शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
4
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
5
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
8
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
9
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
10
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
11
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
12
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
13
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
14
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
15
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
16
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
17
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
18
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
20
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक

ठाणेकरांचाही अपेक्षाभंगच ?

By admin | Updated: March 30, 2017 06:41 IST

बृहन्मुंबईतील ५०० चौ.फू. क्षेत्रफळाच्या सदनिकाधारकांना मालमत्ताकरात माफी देण्याच्या वचननाम्यातील घोषणेपासून

ठाणे : बृहन्मुंबईतील ५०० चौ.फू. क्षेत्रफळाच्या सदनिकाधारकांना मालमत्ताकरात माफी देण्याच्या वचननाम्यातील घोषणेपासून शिवसेनेने घूमजाव केल्याने त्याच धर्तीवर ठाणेकरांनाही सवलत मिळण्याची शक्यता मावळली आहे. ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल हे आगामी वर्षीचा अर्थसंकल्प सादर करतील, मात्र त्यामध्ये वचननाम्यातील लोकानुनयी घोषणांचा अंतर्भाव नसेल, असे संकेत प्राप्त होत आहेत.बृहन्मुंबईत ५०० चौ.फू. क्षेत्रफळाच्या सदनिकाधारकांना मालमत्ताकरात संपूर्ण माफी, तर ५०० ते ७०० चौ.फू. क्षेत्रफळाच्या सदनिकाधारकांना मालमत्ताकरात सवलत देण्याची घोषणा शिवसेनेने वचननाम्यात केली होती. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात ती घोषणा बृहन्मुंबईत लागू होणे अपेक्षित होते. मात्र, त्याचा समावेश आयुक्तांनी केलेला नाही. ठाण्यातही ५०० चौ.फू. क्षेत्रफळाच्या सदनिकाधारकांना मालमत्ताकरात सवलत देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, मुंबईतच घोषणा हवेत विरली, तर ठाण्यात तिची अंमलबजावणी होण्याची चिन्हे अत्यंत धूसर आहेत. मुंबईकरांपेक्षा ठाणेकरांनी यावेळच्या निवडणुकीत सेनेला भरभरून मते दिली. आतापर्यंत शिवसेनेला कधीही ठामपात न मिळालेले बहुमत प्राप्त झाले असल्याने आता ठाणेकरांच्या ऋणातून शिवसेना कशी उतराई होणार, असा सवाल केला जात आहे.निवडणुकांमुळे लांबलेल्या ठाणे महापालिकेच्या आगामी वर्षाच्या अर्थसंकल्पास अखेर मुहूर्त मिळाला असून गुरु वारी सकाळी आयुक्त संजीव जयस्वाल तो सर्वसाधारण सभेपुढे सादर करतील. सरकारने करवसुलीचे १०० टक्के उद्दिष्ट गाठण्याची तंबी सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांना दिली आहे. ठाणे महापालिकेस राज्य सरकारच्या आदेशांची किती अंमलबजावणी करता आली आहे, हेदेखील स्पष्ट होणार आहे. अर्थसंकल्पात शहराचा पुढील पाच वर्षांच्या विकासाचा आराखडा सादर केला जाण्याची शक्यता असून करसवलतींबरोबरच करवाढीची शक्यता कमी असल्याची चर्चा आहे. मनपा निवडणुकीत शिवसेनेने घोषणांचा पाऊस पाडला होता. या घोषणांच्या पूर्ततेसाठी अर्थसंकल्पात किती ठोस पावले उचलली, हे उद्याच स्पष्ट होईल. (प्रतिनिधी)गेल्या वर्षभरात शहरात रस्ते रुंदीकरण कामाचा धडाका अभियांत्रिकी विभागाने लावला आहे. याशिवाय, कळवा येथील चौपाटी प्रकल्पाची आखणी महापालिकेने केली असून येत्या काळात यासाठीची निविदा प्रक्रि या पूर्ण केली जाणार आहे. महापालिका निवडणुकीनंतर जयस्वाल यांच्या बदलीची चर्चा जोरात सुरू झाली आहे. शेजारील नवी मुंबई महापालिकेचे धडाकेबाज आयुक्त तुकाराम मुंढे यांची एसटी महामंडळात अलीकडेच बदली केली गेली.ही पार्श्वभूमी पाहता जयस्वाल यांच्या संकल्पनेतून पुढे आलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या अंमलबजावणीचे हे वर्ष असल्याने राज्य सरकार त्यांना प्रकल्प साकारण्याची संधी देते की, त्यापूर्वीच त्यांची बदली होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.ठामपा आयुक्त म्हणून जयस्वाल यांचा हा तिसरा अर्थसंकल्प. गेल्यावर्षी आखलेले महत्त्वाचे प्रकल्प प्रगतीपथावर अथवा निविदा प्रक्रि येत असल्याने आणखी कोणत्या नव्या प्रकल्पांचा समावेश केला जातो, याविषयी उत्सुकता आहे.