शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
4
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
5
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
6
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
7
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
8
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
9
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
10
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
11
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
12
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
13
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
14
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
15
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
16
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
17
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
18
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
19
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
20
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न

ठाणे जिल्हाधिकार्यांना मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण, प्रमाणीकरणासाठी राजकीय पक्षांचे सहकार्य हवे !    

By सुरेश लोखंडे | Updated: September 18, 2023 19:28 IST

जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षाच्या प्रतिनिधीं,पदाधिकार्यांची बैठक आज जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. कार्यालयात पार पडली. यावेळी या कालावधीत मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण करण्याचे काम सुरू आहे.

ठाणे : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण सुरु आहे. या केंद्रांचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरणाच्या कामासाठी राजकीय पक्षांनी मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना आवश्यक ती मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी राजकीय पक्षांच्या पदाधिकार्यांना आज केले.

 जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षाच्या प्रतिनिधीं,पदाधिकार्यांची बैठक आज जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. कार्यालयात पार पडली. यावेळी या कालावधीत मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण करण्याचे काम सुरू आहे. याशिवाय कोकण विभाग पदवीधर मतदार नोंदणी आदींची माहिती देण्यासाठी ही बैठक आज पार पडली. यावेळी उपजिल्हानिवडणूक अधिकारी अर्चना कदम, मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील, रेवती गायकर, शीतल देशमुख, तहसिलदार वृषाली पाटील यांच्यासह शिवसेना,भारतीय जनता पक्ष,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, आप, समाजवादी पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आदी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मतदान केंद्र सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण आणि मतदान नोंदणीसंदर्भात विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान नोंदणी अधिकारी बैठका घेत आहेत. या बैठकांना राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहून सहकार्य करावे. मतदान केंद्रांची माहिती राजकीय पक्षांनी करून घ्यावी, अशी अपेक्षा त्यांनी या प्रतिनिधींकडून केली.

 जिल्ह्यात एकूण ६३ लाख ४३ हजार ८०६ मतदार आहे. यामध्ये ३४ लाख ३२ हजार ८८१ पुरुष व २९ लाख नऊ हजार ८२८ स्त्री मतदार आणि १०९७ तृतीयपंथीय मतदार आहेत. मतदारयादीमध्ये मतदारांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळेजिल्ह्यात १० सप्टेंबरच्या मतदारसंख्येनुसार एक हजार ५०० पेक्षा जास्त मतदार असलेल्या मतदान केंद्रांची संख्या १०२ झाली आहे. त्याशिवाय ठाणे जिल्ह्यात तळमजला सोडून पहिला, दुसरा व तिसऱ्या मजल्यावर एकूण २५१ मतदान केंद्रे आहेत. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व मतदान केंद्रे तळमजल्यावर असल्याबाबतची खात्री करण्याचे निर्देश सर्व मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.