शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

ठाण्यात पाचही तालुक्यांची कोरोना मुक्तीकडे वाटचाल, १८४ ग्रामपंचायतींत कोरोनाचा शिरकावच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2021 07:40 IST

  ग्रामीण भागात कोरोनाचे पहिले रुग्ण गुरवली व बोरिवली गावात ३१ मार्च २०२० ला सापडले होते. मात्र, १८४ ग्रामपंचायतींमध्ये अजूनही रोनाने शिरकाव केलेला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत १८,९७८ कोरोनारुग्ण सापडल्याची नोंद आहे. यातील आतापर्यंत ५८३ जणांचा मृत्यू झाला आहे. 

सुरेश लाेखंडे -

ठाणे :  जिल्ह्यातील  भिवंडी, शहापूर, मुरबाड, अंबरनाथ आणि कल्याण या  तालुक्यांतील गावांची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे. आता दिवसाकाठी बोटांवर मोजण्याइतके बाधित आढळून येत आहेत, तर मृतांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात घटत असून, काही दिवसांच्या अंतराने एखाद्‌दुसरे मृत्यू होत आहे.  ग्रामीण भागात कोरोनाचे पहिले रुग्ण गुरवली व बोरिवली गावात ३१ मार्च २०२० ला सापडले होते. मात्र, १८४ ग्रामपंचायतींमध्ये अजूनही रोनाने शिरकाव केलेला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत १८,९७८ कोरोनारुग्ण सापडल्याची नोंद आहे. यातील आतापर्यंत ५८३ जणांचा मृत्यू झाला आहे.    ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणेने आरोग्य अधिकारी मनीष रेंघे व अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी अर्चना देशमुख आदींच्या मार्गदर्शनाखाली २८ हजार ७४७ कोरोना चाचण्या केलेल्या आहेत. यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत ९५.५९ टक्के रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे.

गावांपेक्षा शहरांमध्ये रुग्ण अधिक -जिल्ह्यात सद्यस्थितीपर्यंत दोन लाख ४८ हजार ८०९ रुग्ण बाधित झाल्याची नोंद आहे. यातील सर्वाधिक शहरांमध्ये दोन लाख २९ हजार ८३१ रुग्ण बाधित आहेत. जिल्ह्यातील शहरी भागात पाच हजार ४६४ मृत्यूंची नोंद झाली आहे, तर गावपाड्यांमध्ये केवळ ५८३ जण दगावलेले आहेत. या रुग्णसंख्येपैकी गावपाड्यांमधील १८ हजार ९४ रुग्ण या कोरोनाच्या महामारीतून वाचवण्यात ३३ प्राथमिक आरोग्य केंद्रांना यश आले आहे. शहरी व ग्रामीण भागात कोरोनासदृश लक्षणे आढळलेल्या १० लाख ७५ हजार ५९५ जणांपैकी तपासणीअंति आठ लाख ७५ हजारांपेक्षा अधिक निगेटिव्ह आले. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याthaneठाणे