शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ठाण्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आले ४२ टक्क्यांवर;८३८ जण परतले घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 01:29 IST

ठाणेकरांना मोठा दिलासा

ठाणे : ठाणे शहरात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असताना एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता २० टक्क्यांवरून ४२ टक्क्यांवर आले असून सोमवारपर्यंत ८३८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. याच कालावधीत दोन हजारांहून अधिक रुग्ण उपचार घेत असले तरी प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ही १२०० च्या आसपास आहे.

शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कधी १०० ते कधी १५० रुग्ण शहरात आढळत आहेत. त्यामुळे ठाणेकरांच्या चिंतेत वाढ होत आहे. परंतु, क्वॉरंटाइन केलेल्या रुग्णांच्या संख्येमुळेच बाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे तीदेखील शहरासाठी समाधानकारक बाब म्हणावी लागणार आहे.

शहरात आजघडीला दोन हजारांहून अधिक रुग्ण हे कोरोनाबाधित आढळले असून यातील ८३८ हून अधिक रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. गेल्या काही दिवसांत कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

घाबरण्याऐवजी काळजी घेण्याची गरज

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी ठाणेकरांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. मात्र ठाणेकरांनी काळजी घेणे गरजेचे असल्याचेही महापालिकेने स्पष्ट केले आहे. ज्या रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे, परंतु सौम्य लक्षणे दिसत असतील, अशांना आता रुग्णालयात दाखल करून घेण्याऐवजी घरीच उपचार घेण्याचा सल्ला महानगरपालिकेने दिला आहे. परंतु, झोपडपट्टीत राहणाºया नागरिकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येईल, असेही महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे.परंतु, मृतांमध्येही ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे, ज्यांचे वय ६० हून अधिक आहे, ज्यांना इतर व्याधी आहेत, अशा रुग्णांचे प्रमाण जास्त असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका