शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
2
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
3
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
4
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
5
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
6
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा
7
Ola Electric Q4 results: 'ओला'चे डोळे ओले! तोटा वाढून ₹८६० कोटींवर, महसुलातही ५९% ची घसरण
8
पाकिस्तानात गेलेल्या महिलेने हेरगिरी केल्याचा संशय, नागपुरात गुन्हा दाखल
9
राज्यसभेच्या ८ जागांसाठी १९ जूनला मतदान; मतांचे गणित जुळवणं सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान
10
RCB समोर पंजाबी शेर ढेर! रडत खडत शंभरी गाठली; पण PBKS च्या नावे झाला हा लाजिरवाणा विक्रम
11
"पाकिस्तानच्या गोळीबारामुळे बाधित पूंछ आणि इतर भागांसाठी मदत पॅकेज...", राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र
12
IPL 2025 PBKS vs RCB Qualifier 1 : "आप आये बहार आयी"; जोश हेजलवूडनं ७ चेंडूत अय्यरह-इंग्लिसचा खेळ केला खल्लास! अन्...
13
प्राची पिसाटला 'तो' मेसेज माझ्याच अकाउंटवरून गेला, पण...; सुदेश म्हशिलकरांचा अभिनेत्रीलाच उलट प्रश्न
14
आधी यादीतले कुख्यात दहशतवादी भारताकडे सोपवा, तरच...; भारताने पाकिस्तानला पुन्हा खडसावले!
15
RCB vs PBKS: आरसीबीचा मास्टरस्ट्रोक! प्लेईंग इलेव्हनमध्ये घातक गोलंदाजाचं नाव, पंजाबचं टेन्शन वाढलं
16
अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवर गोळीबार, युद्धजन्य परिस्थिती; शरीफ सरकारवर नवं संकट
17
IPL 2025 Qualifier 1 : पावरप्लेमध्ये RCB कडून यश दयालसह भुवीचा जलवा! PBKS ची हिट जोडी ठरली फ्लॉप
18
सीबीआयची पासपोर्ट कार्यालयात धाड; लाच घेताना अधिकाऱ्यासह दलालास अटक
19
Video : "टॉयलेट वापरायचाय पण विमानतळावर पाणीच नाही"; पाकिस्तानी महिलेने केली स्वतःच्या देशाची पोलखोल
20
विम्याचा लाभ, वैद्यकीय सुविधेसह टोलमाफी; वारकऱ्यांसाठी राज्य सरकारने घेतले निर्णय

ठाण्यात पुन्हा रंगणार ‘गच्चीवरच्या गप्पा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 03:46 IST

गरमागरम मक्याची भाजलेली कणसं, वाफाळलेला चहा, दिग्गज मंडळी तसेच अतुलनीय कामगिरी करणाऱ्यांच्या अनुभवासह ठाण्यात पुन्हा एकदा ‘गच्चीवरच्या गप्पा’ रंगणार आहेत.

- प्रज्ञा म्हात्रेठाणे - गरमागरम मक्याची भाजलेली कणसं, वाफाळलेला चहा, दिग्गज मंडळी तसेच अतुलनीय कामगिरी करणाऱ्यांच्या अनुभवासह ठाण्यात पुन्हा एकदा ‘गच्चीवरच्या गप्पा’ रंगणार आहेत. तीन वर्षांच्या ब्रेकनंतर या उपक्रमाला नवसंजीवनी मिळत असून ठाणेकरांच्या आग्रहाखातर नव्या जोमाने हा उपक्रम सुरू होत आहे. पावसाळ्याचा मुहूर्त गच्चीवरच्या गप्पांसाठी साधला आहे. या उपक्रमाचे पहिले पुष्प आॅगस्ट महिन्यात गुंफले जाणार आहे.सोशल मीडियाचे जाळे पसरल्यामुळे आजकाल प्रत्यक्षात भेटणे कमी झाले आहे. कट्ट्याकट्ट्यांवर बसून रंगणाºया गप्पाटप्पा या आता सोशल मीडियातच गुरफटल्या गेल्या आहेत. त्यामुळे कट्ट्यावर बसून सायंकाळी रंगणाºया कट्ट्यावरच्या गप्पा या लुप्त होत चालल्या आहेत. या गप्पांना नवसंजीवनी मिळावी, प्रत्यक्षात एकमेकांमधला संवाद वाढावा, यासाठी ज्येष्ठ चित्रकार सदाशिव कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून ‘गच्चीवरच्या गप्पा’ हा उपक्रम सुरू करण्यात आला. प्रत्येकाकडे ज्ञानाचे भांडार असते. परंतु, सोशल मीडियाच्या दुनियेत प्रत्यक्षात भेटण्यापेक्षा चॅटिंगच्या माध्यमातून संवाद करणे नेटकरी पसंत करतात. त्यामुळे प्रत्यक्ष होणारी भेट ही सोशल मीडियाच्या वर्तुळात अडकली. हे सर्व लक्षात घेऊन आपल्या मनातील भावना एकमेकांसोबत व्यक्त करण्यासाठी कुलकर्णी यांनी नवे व्यासपीठ तयार केले. मनात राहिलेले विषय हे बोलायचे राहून जातात. या विषयांना गप्पांच्या माध्यमातून दिशा मिळावी, म्हणूनच या उपक्रमाची निर्मिती करण्यात आली. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम सुरू झाला. पहिल्या कार्यक्रमाची सुरुवात गरमागरम भजी आणि वाफाळलेल्या चहाने झाली. सुरुवातीला काहीही बोलावे, अशा स्वरूपाचा हा उपक्रम होता. पाच वर्षांपूर्वी कुलकर्णी यांच्या भास्कर कॉलनी येथील लक्ष्मीनारायण सोसायटीच्या गच्चीवर उपक्रमाचा पहिला कार्यक्रम झाला. महिन्यातून एकदा हा कार्यक्रम आयोजित केला जातो. त्यामुळे पहिल्या वर्षी १२ कार्यक्रम झाल्यानंतर आर्थिक अडचणींमुळे या उपक्रमाने पॉझ घेतला. त्यानंतर, दीड वर्षाने पुन्हा हा उपक्रम सुरू झाला आणि पुन्हा एकदा या उपक्रमात खंड पडला. दरम्यानच्या काळात ज्येष्ठ चित्रकार डॉ. सुहास बहुलकर, अभिनेत्री संपदा जोगळेकर, चित्रकार विजयराज बोधनकर, ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक, रागिणी सामंत, शिरीष मिठबावकर अशा अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावून गच्चीवरच्या गप्पा रंगवल्या. तीन वर्षांच्या ब्रेकनंतर हा उपक्रम ठाणेकर रसिकांच्या आग्रहाखातर पुन्हा सुरू होत आहे. उपक्रमाचा पहिला कार्यक्रम अभिनेते शरद पोंक्षे यांच्या उपस्थितीत आॅगस्ट महिन्यात टाउन हॉल किंवा ब्राह्मण सेवा संघ या ठिकाणी घेतला जाणार आहे. यंदाच्या या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे वैजयंती आपटे, तेजश्री प्रधान, मुक्ता बर्वे, शीतल क्षीरसागर यासारख्या अनेक मातब्बर मंडळींचे अनुभव ऐकायला तर मिळतीलच. परंतु, कॅन्टीनवाला, महापालिकेचा कर्मचारी, अतुलनीय कामगिरी केलेल्या ठाणेकरांचीदेखील मुलाखत रसिकांना ऐकायला मिळणार आहे.व्हॉट्सअ‍ॅपवरून हा गप्पाटप्पांचा ग्रुप तयार झाला आणि या उपक्रमाच्या निमित्ताने ही मंडळी प्रत्यक्षात भेटली.नाट्य परिषदेचे पदाधिकारीदेखील या गप्पांमध्ये सहभागी होणार आहेत.‘तंबुतला सिनेमा’ करणारे रीमा अमरापूरकर व नीता देवलकर हे सिनेमाचे अनुभवकथन करतील.

टॅग्स :thaneठाणेnewsबातम्या