शहरं
Join us  
Trending Stories
1
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
2
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
3
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
4
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
5
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
6
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
7
चिनी मालाने दिला दगा, पहलगाम हल्ल्यानंतर तब्बल ९६ दिवस लपलेले दहशतवादी असे सापडले
8
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
9
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
10
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
11
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
12
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
13
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
14
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
15
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
16
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
17
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
18
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
19
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
20
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?

उल्हासनगरात शस्त्रधारी झुंडीची दहशत, विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

By सदानंद नाईक | Updated: July 17, 2024 18:39 IST

झुंडीचा बंदोबस्त करा, नाहीतर नागरीक कायदा हातात घेतली... ठाकरेसेनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय बोडारे यांचा पोलिसांना इशारा

उल्हासनगर : हातात घातक शस्त्र घेऊन तरुणांच्या झुंडी कोणासाठी परिसरातून फिरतात, त्यांचा वेळीच बंदोबस्त करा. नाहीतर नागरिक कायदा हातात घेतली. असा इशारा ठाकरेसेनेचे कल्याण जिल्हाध्यक्ष धनंजय बोडारे यांनी विठ्ठलवाडी पोलिसांना देताच, पोलिसांनी १५ जणांच्या टोळक्यावर गुन्हा दाखल करून काहीजणांना ताब्यात घेतले आहे.

 उल्हासनगर कॅम्प नं-४, संतोषनगर परिसरातून १५ ते २० जणांचे टोळके हातात घातक शस्त्र घेऊन रात्रीच्या वेळी धुमाकूळ घालते. अशी माहिती स्थानिक नागरिकांनी ठाकरेसेनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय बोडारे यांना गेल्या आठवड्यात दिली. बोडारे यांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता, शस्त्रधारी झुंडीचा प्रकार उघड झाला. त्यांनी विठ्ठलवाडी पोलिस ठाणे गाठून परिसरात झालेल्या प्रकारची माहिती दिली. तसेच परिसरातील याप्रकाराची माहिती पोलिसांना नाही का? यावर काय कारवाई केली? आदी प्रश्नांचा भडीमार त्यांनी पोलिसांना केला. तेंव्हा हा प्रकार पोलिसांना माहीत नसल्याचे उघड झाले. बोडारे यांनी दिलेल्या माहितीनुसार व तपासाअंती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी १५ पेक्षा जास्त जणांच्या झुंडीवर गुन्हा दाखल करून, काही जणांना ताब्यात घेतल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक पडवळ यांनी दिली आहे.

 शहरातील विविध चौक, जुन्या इमारती, रेल्वे स्टेशन परिसरात नशेखोर, गर्दुल्ले, भुरटे चोर रात्रीच्या वेळी धूमकुळ घालत असल्याचे चित्र आहे. असाच प्रकार संतोषनगर मध्ये गेल्या आठवड्यात घडला. बोडारे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे झुंडीवर गुन्हा दाखल झाला. शहरातील विविध भागात अश्या झुंडीची दहशत निर्माण झाली. यापूर्वी खेमानी परिसरात अश्या झुंडीने धुमाकूळ घातला होता. तर उल्हासनगर, विठ्ठलवाडी व शहाड रेल्वे स्टेशन परिसर, स्कायवॉक आदी ठिकाणी अश्या झुंडीची दहशत आहे.

 स्कायवॉकवर खून उल्हासनगरच्या स्कायवॉकवर एका तरुणाने दारू पिण्यासाठी पैशे दिले नसल्याच्या रागातून टोळक्याने त्याच्यावर शस्त्राने वार करून खून केला होता. तसेच एका वाहतूक पोलिसांवर जीवघेणा हल्ला झाला होता. हे कमी म्हणून की काय? रेल्वे स्टेशनच्या बंद निवासस्थानी एका तरुणीवर बलात्काराचा प्रकार उघड झाला होता. लूटमार, हाणामारी, फसवणूक आदी गुन्ह्याचीही नोंद आहे.

 रिक्षाची तोडफोड उल्हासनगर रेल्वे स्टेशन मध्ये अश्याच टोळक्याकडून रिक्षांची तोडफोड करण्याचे प्रकार यापूर्वी झाले. रात्रीचे १० नंतर स्कायवॉक व स्टेशन परिसरातून नागरिक जाण्यास धजावत नाही. अशी दहशत झुंडीची आहे. 

टॅग्स :PoliceपोलिसPolice Stationपोलीस ठाणे