शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

Coronavirus: कोरोना टेस्ट करा, नाहीतर दुकान बंद ठेवा; उल्हासनगर महापालिकेचा फतवा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2020 15:12 IST

उल्हासनगरात कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी महापालिका विविध उपक्रम राबवित आहे. त्याचे फलित म्हणजे कोरोना रुग्णाचे प्रमाण कमी होऊन रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१ टक्के पेक्षा जास्त आहे.

सदानंद नाईक 

उल्हासनगर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दुकानदारांनी कोरोना टेस्ट करा. अन्यथा दुकानें बंद ठेवा. असा फतवा महापालिकेने काढल्याने दुकानदारात असंतोष निर्माण झाला. तर कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी दुकानदारांनी अँन्टीजेन चाचणी करणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया जनसंपर्क अधिकारी युवराज भदाने यांनी पत्रकारांना दिली आहे.

 उल्हासनगरात कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी महापालिका विविध उपक्रम राबवित आहे. त्याचे फलित म्हणजे कोरोना रुग्णाचे प्रमाण कमी होऊन रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१ टक्के पेक्षा जास्त आहे. दरम्यान दुकानदार व हॉटेल चालकांचा असंख्य नागरिकांशी संपर्क होत असल्याने, त्यांची अँन्टीजेन टेस्ट करण्याचा निर्णय महापालिकेने मध्यंतरी घेतला. मात्र दुकानदार अँन्टीजेन चाचणी करण्यास पुढे येत नसल्याने, महापालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांची कोंडी झाली. दोन दिवसापूर्वी कॅम्प नं-३ व ५ परिसरातील दुकानदारांनी कोरोना टेस्ट करा. त्यानंतर दुकानें सुरू ठेवा. असे महापालिका अधिकारी व कर्मचारी सांगत एक अर्ज दुकानदारांना दिल्याचा प्रकार उघड झाला. या प्रकाराने संतप्त झालेल्या दुकानदारांनी व्यापारी संघाचे अध्यक्ष व महापालिका विरोधी पक्षनेते किशोर वानावारी, स्थानिक नगरसेवक सतरामदास जेसवाणी यांच्याकडे धाव घेवून नाराजी व्यक्त केली. 

व्यापारी संघटनेचे अध्यक्ष व विरोधी पक्षनेते किशोर वनवारी यांनी महापालिका आयुक्तांना सदर प्रकार सांगणार असल्याची प्रतिक्रिया दिली. नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनीही असाच निर्णय घेतल्यावर व्यापाऱ्यांनी विरोध केला होता. अखेर सक्तीने कोरोना टेस्ट घेण्याचा निर्णय मागे घेतल्याचे वनवारी म्हणाले. सक्तीने टेस्ट घेतल्यास व्यापारी वर्ग विरोध करण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. कोरोना महामारी व लॉकडाऊन मुळे व्यापारी यांचे मोठे नुकसान झाले असून अनेकांनी व्यापार बंद केला. अनलॉक मुळे व्यापार रुळावर येत असताना कोरोना व अँन्टीजेन टेस्ट शक्तीचे केल्यास व्यापारी मध्ये असंतोष निर्माण होणार असल्याची प्रतिक्रिया अनेक व्यापाऱ्यांनी दिली आहे.

 अँन्टीजेन टेस्ट देणे काळाची गरज - भदाने 

शहरात कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी महापालिकेने नागरिकांचा मोठ्या प्रमाणात संपर्क येत असलेल्या दुकानदारांची अँन्टीजेन टेस्ट घेण्याचा निर्णय घेतला. शासनाचाही तसा निर्णय असून दुकानदारांनी नागरिक व शहरहितासाठी अँन्टीजेन टेस्ट करा. अशी प्रतिक्रिया महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी युवराज भदाने यांनी पत्रकारांना दिली आहे. कॅम्प नं-४ परिसरातील एका हॉटेल मालकाचा सिलेंडरचा स्फोट झाल्याने मृत्यू होऊन १० पेक्षा जास्त जण जखमी झाले होते.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस