शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
2
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
3
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
4
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
5
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
6
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
7
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
8
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
9
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
10
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
11
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
12
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
13
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
14
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
15
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
16
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
17
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
18
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
19
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
20
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...

ठाण्यात सोनसाखळी चोरांचे आव्हान कायम

By admin | Updated: October 3, 2015 02:24 IST

शहर पोलीस आयुक्तालयातील ठाणे, भिवंडी, कल्याण,उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाचही परिमंडळांत सोनसाखळी आणि मंगळसूत्र चोरीचे सत्र सुरूच आहे.

जितेंद्र कालेकर, ठाणेशहर पोलीस आयुक्तालयातील ठाणे, भिवंडी, कल्याण,उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाचही परिमंडळांत सोनसाखळी आणि मंगळसूत्र चोरीचे सत्र सुरूच आहे. गेल्या आठ महिन्यांत ७०४ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. गर्दीची ठिकाणे, ओसाड जागांना इराणी वस्तीतील सोनसाखळी चोरांनी लक्ष्य केले आहे. इराणी वस्तीवर कोम्बिंग आॅपरेशनसह गस्तीचे प्रमाण वाढवून बाहेरील जिल्ह्यांत आणि राज्यातूनही मंगळसूत्र चोरट्यांना जेरबंद केले आहे. त्यानंतर, काहीअंशी या गुन्ह्यांमध्ये फरक पडला असला तरी अजूनही त्यांचे आव्हान कायम आहे. त्यामुळे लोकमतच्या ‘काहीतरी कर ठाणेकर’ या मोहिमेद्वारे पोलिसांप्रमाणेच नागरिकांनीही हे गुन्हे रोखण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.ठाणे शहरातील शिवाईनगर, नीळकंठ हाईट्स, घोडबंदर रोड, नौपाडा, गोखले रोड, वर्तकनगर आणि उपवन या परिसरांत सकाळी मॉर्निंग वॉक, शाळेत मुलांना सोडविण्यासाठी आणि खरेदीसाठी जाणाऱ्या-येणाऱ्या गृहिणी तसेच वृद्ध महिलांना टार्गेट केले जाते. या वाढत्या प्रकारांमुळे सोनसाखळी चोरट्यांवर मोक्कांतर्गतही कारवाई करण्यात आली. तरीही, प्रकार सुरूच राहिल्यामुळे गर्दी आणि मोक्याच्या ठिकाणी गृहरक्षक दल आणि पोलिसांची गस्त वाढविण्यात आली. एखादी महिला पायी जात असताना पाठीमागून दुचाकीवरून येणाऱ्या दोघांपैकी मागे बसलेला हल्लेखोर सोनसाखळी हिसकावून क्षणार्धात गायब होतो. ठाणे जिल्हा रुग्णालयाजवळ २७ जून २०१५ रोजी नंदा दिलीप शेटे (४९) या महिलेने मोठ्या धाडसाने चोराला पकडले. हेच धाडस इतरांनीही दाखविण्याची गरज असल्याचा सल्ला शेटे यांनी इतर महिलांना दिला.कल्याणच्या आंबिवली भागातील इराणीच मुख्यत्वे सोनसाखळीच्या जबरी चोरीचे प्रकार करीत असल्याचे अनेकदा उघड झाले आहे. पाच महिन्यांपूर्वी ठाण्याचे पोलीस उपायुक्त सचिन पाटील आणि गुन्हे अन्वेषण विभागाने ३५० पोलिसांची फौज घेऊन जग्गू इलासी याच्यासह आठ जणांची आंबिवलीतून धरपकड केली. त्यांच्यावर मोक्कांतर्गत कारवाई केली होती. त्या वेळी एक किलो सोन्याचे दागिने जप्त केले होते. इराणींचे पोलिसांना आव्हानअंगाने मजबूत असलेले इराणी चोरटे सकाळी उठल्यापासून सावज हेरतात. त्यांच्यापैकी १५ ते १८ वयोगटांतील मुले मोटारसायकली चोरतात. १८ ते २५ वयोगट सोनसाखळी चोरण्याचा ‘उद्योग’ करतात. तर, २५ ते ३५ वयोगटांतील भामटे हे बतावणी करून फसवणुकीचे प्रकार करतात. घराबाहेरच जेवण करून पोलिसांना ते नेहमीच हुलकावणी देत असतात. काही प्रकारांत त्यांच्या घरच्या महिलाही त्यांना साथ देतात.पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी आयुक्तपदाची सूत्रे घेतल्यानंतर त्यांनीही सोनसाखळी चोरांना लक्ष्य करून टॉप २० आणि टॉप ५० या सोनसाखळी चोरट्यांची यादी बनविली. त्यानुसार, आंबिवलीच्या इराणी वस्तीत कोम्बिंग आॅपरेशनही केले होते.ठाणे शहर परिसरात घडलेल्या एखाद्या गुन्ह्याचा छडा थेट बाहेरील जिल्ह्यांतून आणि राज्याबाहेर जाऊन लावण्यात आल्याचे ठाणे शहरचे पोलीस उपायुक्त सचिन पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले. सोलापुरातून तीन साखळीचोरांना पकडण्यात आले.तर, गुन्हे अन्वेषण विभागात प्रत्येक झोनवाइज सहा विशेष पथके तयार केल्यानंतर पोलीस निरीक्षक रवींद्र डोईफोडे यांच्या पथकाने थेट उत्तर प्रदेशातून सहा जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडूनही मोठा ऐवज हस्तगत केला. ठाणे शहर आणि परिसरात महत्त्वाच्या ठिकाणांचे सर्वेक्षण करून त्या ठिकाणी मोटारसायकल आणि साध्या वेशातील पोलीस गस्त घालून सोनसाखळी चोरांना रंगेहाथ पकडत असल्याचे पोलिसांनी सांगितले.