शहरं
Join us  
Trending Stories
1
सूडानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
2
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
3
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
4
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
5
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
6
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
7
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
8
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
9
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
10
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
11
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
12
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
13
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
14
निधीटंचाई; शेततळ्यांना सरकारनेच दिली कबुली; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती : रक्कम देताना हात आखडता
15
साताऱ्यात मेफेड्रॉन कारखाना उद्ध्वस्त; कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त, सात अटकेत
16
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
17
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
18
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
19
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
20
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात साधेपणाने दहीहंडी, बक्षिसांची निम्मी रक्कम देणार पूरग्रस्तांच्या मदतीसाठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2019 02:31 IST

कोल्हापूर, सांगलीबरोबरच ठाणे जिल्ह्यातील कल्याण, बदलापूर, दिवा अशा शहरांना यंदा पुराचा तडाखा बसल्याने दहीहंडीच्या उत्सवावर विरजण पडले आहे.

- अजित मांडकेठाणे - कोल्हापूर, सांगलीबरोबरच ठाणे जिल्ह्यातील कल्याण, बदलापूर, दिवा अशा शहरांना यंदा पुराचा तडाखा बसल्याने दहीहंडीच्या उत्सवावर विरजण पडले आहे. अनेक मंडळे यावेळी थरांची स्पर्धा न लावता बक्षिसाची जास्तीतजास्त रक्कम पूरग्रस्तांच्या मदतीकरिता देणार असल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.ठाणे-मुंबईतील बालगोपाळ सांगली-कोल्हापुरातील पूरग्रस्तांसाठी मदत गोळा करीत असल्याने त्यांच्या थरांच्या सरावावर पाणी फिरले आहे. ठाण्यातील दहीहंडी उत्सव आयोजकांनीही यंदा साध्या पद्धतीने हा उत्सव साजरा करण्याचे ठरवले आहे. दहीहंडीची उंची कमी केली जाणार आहे, तर बक्षिसांची अर्धी रक्कम ही पूरग्रस्तांना देण्याचा निर्णय अनेक आयोजकांनी घेतला आहे.येत्या २४ आॅगस्ट रोजी दहीहंडीचा उत्सव असून जगभरातील गोविंदाप्रेमींना ठाणे आणि मुंबईतील गगनाला भिडणाऱ्या हंड्या फोडण्याच्या थराराची प्रतीक्षा असते. या उत्सवात ठाण्यात हंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकामध्ये चढाओढ लागलेली असते. गुरुपौर्णिमेपासून गोविंदा पथके सरावाला सुरुवात करतात. यंदा गुरुपौर्णिमा होऊन महिना उलटला तरी अद्यापही पथकांकडून म्हणावा तसा सराव सुरू झालेला नाही. मैदानांत पथकांचा सराव सुरू असल्याचे दिसत नाही. ठाणे, मुंबईत महिनाभरापासून बरसणाºया पावसाच्या सरींनी गोविंदांच्या सरावावर पाणी फिरले आहे.त्यातच सांगली, कोल्हापूर, चिपळूण, सिंधुदुर्ग आदी भागांना पुराचा फटका बसल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. संकटात सापडलेल्या पूरग्रस्तांना मदत पोहोचवणे गरजेचे असल्याने बहुतांशी गोविंदा पथके जीवनावश्यक वस्तू गोळा करण्याच्या कामात व्यस्त आहेत. अनेक गोविंदांच्या घरांत पाणी शिरल्याने तेही आपला विस्कटलेला संसार सावरण्याचा प्रयत्न करीत आहेत. कोकणातील घरांचे पावसाने नुकसान झाल्याने काही तिकडे किंवा कोल्हापूर-सांगलीतील नातलगांच्या मदतीकरिता धावले आहेत. पोलिसांकडूनही अद्याप गोविंदा पथकांना, दहीहंडी आयोजकांना बैठकीसाठी बोलावण्यात आलेले नाही. दहीहंडीच्या थराबाबतचे निर्देश मंडळांपर्यंत पोहोचलेले नाहीत. फक्त काही मोजक्या पोलीस ठाण्यांकडून गोविंदा पथकांना बोलावून केवळ आवाजाच्या डेसिबल्सच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.ठाण्यातील प्रमुख गोविंदा उत्सव आयोजकांनी जिल्ह्यातील व राज्यातील पूरस्थितीचे भान ठेवून यंदा हा उत्सव साधेपणाने साजरा करण्याचे निश्चित केले आहे. काही आयोजकांनी बक्षिसांची रक्कम कमी केली आहे. काहींनी गाव दत्तक घेण्याचे निश्चित केले आहे, तर काही मंडळांना या उत्सवाच्या माध्यमातून जमा होणारी रक्कम पूरग्रस्त भागांना द्यायची आहे.काही मंडळांनी पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना रोख रक्कम देण्याचा निर्धार केला आहे. दहीहंडी उत्सव, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव हे आपले पारंपरिक सण आहेत, त्यामुळे ते साजरे होणेही गरजेचे असल्याचे मत बहुतांश आयोजकांनी व्यक्त केले. परंतु, उत्सवातून सामाजिक भान जपण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.यंदा कोल्हापूर आणि सांगली भागांत जी काही पूरस्थिती निर्माण झाली आहे, त्या अनुषंगाने आम्ही अगोदरच येथील एक गाव दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्या गावाच्या उभारणीकरिता दहीहंडी उत्सवाच्या ठिकाणी अन्य कोणाला आणखी मदत करायची असेल, तर त्यासाठी स्टॉल उभारण्यात येणार आहे. शिवाय, या उत्सवाच्या माध्यमातून जमा झालेली रक्कम ही पूरग्रस्त भागासाठी दिली जाणार आहे.- प्रताप सरनाईक,संस्कृती युवा प्रतिष्ठानदहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून यंदा पूरग्रस्त भागांसाठी मदत उभी करण्यात येणार आहे. बक्षिसांची अर्धी रक्कम ही पूरग्रस्तांसाठी दिली जाणार असून कोणतेही कलाकार अथवा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जाणार नाही. तसेच या उत्सवाच्या माध्यमातून जी रक्कम गोळा होईल, ती पूरग्रस्त भागांसाठी दिली जाणार आहे.- शिवाजी पाटील, स्वामी प्रतिष्ठानयंदा हा उत्सव साधेपणाने साजरा केला जाणार आहे. मात्र, थरांची उंची कमी असणार नाही. बक्षिसांची जी काही रक्कम असेल, त्यातील अर्धी रक्कम ही पूरग्रस्त भागांसाठी दिली जाणार आहे. तसेच पूरग्रस्त भागातील १० शेतकºयांना त्या दिवशी आमंत्रण देण्यात आले असून त्यांना प्रत्येकी ५१ हजारांची रोख स्वरूपात मदत दिली जाणार आहे.- अविनाश जाधव,जिल्हाध्यक्ष, मनसे

टॅग्स :Dahi Handiदही हंडीSangli Floodसांगली पूरKolhapur Floodकोल्हापूर पूर