शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

बदली प्रक्रियेवर शिक्षकांचा आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 1:15 AM

जिल्हा परिषदेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह : विरोध केल्याने निलंबनाची धमकी

अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेच्या सुमारे २४५ प्राथमिक शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या या समुपदेशनाद्वारे करण्यात येत आहेत. मात्र, अपेक्षित असलेल्या ठिकाणी नेमणूक होत नसल्याने शिक्षकांनी शुक्रवारी गोंधळ घातला. नेमून दिलेल्या ठिकाणी गेला नाही, तर निलंबित करण्यात येईल, अशी धमकी प्रशासन आणि पदाधिकारी यांच्याकडून दिली जात असल्याने बदली प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने होत नसल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या शिवतीर्थ इमारतीमध्ये सुरू होती. शिक्षकांच्या या भूमिकेमुळे जिल्हा परिषदेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

उन्हाळी सुट्टींनंतर १७ जूनपासून जिल्ह्यातील सर्व शाळा सुरू होत आहेत. त्याआधी रायगड जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांच्या बदल्यांचा कार्यक्रम रायगड जिल्हा परिषदेने हाती घेतला आहे. रायगड जिल्ह्यात पाचव्या व सहाव्या टप्प्यातील शिक्षकांची जिल्हांतर्गत समुपदेशनाने बदली प्रक्रिया शुक्र वारी सुरू झाली. या बदली प्रक्रियेसाठी सुमारे २४५ शिक्षकांनी अर्ज केले होते. समुदेशनासाठी एका-एका शिक्षकाला आत बोलावण्यात येत होते. त्या वेळी नियमानुसार शिक्षकांनी त्यांच्या पसंतीच्या २० शाळा सुचवल्या होत्या. मात्र, त्यातील एकही शाळा त्यांना न देता दुसऱ्याच शाळांवर त्यांची नेमणूक करण्यात येणार होती. त्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजी दिसून आली. सुचवलेल्या २० शाळांपैकी एकही शाळा न देता अन्य शाळा देण्याआधी त्या शाळेच्या जवळपासची शाळा देण्याची मागणी केली होती. नेमून दिलेल्या शाळेवर हजर व्हा, अन्यथा निलंबित करू, अशी तंबी दिल्याने शिक्षकांनी टिपणीस सभागृहाबाहेर गोंधळ घातल्याचे दिसून आले.सुमारे ४० शिक्षकांची बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पनवेल, कर्जत, उरण आणि खालापूर तालुक्यातील शाळा संपल्याचे शिक्षकांना सांगण्यात आले. तालुक्यातील समांतर धोरणानुसार बदली प्रक्रिया राबविल्याने ही परिस्थिती निर्माण झाली. यावर शिक्षकांनी आक्षेप घेतल्याने बदली प्रक्रियेवर संशयाच्या भोवºयात सापडल्याचे दिसत होते.बदली प्रक्रि या आम्हाला मान्य नसल्याचे निवेदन काही शिक्षकांनी दिल्यानंतर वातावरण काहीसे निवळले. याबाबत न्यायालयात दाद मागण्याचा निर्धारही शिक्षकांनी व्यक्त केला. मात्र, यानंतरही प्रशासनाने बदली प्रक्रि या सुरू ठेवली होती.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, शिक्षण समिती सभापती नरेश पाटील, प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड, शिक्षण अधिकारी बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, प्रभारी शिक्षणाधिकारी बाळासाहेब थोरात यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.च्शासन निर्णयात समांतर बदली प्रक्रि या राबविण्याचा उल्लेख नाही.च्बदली प्रक्रि येत समाविष्ट शिक्षकांची तसेच शाळांची यादी जाहीर करण्यात आलेली नाही.च्बदली प्रक्रि या राबविताना अधिकाऱ्यांनी मनमानीपणे कारभार केला.च्पनवेल, कर्जत, उरण, खालापूर तालुक्यात जवळपास ८० शाळांमधील जागा रिक्त असताना फक्त ४० शिक्षकांची बदली प्रक्रि या पूर्ण झाल्यानंतर या तालुक्यांंमधील शाळांची बदली प्रक्रि या पूर्ण कशी झाली.

टॅग्स :Raigadरायगडalibaugअलिबाग