शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

ठाणे : मंत्रिपदाकरिता जिल्ह्यात रस्सीखेच, पालकमंत्रिपदावर भाजप करणार दावा?

By संदीप प्रधान | Updated: July 10, 2022 11:34 IST

पालकत्व डोंबिवली की नवी मुंबईकडे?

संदीप प्रधान / अजित मांडकेठाणे  : एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्याने ठाणे जिल्ह्याला किती मंत्रिपदे मिळणार व जिल्ह्याचे पालकमंत्री कोण होणार, याची चर्चा सुरू झाली आहे. गणेश नाईक, रवींद्र चव्हाण व बालाजी किणीकर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. पालकमंत्रिपद भाजप आपल्याकडे राखण्याचा आग्रह धरील, अशी चर्चा आहे. तसे झाल्यास रवींद्र चव्हाण हे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री होऊ शकतात, असे बोलले जाते.

ठाणे जिल्ह्याकडे मुख्यमंत्रिपद असल्याने मंत्रिमंडळ तयार करताना प्रादेशिक समतोल साधताना ठाण्याला दोन कॅबिनेट व दोन राज्यमंत्रिपदे मिळतील, अशी चर्चा आहे. गणेश नाईक यांना ज्येष्ठ नेते म्हणून मंत्रिमंडळात भाजपला संधी द्यावी लागेल. याखेरीज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय रवींद्र चव्हाण यांचाही मंत्रिमंडळात समावेश होईल, असे समजते. शिंदे हे बालाजी किणीकर या आपल्या समर्थकाला राज्यमंत्रिपद मिळावे याकरिता प्रयत्न करतील. किणीकर हे वैद्यकीय पेशातील असल्याने आरोग्य राज्यमंत्री म्हणून त्यांचा समावेश केला जाऊ शकतो.

भाजपमधील ज्येष्ठ आमदार किसन कथोरे यांना मंत्रिपदाची अपेक्षा आहे. परंतु त्यांचा समावेश होईल किंवा कसे याबाबत मतमतांतरे आहेत. भाजपमधील केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यासोबत त्यांचा संघर्ष सुरू असल्याची चर्चा आहे. संजय केळकर (भाजप) व प्रताप सरनाईक (शिवसेना) हेही मंत्रिमंडळ समावेशाकरिता प्रयत्नशील आहेत. केळकर हे ठाण्यातील भाजपचा चेहरा आहेत. निष्ठावंत आहेत. भाजपमध्ये आयारामांची चलती असल्याचा आरोप खोडून काढायचा असेल तर केळकर यांचा समावेश केला जाईल, असे पक्षात बोलले जाते. सरनाईक यांना लागलीच राज्यमंत्रिपद दिले जाते की, कालांतराने महामंडळ दिले जाते याचे कुतूहल आहे.

काँग्रेसच्या काळात नाईकांनी भूषवले पदठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद कोणाकडे जाणार याचे कुतूहल आहे. मुख्यमंत्रीपद शिंदे यांच्याकडे असल्याने ते आपल्या एखाद्या खास मंत्र्याला ठाण्याचे पालकमंत्री करून जिल्ह्यावरील पकड घट्ट ठेवतील. मात्र दिल्लीतील भाजपचे चाणाक्य ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद भाजपकडे सोपवण्याची अट शिंदे यांच्यापुढे ठेवू शकतात. तसे झाल्यास शिंदे व फडणवीस या दोघांनाही जवळ असलेले रवींद्र चव्हाण यांच्याकडे पालकमंत्रिपद येऊ शकते. मात्र दिल्लीला भाजपमधील अधिक वजनदार नेता पालकमंत्री हवा असल्यास गणेश नाईक यांच्याकडे ही जबाबदारी दिली जाऊ शकते. यापूर्वी दोन्ही काँग्रेसचे सरकार सत्तेत असताना नाईक हे पालकमंत्री होते. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाPoliticsराजकारणGanesh Naikगणेश नाईक