शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
3
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
4
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
5
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
6
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
7
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
8
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
9
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
10
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
11
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
12
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
13
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
14
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
15
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
16
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
17
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
18
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
19
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
20
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

ठाणे काँग्रेसमधील दुफळी पुन्हा उफाळली, परांजपे यांना पाठिंबा देण्यावरून मतभेद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2019 04:07 IST

 काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली असली, तरी आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांना पाठिंबा देण्यावरून काँग्रेसच्या दोन गटांमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.

ठाणे  -  काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली असली, तरी आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांना पाठिंबा देण्यावरून काँग्रेसच्या दोन गटांमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.राष्ट्रवादीकडून काँग्रेस कार्यकर्त्यांना सतत अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचा मुद्दा उपस्थित करून काँग्रेसच्या ब्लॉक अध्यक्षांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे काम न करण्याची भूमिका घेतली होती. याबाबत, काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज शिंदे यांनीही अहवाल सादर करणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, तो सादर करण्यापूर्वीच पूर्णेकर गटाने शहराध्यक्षांविरोधात भूमिका घेऊन आनंद परांजपे यांना आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केल्याने पक्षामधील गटबाजी अद्याप संपली नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.संपूर्ण देशामध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने जातीयवादासह देशातील भ्रष्टाचाराविरु द्ध एक मोठी आघाडी उभी केली आहे. भाजपाची राजकीय मग्रुरी आणि पंतप्रधानांची हुकूमशाही वृत्ती हे दोन्हीही या देशाच्या लोकशाहीला मारक असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांकडून केला जात आहे. त्यासाठी सर्व समविचारी पक्षांना एकत्र करून हे सरकार उलथवून टाकण्यासाठी राहूल गांधी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत ठाण्यामध्ये शिवसेना व भाजपाला मदतच होईल, अशा पद्धतीने काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी पत्र काढले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आनंद परांजपे यांना असहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. ती राहुल गांधी यांच्या विरोधातील भूमिका आहे, असे काँग्रेसच्या पूर्णेकर गटाचे म्हणणे आहे.एकीकडे राहुल गांधी धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही वाचवण्यासाठी विविध पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहेत. तर, दुसरीकडे व्यक्तिगत हितासाठी काँग्रेसमधील काही अंतर्गत गट शिवसेनेला मदत होईल, अशी भूमिका घेत असल्याचा आरोप पूर्णेकर गटाने केला आहे. या गटाने आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांची नुकतीच भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी आ. जितेंद्र आव्हाड यांच्यासह ठाणे जिल्हा इंटक काँग्रेस अध्यक्ष सचिन शिंदे, जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष अ‍ॅड. झिया शेख, जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते महेश पाटील आदी उपस्थित होते.ब्लॉक अध्यक्षांच्या भूमिकेबाबत प्रदेशाध्यक्षांकडे अहवाल सादर करण्यात येणार असून त्या दृष्टीने चर्चा सुरू आहे. मात्र, काही ठरावीक लोकांना फार घाई झाली आहे. जेव्हा सर्व ब्लॉक अध्यक्ष एकमुखाने बोलतात, तेव्हा त्यांचे म्हणणे अध्यक्षांना मानावे लागते. सात ते आठ लोकांच्या पाठिंब्यावर आनंद परांजपे निवडून येत असतील, तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. राष्ट्रवादीने काँग्रेसच्या सात ते आठ लोकांना घेऊन राजकारण करू नये. चर्चेतून मार्ग काढता येईल. स्वीकृत सदस्याच्या मुद्यावर स्वत: गटनेत्यांनी माझे नाव सुचवले होते. जर राष्ट्रवादीचे मनोहर साळवी हे तांत्रिकदृष्ट्या अपात्र झाले असतील, तर दुसरे नाव माझेच येणार, यात शिवसेनेने पाठिंबा देण्याचा संबंधच नाही, हे सर्व आरोप बिनबुडाचे आहेत.- मनोज शिंदे, शहराध्यक्ष, ठाणे-काँग्रेस

टॅग्स :congressकाँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक