शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
2
कामगिरी दमदार; पीएम मोदींच्या हनुमानाची 'हनुमान उडी', LJP(R) इतक्या जागांवर आघाडीवर...
3
बिहार निवडणूक निकाल: राघोपुरात तेजस्वी यादव पिछाडीवर; लखीसरायमध्ये विजय सिन्हांची आघाडी कायम
4
बिहारमध्ये NDA ला आघाडी, भाजप-जेडीयूच्या जागा वाढल्या; तेजस्वी यादवांना 'या' ५ चुका पडल्या महागात!
5
बिहारमध्ये RJD ला सर्वाधिक मते, पण केवळ ३५ जागांवर आघाडी; भाजपा-जेडीयूला किती टक्के मते मिळाली?
6
“इंदुरीकर महाराज, फेटा खाली उतरवू नका, सोशल मीडियावरील छपरींकडे दुर्लक्ष करा”; कुणाचे आवाहन?
7
"आता काँग्रेस पूर्वीपेक्षा अधिक…"; आपल्याच पक्षासंदर्भात काय बोलले शशी थरूर? भाजपच्या धोरणांकडे 'इशारा'!
8
Utpatti Ekadashi 2025: उत्पत्ती एकादशीला 'या' ६ उपायांनी पापमुक्त व्हा; पाहा पूजाविधी!
9
Maithili Thakur : "मला माझं यश दिसतंय, पण...", आघाडी घेताच लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूरची पहिली प्रतिक्रिया
10
नेटबँकिंग वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! SBI, HDFC सह सर्व बँकांच्या वेबसाइटचे डोमेन बदलले; काय आहे कारण?
11
बिहार निवडणुकीत बाहुबलींचा दबदबा कायम; 'या' 12 जागांनी वाढवली उत्सुकता, कोण पुढे? पाहा...
12
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: बिहारमध्ये भाजपा-जेडीयू युतीला ऐतिहासिक आघाडी; 'राजद'ला मोठा दणका
13
Bihar Result 2025: बिहारच्या निकालात NDA ला प्रचंड बहुमत; आता BJP-JDU मध्ये 'बिग ब्रदर'साठी चुरस
14
Bihar Election 2025 Result: बहुचर्चित मैथिली ठाकूर आघाडीवर, ‘ती’ ६० टक्के मते ठरणार निर्णायक
15
IND vs SA : बुमराहनं 'परफेक्ट सेटअप'सह असा केला सलामीवीरांचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
16
भारीच! हातात हात, तयारीत भक्कम साथ; बॉयफ्रेंडच्या मदतीने 'ती' झाली DSP, 'तो' ही आहे अधिकारी
17
तुमचं मुल १८व्या वर्षीच होईल श्रीमंत! बालदिनी NPS वात्सल्य योजनेद्वारे बाळाचं भविष्य करा सुरक्षित
18
दीड वर्षात सिनेमा बंद होणार! मांजरेकरांच्या वक्तव्यावर अजिंक्य देव म्हणाले, 'अजिबात नाही...'
19
Bihar Election Result 2025: शिंदेसेनेच्या नेत्याचा जावई बिहार निवडणुकीत पिछाडीवर; JDU ची आघाडी
20
निवडणूक आयोगाचा अनागोंदी कारभार, वेबसाईटवर तांत्रिक चुका; आघाडीवरील उमेदवार 'पराभूत' म्हणून घोषित!
Daily Top 2Weekly Top 5

तरंगत्या रंगमंचासाठी निविदा; वेटलॅण्ड कमिटीचा आक्षेप झुगारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 00:56 IST

सत्ताधाऱ्यांपुढे प्रशासनाची नांगी

ठाणे : ऐन निवडणुकीच्या धामधुमीत उपवन तलावाच्या ठिकाणी दशक्रिया विधी घाट आणि तरंगता रंगमंच उभारण्याच्या कामासाठी ठाणे महापालिकेने पुन्हा निविदा मागवल्या आहेत. राजकीय दबावाखालीच नांगी टाकून प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. यात तरंगत्या रंगमंचासाठी सल्लागार, तर बुरुजांसाठी कंत्राटदार नियुक्तीच्या निविदांचा समावेश आहे.न्यायालयाच्या आदेशाने नियुक्त झालेल्या वेटलॅण्ड कमिटीने त्याला तीव्र आक्षेप नोंदवला असून उपवन तलावाकाठची प्रस्तावित आणि मासुंदा तलावाच्या काठी सुरू असलेल्या कामांना तातडीने स्थगिती देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना करणार असल्याची माहिती कमिटीने दिली. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाकडून १३२ पाणथळ जागांचे सर्वेक्षण सुरू आहे. त्यात ठाणे शहरातील ३४ ठिकाणांचा समावेश असून उपवन तलाव त्यापैकी एक आहे. वेटलॅण्ड कमिटीमार्फत सुरू असलेले हे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात असून येत्या चार महिन्यांत ठिकाणे अंतिम करून त्याबाबतची अधिसूचना काढली जाणार आहे. त्यानंतर ,पाणथळ जागा २०१० साली ज्या स्थितीत होत्या, तशा पूर्ववत कराव्या लागणार आहेत. त्यामुळे उपवन तलावाकाठी बनारस घाट व इतर जी काही कामे झाली असतील, ती सुद्धा काढावी लागणार आहेत.असे असताना पालिकेने उपवन तलावाजवळ बुरूज आणि दशक्रिया विधी घाट तसेच तलावात फ्लोटिंग स्टेज उभारणीसाठी तब्बल २२ कोटी २९ लाख रु पये खर्चाचा घाट घातला आहे. पाणथळामध्ये तलावाचा समावेश असतानाही केवळ अधिसूचना निघाली नाही, असे काहीसे कारण पालिकेने पुढे केले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रस्तावित पाणथळ जागांमध्ये अशा स्वरूपाची कामे करणे कायदेशीर ठरणार नाही, हे पालिकेला माहीत असायला हवे. आम्ही ते वेगळे सांगण्याची गरज नाही, असे जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांचे म्हणणे होते. या कामांवरून बराच वादंग झाल्यानंतर पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या कामांना स्थगिती देण्याचे आदेश दिले होते. मात्र, ती करण्यासाठी पालिकेवर राजकीय दबाव आल्याने त्यापुढे नमते घेऊन प्रशासनाने कामांसाठी निविदा प्रसिद्ध केल्या आहेत.सल्लागाराच्या अहवालाशिवाय मंजुरीतरंगत्या रंगमंचाच्या उभारणीसाठी नऊ कोटी ७० लाख रु पये खर्च येईल, असे पालिका प्रशासनाने आपल्या प्रस्तावात नमूद केले होते.मात्र, त्यासाठी सर्वेक्षण, डिझाइन आणि सविस्तर आराखडा तयार करण्यासाठी आता सल्लागार नेमला जाणार आहे.सल्लागार नेमल्याखेरीज अंदाजखर्च काढता येत नाही. मग, पालिकेने आधीच १० कोटी रु पये खर्चासाठी वित्तीय मंजुरी कशी काय मिळवली, हा प्रश्न मात्र यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.कामाचे नाव बदललेउपवन तलावाकाठी दशक्रि या विधी घाट उभारला जाणार असल्याचा प्रस्ताव पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला होता. या घाटामुळे उपवन तलावाचे सौंदर्य धोक्यात येईल, अशी भीती व्यक्त करून त्याला तीव्र विरोध झाला होता.त्यानंतर, दोन दिवसांपूर्वी पालिकेने प्रसिद्ध केलेल्या निविदेत या घाटाचे नाव बदलून बुरूज बांधणे व अन्य स्थापत्य कामेअसा उल्लेख केला आहे. एकूणच पुन्हा यानिमित्ताने आणखीएक घोटाळा पालिकेत होऊ घातला असल्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका