शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
4
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
5
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
6
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
7
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
8
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
9
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
10
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
11
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
12
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
13
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
14
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
15
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
16
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
17
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
18
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
19
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

आयआयटीकडून पत्रीपुलाची पुन्हा एकदा चाचणी करा; पालकमंत्र्यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 01:04 IST

आवश्यक ती डागडुजी करून काही दिवसांनी पूल पाडण्यास हरकत नसेल, तर त्यादृष्टीने पावले उचलण्याचे आदेशही पालकमंत्र्यांनी दिले

डोंबिवली : कल्याण येथील ब्रिटिशकालीन पत्रीपुलावरून हलकी वाहने जाऊ शकतात की नाही, यासंदर्भात तातडीने आयआयटीच्या अभियंत्यांशी चर्चा करून फिजिबिलिटी अहवाल पुन्हा एकदा घेण्याचे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी एमएसआरडीसीला दिले. आवश्यक ती डागडुजी करून काही दिवसांनी पूल पाडण्यास हरकत नसेल, तर त्यादृष्टीने पावले उचलण्याचे आदेशही पालकमंत्र्यांनी दिले. त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासन हा पूल शुक्रवारी पाडणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झालेला असतानाच पूल पाडण्याचे काम शनिवारपासून सुरू होणार असल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे.गणेशोत्सवापूर्वी पत्रीपूल पाडल्यास त्यामुळे वाहतूककोंडीची गंभीर समस्या निर्माण होईल. दहीहंडीसह गणेशोत्सवावरही या पाडकामाचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता गृहीत धरून महापौर विनीता राणे, विश्वनाथ राणे, दीपेश म्हात्रे, राजेश मोरे आदींनी पालकमंत्री एकनाथ शिंदेंची गुुरुवारी वेळ घेतली होती. त्यानुसार, मंत्रालयात दुपारी २ ते ४ या वेळेत त्यांची पालकमंत्र्यांसोबत या महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली.मुंब्रा बायपाससाठी १० सप्टेंबरची डेडलाइन ठरवण्यात आली आहे. मुंब्रा बायपास सुरू झाल्यानंतर पत्रीपुलाचे काम तातडीने हाती घेण्यास हरकत नाही. तोपर्यंत पत्रीपुलाची तातडीची डागडुजी करून कल्याण-डोंबिवलीकरांची गैरसोय दूर करावी, असे आदेश एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले.पालकमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार आयआयटीच्या तज्ज्ञांसमवेत तातडीने चर्चा केली जाईल, असे एमएसआरडीसीच्या वरिष्ठ अभियंत्यांनी सांगितले. पालकमंत्र्यांंच्या मध्यस्थीमुळे या समस्येतून निश्चितच सुवर्णमध्य निघेल, काही ना काही तोडगा निघेल, असा विश्वास विश्वनाथ राणे यांनी व्यक्त केला.मध्य रेल्वे प्रशासनाने फेब्रुवारी महिन्यात या पुलासंदर्भात पत्र दिले होते. हा पूल हलक्या वाहनांसाठी निश्चितच चालेल. मात्र, अवजड वाहनांची वाहतूक बंद करा, असे या पत्रात म्हटले होते. असे असतानाही अंधेरी आणि लोअर परेल येथे घडलेल्या पादचारी, उड्डाणपुलांच्या काही दुर्घटनांची धास्ती घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे का, असा सवाल नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी केला. पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार पुलाची डागडुजी करावी. वाहतुकीसाठी पूल सुरू ठेवून वाहतूककोंडी सोडवावी, अशी मागणीही म्हात्रे यांनी यावेळी केली.शनिवारपासून पाडकामपालकमंत्र्यांनी पुलावरून हलक्या वाहनांची वाहतूक होऊ शकते की नाही, याबाबत आयआयटीकडून अहवाल मागविण्याचे आदेश दिले असले तरी, मध्य रेल्वेने मात्र पुलाचे पाडकाम शनिवारपासून सुरू होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

टॅग्स :kalyanकल्याण