शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांसाठी आणखी ११ हजार कोटी रुपये; मदत वाटपात विलंबावरून मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी
2
निवडणुकीत उद्धवसेनेचे ७०% नवे चेहरे दिसणार; मनसेसोबत प्रचारात एकत्र, घरोघरी पोहोचण्याची योजना
3
खासदार, आमदार हत्येचा कट; आरोपीचा जामीन फेटाळला, सिम कार्ड, सेल फोनचे केले होते तुकडे
4
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
5
आठव्या वेतन आयोगाला केंद्राची मान्यता; ५० लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, निवृत्त कर्मचाऱ्यांनाही लाभ
6
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
7
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
8
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
9
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
10
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
11
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
12
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
13
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
14
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
15
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
16
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
17
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
18
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
19
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
20
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...

ठाणे जिल्ह्याला फटका : ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी , पावसाने भातपिके भुईसपाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 02:28 IST

दररोज जोरदार कोसळणा-या परतीच्या पावसाने ठाणे जिल्ह्यात हातातोंडाशी आलेले भाताचे पिक झोडपून काढले असून हा कापणीला आलेला भात भुईसपाट होऊन जमिनीला टेकला आहे.

कल्याण/शहापूर/मुरबाड/टिटवाळा/बदलापूर : दररोज जोरदार कोसळणा-या परतीच्या पावसाने ठाणे जिल्ह्यात हातातोंडाशी आलेले भाताचे पिक झोडपून काढले असून हा कापणीला आलेला भात भुईसपाट होऊन जमिनीला टेकला आहे. त्याच्या ओंब्यांमधील भरलेल्या दाण्यांत पाणी शिरल्याने ते कुजण्याची भीती आहे. काही ठिकाणी कापण्याच्या स्थितीत आलेल्या भाताचे दाणे तुटून पडले आहेत. पावसाच्या कहरामुळे झोडपल्या गेलेल्या शेतकºयांनी ओला दुष्काळ जाहीर करून भरपाई देण्याची मागणी केली आहे. त्यातच हवामान खात्याने अजून आठवडाभर पाऊस बरसण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.ठाणे जिल्ह्यातील शेतकरी कितीही अडचणीत आला तरी आत्महत्या करत नाही. पण या पावसाने त्यांच्या वर्षभर खाण्याच्या आणि विक्रीसाठीच्या भाताची नासाडी केल्याने वेगवेगळ््या ठिकाणच्या प्रतिनिधींनी, शेतकºयांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. तशी पत्रे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना पाठवली आहेत. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र घोडविंदे यांनीही ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे.विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट यासह दररोज कोसळणाºया परतीच्या पावसाने शेतात उभी असलेली पिके काही ठिकाणी भुईसपाट झाली, तर काही ठिकाणी जमिनीला टेकली. यंदा उशिरा का होईना, चांगला पाऊस झाल्याने भातशेती करणारा शेतकरी सुखावला होता. हवा तसा पाऊस झाल्याने शेतकºयांनी चांगल्या प्रकारे भातपेरणी केली होती. अपेक्षेप्रमाणे दिवाळीच्या तोंडावर शेतात भाताची पिके डुलू लागली. पण परतीच्या पावसाने पाठ न सोडल्याने आणि तो जोरदार कोसळत असल्याने शेतात उभी असलेली पिके पार झोपली. त्यामुळे भातशेती करणारा शेतकरी हवालदिल झाला. ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक भातशेती केली जाते. या एकाच हंगामातील पिकावर अनेक शेतकºयांची वर्षभराची गुजराण होते. त्यामुळे खरीपाचा हंगामच शेतकºयासाठी महत्त्वाचा असतो. त्यामुळे भातशेतीचे नुकसान त्यांना वर्षभराचा फटका देऊन गेले आहे.कल्याण तालुक्यात जवळपास पाच हजार ९०० हेक्टर शेतजमिनीवर भातशेती केली जाते. त्यातून दरवर्षी दोन हजार टन भात पिकवला जातो. झिनी, तोरणा, कर्जत, जया, वाडा कोलम या भाताच्या जातींवर सर्वाधिक भर दिला जातो. वाडा कोलमच्या जवळ जाणारा आणि त्यापेक्षा भरघोस पिक देणाºया गुजरात ११ ची लागवडही मोठ्या प्रमाणात होते.गिरणीतून हा भात पॉलिश करून आणल्यावर त्यातील काही भात वर्षभर घरी खाण्यासाठी आणि उर्वरित विकून त्यांना नगदी उत्पन्न मिळते. भातशेतीतून त्यांच्या दोन्ही गरजा भागतात. पण परतीच्या पावसाने त्याचे सर्व अर्थकारण बिघडले आहे.शेतात उभे असलेले पिक खळ््यात झोडणीसाठी जाण्यापूर्वीच शेतात जमीनदोस्त झाले. त्यामुळे शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याच्या हाती काही लागणार नाही. त्यामुळे कल्याण तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी बाजार समितीचे सभापती घोडविंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी लहरी पावसामुळे अडचणीत येतो. त्यामुळे कर्जबाजारी होतो. तेथील शेतकरी आत्महत्या करतात. काही दिवसांपूर्वी शेतकºयांच्या संपानंतर ठाणे जिल्ह्यात पाहणीसाठी शेतकºयांची समिती आली होती. तेव्हा ठाणे जिल्ह्यातील शेतकरी कितीही अडचणीत आला, तरी तो आत्महत्या करीत नाही असे शेतकºयांनी निदर्शनास आणले होते. ठाणे जिल्ह्यातील शेतकºयांना कर्जवाटपच झालेले नाही, असाही मुद्दा समोर आला होता. ओल्या दुष्काळामुळे भातशेती करणारा शेतकरी अडचणीत आल्याने तो आत्महत्या करु शकतो, अशी भीती घोडविंदे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरीthaneठाणे