शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

तरंगत्या रंगमंचासाठी निविदा; वेटलॅण्ड कमिटीचा आक्षेप झुगारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 00:56 IST

सत्ताधाऱ्यांपुढे प्रशासनाची नांगी

ठाणे : ऐन निवडणुकीच्या धामधुमीत उपवन तलावाच्या ठिकाणी दशक्रिया विधी घाट आणि तरंगता रंगमंच उभारण्याच्या कामासाठी ठाणे महापालिकेने पुन्हा निविदा मागवल्या आहेत. राजकीय दबावाखालीच नांगी टाकून प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. यात तरंगत्या रंगमंचासाठी सल्लागार, तर बुरुजांसाठी कंत्राटदार नियुक्तीच्या निविदांचा समावेश आहे.न्यायालयाच्या आदेशाने नियुक्त झालेल्या वेटलॅण्ड कमिटीने त्याला तीव्र आक्षेप नोंदवला असून उपवन तलावाकाठची प्रस्तावित आणि मासुंदा तलावाच्या काठी सुरू असलेल्या कामांना तातडीने स्थगिती देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना करणार असल्याची माहिती कमिटीने दिली. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाकडून १३२ पाणथळ जागांचे सर्वेक्षण सुरू आहे. त्यात ठाणे शहरातील ३४ ठिकाणांचा समावेश असून उपवन तलाव त्यापैकी एक आहे. वेटलॅण्ड कमिटीमार्फत सुरू असलेले हे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात असून येत्या चार महिन्यांत ठिकाणे अंतिम करून त्याबाबतची अधिसूचना काढली जाणार आहे. त्यानंतर ,पाणथळ जागा २०१० साली ज्या स्थितीत होत्या, तशा पूर्ववत कराव्या लागणार आहेत. त्यामुळे उपवन तलावाकाठी बनारस घाट व इतर जी काही कामे झाली असतील, ती सुद्धा काढावी लागणार आहेत.असे असताना पालिकेने उपवन तलावाजवळ बुरूज आणि दशक्रिया विधी घाट तसेच तलावात फ्लोटिंग स्टेज उभारणीसाठी तब्बल २२ कोटी २९ लाख रु पये खर्चाचा घाट घातला आहे. पाणथळामध्ये तलावाचा समावेश असतानाही केवळ अधिसूचना निघाली नाही, असे काहीसे कारण पालिकेने पुढे केले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रस्तावित पाणथळ जागांमध्ये अशा स्वरूपाची कामे करणे कायदेशीर ठरणार नाही, हे पालिकेला माहीत असायला हवे. आम्ही ते वेगळे सांगण्याची गरज नाही, असे जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांचे म्हणणे होते. या कामांवरून बराच वादंग झाल्यानंतर पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या कामांना स्थगिती देण्याचे आदेश दिले होते. मात्र, ती करण्यासाठी पालिकेवर राजकीय दबाव आल्याने त्यापुढे नमते घेऊन प्रशासनाने कामांसाठी निविदा प्रसिद्ध केल्या आहेत.सल्लागाराच्या अहवालाशिवाय मंजुरीतरंगत्या रंगमंचाच्या उभारणीसाठी नऊ कोटी ७० लाख रु पये खर्च येईल, असे पालिका प्रशासनाने आपल्या प्रस्तावात नमूद केले होते.मात्र, त्यासाठी सर्वेक्षण, डिझाइन आणि सविस्तर आराखडा तयार करण्यासाठी आता सल्लागार नेमला जाणार आहे.सल्लागार नेमल्याखेरीज अंदाजखर्च काढता येत नाही. मग, पालिकेने आधीच १० कोटी रु पये खर्चासाठी वित्तीय मंजुरी कशी काय मिळवली, हा प्रश्न मात्र यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.कामाचे नाव बदललेउपवन तलावाकाठी दशक्रि या विधी घाट उभारला जाणार असल्याचा प्रस्ताव पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला होता. या घाटामुळे उपवन तलावाचे सौंदर्य धोक्यात येईल, अशी भीती व्यक्त करून त्याला तीव्र विरोध झाला होता.त्यानंतर, दोन दिवसांपूर्वी पालिकेने प्रसिद्ध केलेल्या निविदेत या घाटाचे नाव बदलून बुरूज बांधणे व अन्य स्थापत्य कामेअसा उल्लेख केला आहे. एकूणच पुन्हा यानिमित्ताने आणखीएक घोटाळा पालिकेत होऊ घातला असल्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका