शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या खात्यावर वार्षिक सहा हजार तातडीने जमा करण्यासाठी ठाणे प्रशासन सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 19:38 IST

* असा आहे कालबध्द कार्यक्र म - - तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक , मंडळाधिकारी, नायब तहसीलदार यांचे प्रशिक्षण ६ फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. ७ ते १० फेब्रुवारीपर्यंत पात्र खातेदार शेतकºयांची यादी तयार करण्यात येईल. ही यादी संगणीकृत असेल. १० ते १२ फेब्रुवारी शेतकºयांचे कुटुंब निहाय वर्गीकरण करण्यात येईल. २० फेब्रुवारीपर्यंत परिशिष्ट अ आणि ब मध्ये हरकती देता येतील. २० ते २१ फेब्रुवारी या काळात आवश्यक दुरु स्त्या करून अंतिम यादी तहसील कार्यालयात तयार होईल. २६ फेब्रुवारीपर्यंत तालुका स्तरावर समितीमार्फत पडताळणी होऊन मग ती केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात येईल.

ठळक मुद्देअल्प व अत्यल्प भू धारक शेतक-यांना प्रती वर्ष सहा हजार रूपये आर्थिक सहाय्य तातडीनेजिल्हा प्रशासन यंत्रणा जिल्ह्यात सज्जप्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या योजनेची अंमलबजावणी तत्काळ

ठाणे : अल्प व अत्यल्प भू धारक शेतक-यांना प्रती वर्ष सहा हजार रूपये आर्थिक सहाय्य तातडीने मिळणून देण्यासाठी जिल्हा प्रशासन यंत्रणा जिल्ह्यात सज्ज झाली आहे. या प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या योजनेची अंमलबजावणी तत्काळ आणि अतिशय काटेकोरपणे करावी, यासाठी तालुका पातळीवर देखील कृषी सहायक, तलाठी, ग्राम सेवक यांची प्रशिक्षणे घेऊन ठाणे जिल्ह्यातील सर्व पात्र शेतक-यांना लाभ मिळेल असे पाहण्याचे निर्देश ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी मंगळवारी तातडीने घेतलेल्या बैठकीत संबंधीत अधिका-यांना दिले.नुकत्याच जाहीर झालेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या जिल्ह्यातील अंमलबजावणी संदर्भात मुख्य सचिवांनी देखील राज्यातील जिल्हाधिकाा-यांन व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सुचना दिल्या आहेत. या अनुषंगाने जिल्ह्यातील कृषी विभागाचे अधिकारी, अग्रणी बँक, महसूल विभागाचे अधिकारी यांना जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी आज पार पाडलेल्या जिल्हा समितीच्या पहिल्या बैठकीत निर्देश दिले. जिल्हाधिकारी या योजनेचे प्रमुख असून निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील नोडल अधिकारी आहेत.अल्प व अत्यल्प भू धारक शेतक-यांना प्रती वर्ष सहा हजार रूपये आर्थिक सहाय्य देण्यासाठी ही ‘प्रधानमंत्री किसान सन्मान योजना’ आहे. ज्या कुटुंबांचे सर्व ठिकाणाचे मिळून लागवडीलायक क्षेत्र दोन हेक्टरपर्यंत आहे. त्यांच्यासाठी ही योजना आहे. जिल्ह्यातील विविध सनियंत्रण समित्यांमार्फत या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली. यामध्ये तालुका स्तरीय व क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी व कर्मचारी याना प्रशिक्षण देणे महत्वाचे असून उद्यापासून हे प्रशिक्षण सुरु करावे असे जिल्हाधिकाºयांनी सांगितले. कालबध्द पद्धतीने ठाणे जिल्ह्यात याची अंमलबजावणी झाली पाहिजे. येणा-या तक्ररींचे निराकरणही व्यवस्थित व्हावयास हवे. तालुका पातळीवर प्रांत अधिकारी अध्यक्ष व उप विभागीय कृषी अधिकारी सदस्य व तहसीलदार नोडल अधिकारी आहेत. याशिवाय ग्रामस्तरीय समित्यांमध्ये तलाठी समिती प्रमुख व ग्रामसेवक सदस्य आहेत. ग्रामस्तरीय समिती पात्र शेतकरी कुटुंबांची निश्चिती करून विशिष्ट नमुन्यात त्यांची नोंद घेईल. यामध्ये शेतकºयांची आधार, बँक खाते, मोबाईल क्र मांक आदी माहिती भरली जाणार आहे. यात तलाठ्यांची मुख्य भूमिका आहे.* असा आहे कालबध्द कार्यक्र म -- तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक , मंडळाधिकारी, नायब तहसीलदार यांचे प्रशिक्षण ६ फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. ७ ते १० फेब्रुवारीपर्यंत पात्र खातेदार शेतकºयांची यादी तयार करण्यात येईल. ही यादी संगणीकृत असेल. १० ते १२ फेब्रुवारी शेतक-यांचे कुटुंब निहाय वर्गीकरण करण्यात येईल. २० फेब्रुवारीपर्यंत परिशिष्ट अ आणि ब मध्ये हरकती देता येतील. २० ते २१ फेब्रुवारी या काळात आवश्यक दुरु स्त्या करून अंतिम यादी तहसील कार्यालयात तयार होईल. २६ फेब्रुवारीपर्यंत तालुका स्तरावर समितीमार्फत पडताळणी होऊन मग ती केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात येईल.

टॅग्स :thaneठाणेFarmerशेतकरी