शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

ठाण्यातील जलवाहतुकीच्या दुसऱ्या टप्प्याचे परीक्षण, महानगरे खाडीमार्गे जोडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 05:45 IST

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून जलवाहतुकीला चालना दिली जात असून पहिल्या टप्प्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार झाल्यानंतर आता...

ठाणे : ठाणे महापालिकेच्या माध्यमातून जलवाहतुकीला चालना दिली जात असून पहिल्या टप्प्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार झाल्यानंतर आता दुस-या टप्प्यात ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई या शहरांना जोडण्यासाठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे. तसेच या खाडीलगतच्या अभयारण्यातील वन्यजीवांवर जलवाहतूक प्रकल्पामुळे काही परिणाम होऊ शकतो का, याचा अभ्यास लवकरच सुरू करण्यात येणार असून त्याचबरोबर वसई तेमीरा-भार्इंदर आणि कल्याण-डोंबिवली भागातील खाडीतून दगड आणि गाळ काढल्यानंतर त्याचा पर्यावरणावर काही परिणाम होऊ शकतो का, याचाही सविस्तर अभ्यास केंद्र शासनाच्या संस्थेमार्फत करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या सूत्रांनी दिली.ठाणे शहरासाठी जलवाहतूक प्रकल्प हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरणार असल्याने ठाणे महापालिकेच्या माध्यमातून त्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. त्यानुसार ठाणे, मुंबई, नवी मुंबई, वसई-विरार, मीरा-भार्इंदर आणि कल्याण-डोंबिवली शहरांवरील रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर गेल्या काही वर्षांत भार वाढला असून तो कमी करण्यासाठी या शहरांना जोडणाºया खाडीमध्ये अंतर्गत जलवाहतूक प्रकल्प राबविण्याचा निर्णय ठाणे महापालिका प्रशासनाने घेतला होता. पहिल्या टप्प्यात ठाणे, वसई-विरार, मीरा-भार्इंदर आणि कल्याण-डोंबिवली या शहरांमध्ये अंतर्गत जलवाहतूक प्रकल्प राबवण्यात येणार आहे. ठाणे महापालिकेने या प्रकल्पासाठी तयार केलेल्या सविस्तर प्रकल्प अहवालास केंद्र शासनाने मंजुरी दिली असून या प्रकल्पाच्या उभारणीसाठी प्रशासनाने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.अहवालास डिसेंबर महिना उजाडणारया प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय जलवाहतूक राज्यमंत्री मनसुख मांडविया यांनी नवी दिल्लीमध्ये नुकतीच एक बैठक घेतली होती. त्यामध्ये या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची अंमलबजावणी येत्या आॅक्टोबर महिन्यापर्यंत करण्याचे आदेश त्यांनी बैठकीत दिले होते. या जलमार्गासाठी एकूण ६४५ कोटीचा खर्च अपेक्षित आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात मीरा-भार्इंदर, कोलशेत, काल्हेर आणि डोंबिवली या चार ठिकाणी जेटी बांधणे, रिव्हर इन्फॉर्मेशन सिस्टीम विकसित करणे, तीन वर्षे बोटींची दुरुस्ती, निगा व देखभाल अशी कामे करण्यात येणार आहेत. या कामांसाठी आवश्यक असलेल्या ८६ कोटी रु पयांचा निधी त्वरित उपलब्ध करून देण्याचे आदेश त्यांनी दिले होते. याच बैठकीमध्ये ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई या शहरांना जोडण्यासाठी खाडीमध्ये जलवाहतूक प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबविण्याकरिता सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे आदेश त्यांनी ठाणे महापालिकेला दिले होते. त्यानुसार, ठाणे महापालिका प्रशासनाने तो तयार करण्याचे काम सुरू केले आहे. येत्या आॅक्टोबर महिन्यापर्यंत हा अहवाल तयार करण्याचा प्रशासनाचा मानसअसला, तरी हे काम पूर्णहोण्यासाठी डिसेंबरपर्यंतचा अवधी लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.खाडीत याची केली तपासणीखाडीमार्गात खडक आहे का, याचीही पाहणी करण्यात आली. कोणत्या भागात दगड आणि मातीचा गाळ काढावा लागेल, याचाही अभ्यास करण्यात आला होता. तसेच खाडीच्या तळाशी असलेले खडक, माती आणि गाळ याचेही परीक्षण करण्यात आले होते. त्याचप्रमाणे आता ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई या मार्गाची तपासणी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.दुसरा टप्पा ९० किमीचा : ठाणे, वसई-विरार, मीरा-भार्इंदर आणि कल्याण-डोंबिवली या पहिल्या टप्प्यात ५० किमी लांबीचा अंतर्गत जलवाहतूक प्रकल्प राबविला जाणार आहे. तर ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई या दुसºया टप्प्यात ९० किमी लांबीचा अंतर्गत जलवाहतूक प्रकल्प राबविला जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील जलमार्गाची आठ महिन्यांपूर्वी चाचपणी करण्यात आली होती.

टॅग्स :thaneठाणे