातो. वाडा कोलमच्या जवळ जाणारा आणि त्यापेक्षा भरघोस पिक देणाºया गुजरात ११ ची लागवडही मोठ्या प्रमाणात होते.गिरणीतून हा भात पॉलिश करून आणल्यावर त्यातील काही भात वर्षभर घरी खाण्यासाठी आणि उर्वरित विकून त्यांना नगदी उत्पन्न मिळते. भातशेतीतून त्यांच्या दोन्ही गरजा भागतात. पण परतीच्या पावसाने त्याचे सर्व अर्थकारण बिघडले आहे.शेतात उभे असलेले पिक खळ््यात झोडणीसाठी जाण्यापूर्वीच शेतात जमीनदोस्त झाले. त्यामुळे शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याच्या हाती काही लागणार नाही. त्यामुळे कल्याण तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी बाजार समितीचे सभापती घोडविंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी लहरी पावसामुळे अडचणीत येतो. त्यामुळे कर्जबाजारी होतो. तेथील शेतकरी आत्महत्या करतात. काही दिवसांपूर्वी शेतकºयांच्या संपानंतर ठाणे जिल्ह्यात पाहणीसाठी शेतकºयांची समिती आली होती. तेव्हा ठाणे जिल्ह्यातील शेतकरी कितीही अडचणीत आला, तरी तो आत्महत्या करीत नाही असे शेतकºयांनी निदर्शनास आणले होते. ठाणे जिल्ह्यातील शेतकºयांना कर्जवाटपच झालेले नाही, असाही मुद्दा समोर आला होता. ओल्या दुष्काळामुळे भातशेती करणारा शेतकरी अडचणीत आल्याने तो आत्महत्या करु शकतो, अशी भीती घोडविंदे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरीthaneठाणे