शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

कोरोनाच्या संकट काळात पाण्याचा प्रश्न सोडविल्याने नागरिकांच्या डोळयात आनंदाश्रू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 00:02 IST

डोंबिवलीतील देसलेपाडा, नवनीत नगर भागातील पाणी समस्या ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सोडविली. त्यामुळे या प्रश्नाचा पाठपुरावा करणाऱ्या कच्छी जैन फाऊंडेशनसह पालकमंत्री शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे आणि कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाचे येथील रहिवाशांनी आभार मानले आहे.

ठळक मुद्दे डोंबिवलीतील नवनीतनगर, देसलेपाडा येथील रहिवाश्यांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी कच्छी जैन फाउंडेशनने केला होता पाठपुरावाठाणे जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांचे मानले आभार

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: डोंबिवली येथील नवनीत नगर, देसलेपाडा येथील रहिवाशांना गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याची समस्या भेडसावत होती. पाण्याचा हा प्रश्न ऐन कोरोनासारख्या संकटाच्या काळात मार्गी लागल्यामुळे येथील रहिवाशांनी ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री तथा राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिदे आणि कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाचे आभार मानले आहेत.कच्छी जैन समाज हा नेहमीच तळागाळातील गरिबांना मदरतीचा हात पुढे करीत असतो. आपल्या उत्पन्नातील काही भाग हा गरजूंसाठी खर्च करावा, अशी शिकवण हा समाज देत असतो. कच्छी जैन फाऊंडेशनच्या वतीने डोंबिवलीतील नवनीतनगर, देसलेपाडा येथे गरीब तसेच मध्यमवर्गीय हजार कुटुंबांना मोफत तर काहीना काहींना दहा टक्के रकमेमध्ये निवासी घरे दिली आहेत. जवळपास हजार कुटुंब असलेल्या या रहिवाशांना गेल्या सात ते आठ वर्षांपासून पाणी समस्येला तोंड द्यावे लागत होते. त्यामुळे येथील रहिवाशांना अनेक वर्षांपासून टँकरद्वारे पाणी विकत घेण्याची वेळ आली होती. कच्छी जैन फाऊंडेशनचे पियुष शहा आणि दीपक भेदा यांनी येथील पाणी समस्येसाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे यासाठी पाठपुरावा केला. खासदार शिंदे हे डोंबिवली येथील नवनीतनगर येथे एका कार्यक्र मासाठी काही दिवसांपूर्वी आले असता, त्यांनी या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेतली. तेंव्हा लवकरच येथील पाणी समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढू, असे आश्वासनही त्यांनी दिले होते.कोरोनासारख्या संकटाच्या काळात अनेक परप्रांंतीय मजूर आपल्या गावी गेले. त्यामुळे मजूरांचीही सध्या वाणवा आहे. मजूर नसतांनाही खासदार शिंदे यांनी नवनीतनगरच्या रहिवाशांना दिलेला शब्द पाळला. त्यांनी कल्याण डोंबिवलीच्या महापौर विनिता राणे आणि महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांना हा प्रश्न सोडविण्यासाठी बैठक घेऊन येथील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी सूचना केल्या. त्यानुसार महापालिका प्रशासनाने नुकताच हा प्रश्न सोडविला. पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजीव पाठक आणि उपअभियंता पाणी पुरवठा (२७ गाव) विजय पाटील यांनी एमआयडीसीतील जलकुंभातून तीन इंची जलवाहिनी जोडण्याचे काम ६ जून रोजी केल्यामुळे या भागातील पाणी प्रश्न अखेर मार्गी लागला आहे.*पाणी जोडणीमुळे नवनीत नगर, देसले पाडा येथील जवळपास पाच हजार नागरिकांच्या घरात पाणी उपलब्ध झाले आहे. पाणी प्रश्न सुटल्यामुळे अनेक वर्षांनी नळाला पाणी आल्याचे पाहून नागरिकांच्या डोळयात अक्षरश: आनंदाश्रू पहायला मिळाले. नागरिकांनी खासदार श्रीकांत शिंदे, पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि कच्छी जैन फाऊंडेशनचे आभार मानल्याचे पियुष शहा यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

 

टॅग्स :thaneठाणेWaterपाणीdombivaliडोंबिवली