शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडक्या बहिणींसाठी खुशखबर; e-KYC साठी मुदतवाढ, जाणून घ्या नवीन तारीख...
2
सुरक्षा दलाचे सर्वांत मोठे यश ! ५०० जवानांचा बळी घेणारा जहाल नक्षल कमांडर 'हिडमा'चा खात्मा ; १० कोटींचे होते इनाम
3
"...याची जाणीव ठेवणं गरजेचं होतं"; ठाकरेंच्या शिवसेनेला काँग्रेसने सुनावले, अग्रलेखाला सणसणीत उत्तर
4
चौकशीत आरोपी डॉक्टरांचे मोठे खुलासे; सिग्नल App चा वापर, i-20 ची खरेदी अन्..., अनेक गोष्टी झाल्या उघड
5
VIRAL : आयुष्यातील पहिलीच नोकरी अन् अवघ्या तीन तासांनंतरच दिला राजीनामा! असं नेमकं झालं काय? 
6
Shiv Sena BJP: "थोडी नाराजी तयार झाली असेल, पण आजच्या..."; शिंदेंचे मंत्री नाराज असल्याच्या चर्चेवर बावनकुळे काय म्हणाले?
7
मुंबईकरांची धावपळ! शहरात CNG पुरवठा अचानक ठप्प; ऑटो-टॅक्सीची लांबच लांब रांग, कधीपर्यंत दुरुस्त होणार?
8
"मी तशी नाही…" वादग्रस्त प्रकरणावर व्यक्त होताना बांगलादेशी कर्णधाराने घेतलं हरमनप्रीतचं नाव
9
रेखा झुनझुनवालांनी 'या' बँकेतील हिस्सा वाढवला, शेअर्सनं गाठला नवा उच्चांक; किंमत २४५ रुपयांच्या पार
10
Mumbai Traffic: एलबीएस मार्गावर आता 'गेम चेंजर' पूल; ४० मिनिटांचे अंतर अवघ्या १० मिनिटांत पार होणार!
11
Mumbai Indians मधून बाहेर पडताच Arjun Tendulkar ची धडाकेबाज कामगिरी, साकारलं अनोखं शतक
12
Stray Dogs: लाखभर भटक्या श्वानांसाठी निवारा केंद्रे उभारणार कुठे? पालिकेसमोर मोठे आव्हान
13
SIP मध्ये 'ही' चूक कराल तर मोठं नुकसान! फक्त ३ पेमेंट मिस झाल्यास १.५ लाख रुपये बुडतील; पाहा गणित
14
Stock Market Bull Run: तयार राहा! शेअर बाजारात येणार आणखी एक बूल रन; सेन्सेक्स पोहोचणार १,०७,००० पर्यंत?
15
‘साधी एक चिपही बनवता येत नाही, अमेरिकन नागरिक काय कामाचे?’, डोनाल्ड ट्रम्प संतापले, ‘या’ देशाकडून शिकण्याचा दिला सल्ला 
16
अमित शाहांनी दिलेली 30 नोव्हेंबरची डेडलाइन; त्यापूर्वीच सुरक्षा दलांनी हिडमाला संपवले..!
17
आधी बोगस डॉक्टर, नंतर जादूटोण्यावर ठेवला विश्वास; तापाने फणफणलेल्या ३ मुलांनी गमावला जीव
18
Vegetable Rates: भाजीपाल्याने गाठली शंभरी; गवार १६०, मटार १३० रुपये किलो!
19
भारताचा मध्यमवर्ग संकटाच्या उंबरठ्यावर; २ कोटी लोकांच्या नोकऱ्या जाण्याचा धोका
20
त्याच्या चेहऱ्यावर ना पश्चात्ताप ना कसली चिंता; दिल्ली स्फोटातील आरोपीला भेटल्यानंतर वकील म्हणाले.. 
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील चार बांग्लादेशी घुसखोर महिलांना न्यायालयाने सुनावली कारावासाची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 21:32 IST

अवैध मार्गांचा अवलंब करून भारतात आल्यानंतर ठाण्यातील काशीमिरा येथे बेकायदेशीर वास्तव्य केलेल्या चार बांग्लादेशी महिलांना न्यायालयाने कारावासाची शिक्षा सुनावली. शिक्षेनंतर महिलांना त्यांच्या देशात परत पाठविण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.

ठळक मुद्देकाशीमिरा येथे केले होते अवैध वास्तव्यवर्षभरात न्यायालयाचा निकालशिक्षेनंतर मायदेशी परत पाठविण्याचे आदेश

ठाणे : घुसखोरी करून ठाण्यातील काशीमिरा येथे अवैधरित्या वास्तव्य करणार्‍या चार बांग्लादेशी महिलांना ठाणे न्यायालयाने दोन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. वर्षाच्या सुरूवातीला ठाणे पोलिसांनी या महिलांना अटक केली होती.२८ जानेवारी २0१७ रोजी ठाणे ग्रामीण पोलिसांच्या अवैध मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाचे पोलीस निरीक्षक संजय बांगर यांनी काशीमिरा येथे धाड टाकून दोन बांग्लादेशी महिलांना अटक केली होती. ७ फेब्रुवारी २0१७ रोजी पोलिसांनी याच भागात दुसरी एक धाड टाकून आणखी दोन बांग्लादेशी महिलांना अटक केली. तदर्थ जिल्हा न्यायाधिश आणि सहायक सत्र न्यायाधिश आर.एस. पाटील (भोसले) यांच्यासमोर या दोन्ही प्रकरणांची एकत्रित सुनावणी झाली. अ‍ॅड. विनित कुळकर्णी, उज्वला मोहोळकर आणि वंदना जाधव यांनी या प्रकरणांमध्ये सरकारची बाजु मांडली. जन्ना नुरइस्लाम शेख (वय ३५), शुकी हारूण मुल्ला (वय ५८), सिमा समथ मातबर (वय ३0) आणि मैना जुमत गाझी (वय ३0) ही आरोपी महिलांची नावे आहेत. या चारही महिला काशीमिरा येथे वास्तव्य करून मजुरी करायच्या. पोलिसांनी धाड टाकली तेव्हा त्या अन्य मजुरांसोबत रोजंदारी घेण्यासाठी थांबलेल्या होत्या. पोलिसांना पाहताच त्यांनी पसार होण्याचा प्रयत्न केल्याची माहिती सरकारी पक्षाने न्यायालयास दिली. त्यांच्याकडे वास्तव्याचा कोणताही अधिकृत पुरावा नसल्याचे चौकशीदरम्यान स्पष्ट झाले. चारही आरोपी महिला असून, त्यांचे वय पाहता कमीत कमी शिक्षा देण्याची विनंती आरोपींच्या वकिलांनी केली. मात्र सरकारी पक्षाने या विनंतीला विरोध केला. आरोपींनी भारतात घुसखोरी केली असून, अशा घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आरोपींविषयी कोणतीही दयामाया न दाखविता जास्तीत जास्त शिक्षा देण्याची विनंती सरकारी पक्षाने केली. आरोपी महिला अतिशय गरिब आहेत. केवळ रोजगाराच्या उद्देशाने त्या भारतात आल्या. याशिवाय कोणत्याही अवैध कृत्यामध्ये त्यांचा सहभाग दिसलेला नसल्याने, त्या दयेस पात्र असल्याचे निरीक्षण नोंदवत, न्यायालयाने चारही महिलांना दोन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली. शिक्षा संपल्यानंतर आरोपींना त्यांच्या देशात परत पाठविण्यासाठी तत्काळ पाऊले उचलण्याचे आदेश न्यायालयाने नयानगर पोलीस आणि तुरूंग प्रशासनाला दिले.

टॅग्स :thaneठाणेCourtन्यायालय