शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
5
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
6
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
7
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
8
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
9
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
10
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
11
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
12
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
13
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
14
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
15
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
16
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
17
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
18
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
19
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
20
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?

खड्ड्यांचे ठाणे हेच स्मार्टसिटीचे रडगाणे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2020 15:18 IST

त्यावर उपाय नसल्याने ठाणेकरांनो खड्डे पहा आणि थंड बसा अशी टीकाही पालिका आणि सत्ताधा-यांवर केली जात आहे.

ठाणे  : सध्या ठाणे  शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची चर्चा सर्वच पातळीवर सुरू आहे. पालिका तात्पुरत्या स्वरुपात मुलामा लावून खड्डे बुजवित असली तरी पुन्हा खड्डे पडत असल्याचे चित्र शहरातील बहुतेक भागात आहे. त्यामुळे तलावांचे शहर असलेल्या शहरांची ओळख ही आता खड्ड्यांचे शहर म्हणून झाली आहे. त्यात आता खड्ड्यांचे ठाणे  हेच स्मार्टसिटीचे रडगाणे अशा आशयाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदारपणे वायरल होऊ लागला आहे. परंतु त्यावर उपाय नसल्याने ठाणेकरांनो खड्डे पहा आणि थंड बसा अशी टीकाही पालिका आणि सत्ताधा-यांवर केली जात आहे.दरवर्षी पावसाळा सुरु झाला की शहरातील खड्ड्यांची चर्चा सुरू होते. यंदा तर कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊन नंतर शहरातील अर्थव्यवस्था सुरळीत सुरु झाली आहे. परंतु ही अर्थव्यवस्था टप्याटप्याने रुळावर येत असताना शहरातील खड्ड्यांना स्पीड मात्र जोरात असल्याचे दिसून आले. शहरातील कापुरबावडी, माजिवडा, वागळे इस्टेट, कळवा, मुंब्रा, तिनहात नाका, नितीन कंपनी कॅडबरी आदींसह शहरातील जवळ जवळ प्रत्येक भागात रस्त्यांवर खड्डेच दिसत आहेत. त्यात सध्या ठाणो शहर हे स्मार्टसिटीकडे वाटलाच करीत आहे. परंतु स्मार्टसिटीकडे वाटचाल करीत असताना ठाणेकारांना किमान रस्त्यावरील खड्ड्यांच्या समस्येंतून तरी सोडवा अशी माफक अपेक्षा आहेत. परंतु दरवर्षी येतो पावसाळा तसे दरवर्षी पडतात खड्डे असेच चित्र ठाण्यात आहे. त्यामुळे स्मार्टसिटी कडे वाटचाल करणा-या ठाण्याची खड्ड्यांची वाटचाल सुरू झाल्याचे दिसत आहे.दरम्यान कल्याण डोंबिवलीच्या खडय़ांवरुन मागील काही वर्षे सोशल मिडियावर चांगलीच चर्चा झाली होती. त्यात यंदा ठाण्यातही शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांची चर्चा सोशल मिडियावर सुरु झाली आहे. मागील काही दिवसापूर्वी मनसेच्या वतीने शहरातील खड्ड्यांवर व्हिडीओ वायरल झाला होता. त्यानंतर आता आणखी एक व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. यामध्ये खड्ड्यांचे ठाणे हेच स्मार्टसिटीचे रडगाणे, ठाणेकरांनो पहा आणि थंड बसा, अशा आशयाचा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. आज अनेकांची पंसती ही ठाण्याला आहे, अनेकांनी आपले घरे येथे घेतली आहेत. सांस्कृतिक, तलावांचे शहर म्हणूनही ठाण्याला पसंती दिली जात आहे. परंतु आज ही ओळख काहीशी पुसली जाऊन खड्ड्यांचे ठाणे अशी ओळख ठाण्याची झाल्याचा आरोप मनसेचे स्वप्नील महिंद्रकर यांनी केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून आता तरी प्रशासन जागे होईल का?, खड्ड्यांपासून ठाणेकरांची मुक्तता होईल का?, असा सवाल उपस्थित केला जात आहे.