शहरं
Join us  
Trending Stories
1
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
4
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
5
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
6
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
7
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
8
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
9
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
10
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
11
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
12
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
13
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
14
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
15
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
16
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
17
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
18
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
19
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

कोरोनाच्या संकट काळात पाण्याचा प्रश्न सोडविल्याने नागरिकांच्या डोळयात आनंदाश्रू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 00:02 IST

डोंबिवलीतील देसलेपाडा, नवनीत नगर भागातील पाणी समस्या ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सोडविली. त्यामुळे या प्रश्नाचा पाठपुरावा करणाऱ्या कच्छी जैन फाऊंडेशनसह पालकमंत्री शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे आणि कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाचे येथील रहिवाशांनी आभार मानले आहे.

ठळक मुद्दे डोंबिवलीतील नवनीतनगर, देसलेपाडा येथील रहिवाश्यांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी कच्छी जैन फाउंडेशनने केला होता पाठपुरावाठाणे जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांचे मानले आभार

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: डोंबिवली येथील नवनीत नगर, देसलेपाडा येथील रहिवाशांना गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याची समस्या भेडसावत होती. पाण्याचा हा प्रश्न ऐन कोरोनासारख्या संकटाच्या काळात मार्गी लागल्यामुळे येथील रहिवाशांनी ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री तथा राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिदे आणि कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाचे आभार मानले आहेत.कच्छी जैन समाज हा नेहमीच तळागाळातील गरिबांना मदरतीचा हात पुढे करीत असतो. आपल्या उत्पन्नातील काही भाग हा गरजूंसाठी खर्च करावा, अशी शिकवण हा समाज देत असतो. कच्छी जैन फाऊंडेशनच्या वतीने डोंबिवलीतील नवनीतनगर, देसलेपाडा येथे गरीब तसेच मध्यमवर्गीय हजार कुटुंबांना मोफत तर काहीना काहींना दहा टक्के रकमेमध्ये निवासी घरे दिली आहेत. जवळपास हजार कुटुंब असलेल्या या रहिवाशांना गेल्या सात ते आठ वर्षांपासून पाणी समस्येला तोंड द्यावे लागत होते. त्यामुळे येथील रहिवाशांना अनेक वर्षांपासून टँकरद्वारे पाणी विकत घेण्याची वेळ आली होती. कच्छी जैन फाऊंडेशनचे पियुष शहा आणि दीपक भेदा यांनी येथील पाणी समस्येसाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे यासाठी पाठपुरावा केला. खासदार शिंदे हे डोंबिवली येथील नवनीतनगर येथे एका कार्यक्र मासाठी काही दिवसांपूर्वी आले असता, त्यांनी या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेतली. तेंव्हा लवकरच येथील पाणी समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढू, असे आश्वासनही त्यांनी दिले होते.कोरोनासारख्या संकटाच्या काळात अनेक परप्रांंतीय मजूर आपल्या गावी गेले. त्यामुळे मजूरांचीही सध्या वाणवा आहे. मजूर नसतांनाही खासदार शिंदे यांनी नवनीतनगरच्या रहिवाशांना दिलेला शब्द पाळला. त्यांनी कल्याण डोंबिवलीच्या महापौर विनिता राणे आणि महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांना हा प्रश्न सोडविण्यासाठी बैठक घेऊन येथील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी सूचना केल्या. त्यानुसार महापालिका प्रशासनाने नुकताच हा प्रश्न सोडविला. पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजीव पाठक आणि उपअभियंता पाणी पुरवठा (२७ गाव) विजय पाटील यांनी एमआयडीसीतील जलकुंभातून तीन इंची जलवाहिनी जोडण्याचे काम ६ जून रोजी केल्यामुळे या भागातील पाणी प्रश्न अखेर मार्गी लागला आहे.*पाणी जोडणीमुळे नवनीत नगर, देसले पाडा येथील जवळपास पाच हजार नागरिकांच्या घरात पाणी उपलब्ध झाले आहे. पाणी प्रश्न सुटल्यामुळे अनेक वर्षांनी नळाला पाणी आल्याचे पाहून नागरिकांच्या डोळयात अक्षरश: आनंदाश्रू पहायला मिळाले. नागरिकांनी खासदार श्रीकांत शिंदे, पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि कच्छी जैन फाऊंडेशनचे आभार मानल्याचे पियुष शहा यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

 

टॅग्स :thaneठाणेWaterपाणीdombivaliडोंबिवली