शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
4
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
5
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
9
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
10
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
11
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
13
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
14
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
15
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! भारताचा सुस्पष्ट संदेश; आता पाकिस्तानने चूक केल्यास...
16
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
17
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
18
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
19
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  

शहापूरच्या सापगावात २० दिवसांत १० जणांचा लेप्टो स्पायरोसिसने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2020 18:09 IST

ठाणे जिल्हा परिषदेला खडबडून जाग; कोरोना संकटात लेप्टोचा शिरकाव

ठाणे : सध्या कोरोनाच्या महासंकटाने हैराण असतानाच शहापूर तालुक्यातील सापगांव येथील दहा ग्रामस्थांचा वीस दिवसांत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या विषयी ठाणे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डाँ. मनिष रेघे, यांना बोलते केले असता त्यांनी 'या ग्रामस्थांचा 'लेप्टो स्पायरोसीस' या आजाराने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.शहापूर या आदिवासी तालुक्यातील दुर्गम भागात सापगांव हे तीन हजार लोकवस्तीचे गांव आहे. अवघ्या २० दिवसांच्या कालावधीत दहा जणांचा मृत्यू झाल्याच्या या घटनेने ठाणे जिल्हा परिषद खडबडून जागी झाली आहे. शुक्रवारी आरोग्य समिती सभापती कुंदन पाटील व डॉ. रेघे यांनी या गावाला भेट देऊन येथील ग्रामस्थांची आरोग्य तपासणी सुरु केली आहे. त्यात डेंग्यू च्या तुलनेत लेप्टो स्पायरोसीस या आजाराचे सिमटंन्स, लक्षणे आढळून आली आहे. तेथे त्वरीत आरोग्य कँम्प लाऊन ग्रामस्थांवर डेंग्यू, मलेरिया आणि लेप्टो स्पायरोसिसचा उपचार सुरु केल्याचे डाँ. रेघे यांनी लोकमतला सांगितले.

वीस दिवसाच्या कालावधीत दगावलेल्यांमध्ये तरुणांसह, ४० ते ४५ वयाचे नागरिक आणि महिलांचा समावेश आहे. अवघ्या वीस दिवसात येथील पाच तरुणांसह पुरुष आणि पाच महिलांचा समावेश आहे. या ग्रामस्थांना विविध साथीच्या आजाराने ग्रासल्याचे निदर्शनास येताच जिल्हा परिषद सदस्या वंदना भांडे, यांनी तत्काळ आरोग्य विभागाशी संपर्क करून उपचार सुरु करण्याची मागणी लाऊन धरली. त्यास अनुसरुन आता या गावांत आरोग्य यंत्रणा सतर्क होऊन युद्धपातळीवर उपचार सुरू केले आहे. या दरम्यान माजी आमदार पांडुरंगबरोरा, उपसभापती जगन पष्टे, गटविकास अधिकारी भवारी, शहापूर आरोग्य अधिकारी तरुलता धानके, जेष्ठ नेते किशनशेठ भांडे, काशिनाथ तिवरे, विलास गगे, निलेश भांडे, विनायक सापळे, मनोज धानके आदी या घटनेवर लक्ष ठेवून आहे.