शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
4
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
5
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
6
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
7
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
8
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
9
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
10
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
11
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
13
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
14
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
15
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
16
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
17
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
18
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
19
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
20
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
Daily Top 2Weekly Top 5

खड्ड्यांचे ठाणे हेच स्मार्टसिटीचे रडगाणे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2020 15:18 IST

त्यावर उपाय नसल्याने ठाणेकरांनो खड्डे पहा आणि थंड बसा अशी टीकाही पालिका आणि सत्ताधा-यांवर केली जात आहे.

ठाणे  : सध्या ठाणे  शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची चर्चा सर्वच पातळीवर सुरू आहे. पालिका तात्पुरत्या स्वरुपात मुलामा लावून खड्डे बुजवित असली तरी पुन्हा खड्डे पडत असल्याचे चित्र शहरातील बहुतेक भागात आहे. त्यामुळे तलावांचे शहर असलेल्या शहरांची ओळख ही आता खड्ड्यांचे शहर म्हणून झाली आहे. त्यात आता खड्ड्यांचे ठाणे  हेच स्मार्टसिटीचे रडगाणे अशा आशयाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदारपणे वायरल होऊ लागला आहे. परंतु त्यावर उपाय नसल्याने ठाणेकरांनो खड्डे पहा आणि थंड बसा अशी टीकाही पालिका आणि सत्ताधा-यांवर केली जात आहे.दरवर्षी पावसाळा सुरु झाला की शहरातील खड्ड्यांची चर्चा सुरू होते. यंदा तर कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊन नंतर शहरातील अर्थव्यवस्था सुरळीत सुरु झाली आहे. परंतु ही अर्थव्यवस्था टप्याटप्याने रुळावर येत असताना शहरातील खड्ड्यांना स्पीड मात्र जोरात असल्याचे दिसून आले. शहरातील कापुरबावडी, माजिवडा, वागळे इस्टेट, कळवा, मुंब्रा, तिनहात नाका, नितीन कंपनी कॅडबरी आदींसह शहरातील जवळ जवळ प्रत्येक भागात रस्त्यांवर खड्डेच दिसत आहेत. त्यात सध्या ठाणो शहर हे स्मार्टसिटीकडे वाटलाच करीत आहे. परंतु स्मार्टसिटीकडे वाटचाल करीत असताना ठाणेकारांना किमान रस्त्यावरील खड्ड्यांच्या समस्येंतून तरी सोडवा अशी माफक अपेक्षा आहेत. परंतु दरवर्षी येतो पावसाळा तसे दरवर्षी पडतात खड्डे असेच चित्र ठाण्यात आहे. त्यामुळे स्मार्टसिटी कडे वाटचाल करणा-या ठाण्याची खड्ड्यांची वाटचाल सुरू झाल्याचे दिसत आहे.दरम्यान कल्याण डोंबिवलीच्या खडय़ांवरुन मागील काही वर्षे सोशल मिडियावर चांगलीच चर्चा झाली होती. त्यात यंदा ठाण्यातही शहरातील रस्त्यावरील खड्ड्यांची चर्चा सोशल मिडियावर सुरु झाली आहे. मागील काही दिवसापूर्वी मनसेच्या वतीने शहरातील खड्ड्यांवर व्हिडीओ वायरल झाला होता. त्यानंतर आता आणखी एक व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. यामध्ये खड्ड्यांचे ठाणे हेच स्मार्टसिटीचे रडगाणे, ठाणेकरांनो पहा आणि थंड बसा, अशा आशयाचा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. आज अनेकांची पंसती ही ठाण्याला आहे, अनेकांनी आपले घरे येथे घेतली आहेत. सांस्कृतिक, तलावांचे शहर म्हणूनही ठाण्याला पसंती दिली जात आहे. परंतु आज ही ओळख काहीशी पुसली जाऊन खड्ड्यांचे ठाणे अशी ओळख ठाण्याची झाल्याचा आरोप मनसेचे स्वप्नील महिंद्रकर यांनी केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून आता तरी प्रशासन जागे होईल का?, खड्ड्यांपासून ठाणेकरांची मुक्तता होईल का?, असा सवाल उपस्थित केला जात आहे.