शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यात दीड दिवसाच्या पावणेचार लाख गणरायांना भावपूर्ण निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 22:47 IST

दीड दिवसांसाठी विराजमान झालेल्या घरगुतीसह सार्वजनिक अशा तीन लाख ७८ हजार ७३३ गणरायांना ठाण्यासह उपनगरातील भाविकांनी निरोप दिला. यंदाही शेकडो भाविकांनी पर्यावरणाच्या संवर्धनासाठी पालिकेने उभारलेल्या कृत्रिम तलावांमध्ये मूर्ती विसर्जनाला प्राधान्य दिले.

ठळक मुद्दे पर्यावरण संवर्धनास प्राधान्य ठाण्यासह कल्याण डोंबिवलीत कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन

ठाणे : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या... अशा जयघोषात मोठ्या भावपूर्ण वातावरणात शुक्रवारी दीड दिवसासाठी विराजमान झालेल्या घरगुतीसह सार्वजनिक अशा तीन लाख ७८ हजार ७३३ ठाणेकरांनी निरोप दिला. यंदाही शेकडो भाविकांनी पर्यावरणाच्या संवर्धनासाठी थेट तलावांमध्ये विसर्जन करण्याऐवजी पालिकेने उभारलेल्या कृत्रिम तलावांमध्ये मूर्ती विसर्जनाला प्राधान्य दिले.ठाणे महानगरपालिकेने यावर्षीही इकोफ्रेण्डली गणेशोत्सव संकल्पना राबवून गणेशमूर्ती विसर्जनासाठी विशेष कृत्रिम तलावांची निर्मिती केली होती. रायलादेवी, उपवन, आंबेघोसाळे, टिकुजिनीवाडी, बाळकुम, खारेगाव आदी कृत्रिम तलावांचा यामध्ये समावेश होता. त्याचप्रमाणे तलाव परिसरात ठिकठिकाणी निर्माल्यकलशही उभारले होते. तसेच वैद्यकीय पथक, अग्निशमन दल, विद्युतव्यवस्था, ध्वनिक्षेपक यंत्रणा आदी सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. विसर्जन घाट आणि कृत्रिम तलावांच्या ठिकाणी सीसीटीव्हींद्वारे पोलिसांनी विशेष निगराणी ठेवली होती. प्रत्येक विसर्जन तलावांच्या ठिकाणी पोलिसांच्या मदतीला खासगी कार्यकर्ते होते.विसर्जनावर कुठेही अनुचित प्रकार झाला नाही. सर्वत्र भक्तांनी गुलालासह पुष्पपाकळ्यांची उधळण करून आणि ढोलताशांचा गजर करत आवडत्या बाप्पाची अखेरची आरती ओवाळून विसर्जन केले.* सहा महापालिकांच्या विसर्जन घाटावर भक्तांची गर्दीदीड दिवस गणरायाची भक्तिभावाने पूजा केल्यानंतर पर्यावरणाभिमुख गणेश विसर्जनासाठी ठाणे महानगरपालिकेसह आयुक्तालयातील सहाही महापालिकांनी केलेल्या विशेष विसर्जन घाटांचा गणेशभक्तांनी आवर्जून लाभ घेतला. ठाणे शहर पोलीस आयुक्यालयातील पाच परिमंडळांतर्गत तीन सार्वजनिक, तर ३८ हजार ५७७ घरगुती गणरायांना तसेच ठाणे ग्रामीण पोलीस क्षेत्रातील २९ सार्वजनिक, तर १४ हजार २०० बाप्पांना निरोप दिला.परिमंडळनिहाय असे झाले विसर्जनपरिमंडळ १- ठाणे शहर -५६ हजार १९०* परिमंडळ - २ भिवंडी : ३२ हजार ६०१* परिमंडळ - ३ कल्याण : एक लाख २२ हजार ३००* परिमंडळ - ४ उल्हासनगर : ८४ हजार ७०१* परिमंडळ -५ वागळे इस्टेट : ८३ हजार ८१

टॅग्स :thaneठाणेGanesh Visarjanगणेश विसर्जन