शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
3
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
4
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
5
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
6
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
7
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
8
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
9
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
10
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
11
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
12
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
13
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
14
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
15
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
17
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
18
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
20
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे काँग्रेसमधील दुफळी पुन्हा उफाळली, परांजपे यांना पाठिंबा देण्यावरून मतभेद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2019 04:07 IST

 काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली असली, तरी आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांना पाठिंबा देण्यावरून काँग्रेसच्या दोन गटांमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.

ठाणे  -  काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली असली, तरी आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांना पाठिंबा देण्यावरून काँग्रेसच्या दोन गटांमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.राष्ट्रवादीकडून काँग्रेस कार्यकर्त्यांना सतत अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचा मुद्दा उपस्थित करून काँग्रेसच्या ब्लॉक अध्यक्षांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे काम न करण्याची भूमिका घेतली होती. याबाबत, काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज शिंदे यांनीही अहवाल सादर करणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, तो सादर करण्यापूर्वीच पूर्णेकर गटाने शहराध्यक्षांविरोधात भूमिका घेऊन आनंद परांजपे यांना आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केल्याने पक्षामधील गटबाजी अद्याप संपली नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.संपूर्ण देशामध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने जातीयवादासह देशातील भ्रष्टाचाराविरु द्ध एक मोठी आघाडी उभी केली आहे. भाजपाची राजकीय मग्रुरी आणि पंतप्रधानांची हुकूमशाही वृत्ती हे दोन्हीही या देशाच्या लोकशाहीला मारक असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांकडून केला जात आहे. त्यासाठी सर्व समविचारी पक्षांना एकत्र करून हे सरकार उलथवून टाकण्यासाठी राहूल गांधी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत ठाण्यामध्ये शिवसेना व भाजपाला मदतच होईल, अशा पद्धतीने काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी पत्र काढले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आनंद परांजपे यांना असहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. ती राहुल गांधी यांच्या विरोधातील भूमिका आहे, असे काँग्रेसच्या पूर्णेकर गटाचे म्हणणे आहे.एकीकडे राहुल गांधी धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही वाचवण्यासाठी विविध पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहेत. तर, दुसरीकडे व्यक्तिगत हितासाठी काँग्रेसमधील काही अंतर्गत गट शिवसेनेला मदत होईल, अशी भूमिका घेत असल्याचा आरोप पूर्णेकर गटाने केला आहे. या गटाने आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांची नुकतीच भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी आ. जितेंद्र आव्हाड यांच्यासह ठाणे जिल्हा इंटक काँग्रेस अध्यक्ष सचिन शिंदे, जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष अ‍ॅड. झिया शेख, जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते महेश पाटील आदी उपस्थित होते.ब्लॉक अध्यक्षांच्या भूमिकेबाबत प्रदेशाध्यक्षांकडे अहवाल सादर करण्यात येणार असून त्या दृष्टीने चर्चा सुरू आहे. मात्र, काही ठरावीक लोकांना फार घाई झाली आहे. जेव्हा सर्व ब्लॉक अध्यक्ष एकमुखाने बोलतात, तेव्हा त्यांचे म्हणणे अध्यक्षांना मानावे लागते. सात ते आठ लोकांच्या पाठिंब्यावर आनंद परांजपे निवडून येत असतील, तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. राष्ट्रवादीने काँग्रेसच्या सात ते आठ लोकांना घेऊन राजकारण करू नये. चर्चेतून मार्ग काढता येईल. स्वीकृत सदस्याच्या मुद्यावर स्वत: गटनेत्यांनी माझे नाव सुचवले होते. जर राष्ट्रवादीचे मनोहर साळवी हे तांत्रिकदृष्ट्या अपात्र झाले असतील, तर दुसरे नाव माझेच येणार, यात शिवसेनेने पाठिंबा देण्याचा संबंधच नाही, हे सर्व आरोप बिनबुडाचे आहेत.- मनोज शिंदे, शहराध्यक्ष, ठाणे-काँग्रेस

टॅग्स :congressकाँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक