शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
4
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
5
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
6
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
7
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
8
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
9
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
10
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
11
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
12
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
13
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
14
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
15
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
16
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
17
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
18
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
19
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
20
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही

ठाणे जिल्ह्यामध्ये झाला स्वच्छतेचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 05:10 IST

भिवंडीत नगरसेवकांची पाठ : महात्मा गांधी जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम, शहरात जनजागृती रॅली

भिवंडी : प्रभूआळी येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार घालून महापालिकेच्यावतीने स्वच्छता मोहिमेस प्रारंभ केला. मात्र या मोहिमेकडे बहुतांश नगरसेवकांनी पाठ फिरवल्याने शहरात स्वच्छता मोहिमेचा फज्जा उडाला. हा कार्यक्रम सर्व नगरसेवकांना कळविला होता. परंतु अनेक काँग्रेस नगरसेवकांसह इतर पक्षाच्या नगरसेवकांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. महापौर जावेद दळवी, आयुक्त मनोहर हिरे आदी उपस्थित होते. शहराच्या विविध भागात स्वच्छता मोहीम राबवली.स्वच्छता संवाद पदयात्रा सुरूमहात्मा गांधीजी यांच्या जयंतीनिमित्ताने स्वच्छता संवाद पदयात्रेला प्रारंभ झाला. त्याआधी भाजपाचे खासदार कपिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छतेला सुरूवात करण्यात आली. पाटील यांच्या हस्ते पदयात्रेचे उद्घाटन झाले. पदयात्रा ३० जानेवारीपर्यंत ग्रामीण भागात जाऊन स्वच्छतेचा संदेश देणार आहे. पाटील यांच्यासह स्वच्छता मोहिमेत आमदार महेश चौघुले, शहराध्यक्ष संतोष शेट्टी, श्याम अग्रवाल आदी सहभागी झाले होते.शहर स्वच्छतेची हाकउल्हासनगर : महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त महापालिका कर्मचाऱ्यांनी स्वच्छ व सुंदर शहराची हाक देत नेताजी चौक ते पालिका दरम्यान रॅली काढण्यात आली. तसेच शहर काँग्रेसच्यावतीने शास्त्री चौक ते पालिका दरम्यान पदयात्रा काढण्यात आली. पालिका कर्मचाºयांनीही जनजागृती फेरी काढली. प्लॅस्टिक पिशव्या, थर्माकोलचा वापर करू नका असा संदेश यावेळी देण्यात आला. नागसेन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रॅली काढून स्वच्छतेची हाक दिली. महापौर पंचम कलानी,आयुक्त गणेश पाटील यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला.गोंधळींनी दिला संदेशअंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेच्यावतीने शहर स्वच्छतेसाठी कार्य करणाºयांचा आणि या मोहिमेत सहकार्य करणाºयांचा जाहीर सत्कार करण्यात आला. संस्था आणि संघटनेच्या माध्यमातून शहरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यानिमित्ताने झालेल्या कार्यक्रमात गोंधळींनी स्वच्छतेचा संदेश दिला. अंबरनाथ नगरपालिकेतर्फे सूर्याेदय सभागृहात कार्यक्रम झाला. स्वच्छ प्रभाग स्पर्धेतील विजेत्या प्रभागातील नगरसेवकांचा आणि त्या प्रभागातील स्वच्छतादूतांचा सत्कार करण्यात आला. स्वच्छ प्रभागात नगरसेवक सुभाष साळुंखे यांचा प्रथम तर अपर्णा भोईर आणि वीणा उगले यांच्या प्रभागाला अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक देण्यात आला. पथनाट्यांतून जनजागृती करण्यात आली. नगराध्यक्षा मनीषा वाळेकर, मुख्याधिकारी देविदास पवार आदी उपस्थित होते.सामाजिक संस्था,शाळा, विद्यार्थ्यांचा सहभागराष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्ताने जिल्ह्यात तसेच ग्रामीण भागात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. पालिकांबरोबरच सामाजिक संस्था, शाळा, विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. यानिमित्ताने झालेल्या कार्यक्रमांना चांगला प्रतिसाद मिळाला. शहर स्वच्छतेसाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असा निर्धार व्यक्त करण्यात आला.१३३ शाळा, महाविद्यालयांचा सहभागमीरा रोड : महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मीरा-भार्इंदरमध्ये महापालिकेसह विविध शाळा, संस्था यांच्यातर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. शहरात प्रभातफेरी काढण्यात आली. १३३ शाळा व महाविद्यालयांचे सुमारे २६ हजार विद्यार्थी अभियानात सहभागी झाले होते. पालिकेने प्लॅस्टिक पिशव्या वापरणाºयांकडून ४२ हजारांचा दंड वसूल करत ३०० किलो प्लॅस्टिक जप्त केले. महापौर डिम्पल मेहता, उपमहापौर चंद्रकांत वैती, आयुक्त बालाजी खतगावकर, सभागृह नेते रोहिदास पाटील आदींनी स्वच्छतेची शपथ घेतली. सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकता आठवड्यातून दोन तास व वर्षात १०० तास स्वच्छतेसाठी श्रमदान करण्याचा सर्वांनी निश्चय केला. भार्इंदरच्या नेहरूनगर झोपडपट्टीत विद्यार्थ्यांनी श्रमदान केले अशी माहिती उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांनी दिली. माजी महापौर गीता जैन यांच्या अस्त्र फाउंडेशनच्यावतीने उत्तन समुद्र किनारा व न्यू म्हाडा वसाहत येथे स्वच्छता अभियान राबवण्यात आले.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान