शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

Tauktae Cyclone: झाडे कोसळलेल्या ठिकाणांना भरपावसात विरोधीपक्ष नेत्यांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2021 17:02 IST

तौक्ते  चक्रीवादळाचा फटका ठाण्याच्या काही भागांनाही बसला आहे. ठाणे शहरात सुटलेल्या थोड्याशा वार्‍यानेही 12 झाडे उन्मळून पडली असून 13 झाडांच्या फांद्या कोसळल्या.

ठाणे (प्रतिनिधी)- तौक्ते  चक्रीवादळाचा फटका ठाण्याच्या काही भागांनाही बसला आहे. ठाणे शहरात सुटलेल्या थोड्याशा वार्‍यानेही 12 झाडे उन्मळून पडली असून 13 झाडांच्या फांद्या कोसळल्या. या ठिकाणी विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण यांनी भेटी दिल्या. दरम्यान, ही झाडे कोसळण्याचे प्रकार ठाणे महानगर पालिकेचे वृक्षप्राधिकरणामुळेच झाले आहेत. सध्या कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी भावी काळात एखाद्याचा जीव गेला तर त्यास जबाबदार कोण असेल? असा सवाल  करुन जर वृक्षप्राधिकरण खात्याचे काम जर अग्नीशमन दलाकडून केले जात असेल तर हे खाते हवेच कशाला, ते बरखास्त करुन टाका, अशा शब्दात शानू पठाण यांनी संताप व्यक्त केला. विशेष म्हणजे, सोमवारी ठामपाची स्थायी समितीची बैठक होती. या बैठकीमध्ये शानू पठाण हे रस्त्यावरुनच सहभागी झाले. त्यांनी सर्व सदस्यांना तसेच सभापतींना रस्त्यावर पडलेल्या झाडांच्या फांद्यांचा खच आणि उन्मळून पडलेली झाडे ऑनलाईन दाखवून कारवाईची मागणी केली. 

तौक्ते चक्रीवादळामुळे ठाण्यातही काही ठिकाणी पडझड झाली. ठाण्याच्या अनेक भागात झाडे उन्मळून पडली. काही ठिकाणी फांद्या कोसळल्या. झाडे उन्मळून पडण्याच्या घटनांमध्ये काही जीवितहानी झाली नसली तरी विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी सर्व ठिकाणांची पाहणी केली. या पाहणीमध्ये राम मारुती रोड , नौपाडा आदी भागात एकही अधिकारी फिरकला नसल्याचे पठाण यांच्या निदर्शनास आले. विशेष म्हणजे, छ. शिवाजी महाराज रुग्णालयाची कमान कोसळल्यानंतरही त्या ठिकाणी अधिकारी पोहचलेच नसल्याचे दिसून आले.  या पाहणीनंतर, ठामपाच्या वृक्षप्राधिकरण खात्याने वेळीच फांद्यांची छाटणी न केल्यामुळे या दुर्घटना घडल्या असल्याचा आरोप पठाण यांनी केला. यावेळी त्यांच्या सोबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष विक्रम खामकर हे उपस्थित होते. 

दरम्यान, “काही दिवसांपूर्वी गडकरी रंगयातन येथे रिक्षावर झाड कोसळून दोघांचा मागील वर्षी पाचपाखाडी येथे झाडाची फांदी कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये एका युवकाचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या स्मृती ताज्या असतानाही ठामपाच्या वृक्षप्राधिकरण खात्याकडून योग्य अशी कार्यवाही केली जात नाही. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये सुमारे 400 झाडांची छाटणी करण्यात आली होती. मात्र, ठाणे पालिकेने झाडांच्या छाटणीकडे पूर्णत: दुर्लक्ष केले आहे. वास्तविक पाहता, आठवडाभर आधी वादळाची पूर्वकल्पना देण्यात आलेली असतानाही ठाणे पालिकेच्या वृक्षप्राधिकरण खात्याने तपासणी करायला हवी होती. मात्र, अशी तपासणी न केल्यामुळेच धोकादायक झालेले वृक्ष कोसळले आहेत. अद्याप मान्सूनला सुरुवात झालेली नाही. पावसाळ्यात अशा दुर्घटना घडून एखाद्याचा जीव गेला तर त्याची जबाबदारी वृक्षप्राधिकरणचे अधिकारी घेतील का?  या खात्याकडे जबाबदार अधिकारी नाहीत, उपयुक्त साधने नाहीत; अशा वेळी दुर्घटना घडली की अग्नीशमन दलाला पाचारण केले जाते. जर, प्रत्येक वेळी अग्नीशमन दलाची क्रयशक्ती वाया घालवली जात असेल तर वृक्षप्राधिकरण खाते हवेच कशाला?” असा सवालही शानू पठाण यांनी उपस्थित केला आहे.

ऑनलाईन स्थायी समितीत दाखविले रस्त्यावरचे दृश्यसोमवारी ठाणे महानगर पालिकेच्या स्थायी समितीची ऑनलाईन बैठक होती. या बैठकीमध्ये पाहणी दौर्‍यातूनच शानू पठाण हे सहभागी झाले. त्यांनी स्थायी समितीच्या सभापतींना रस्त्यावर पडलेल्या झाडांच्या फांद्याचा खच दाखविला. तसेच, एकही अधिकारी घटनास्थळी नसल्याचे दाखवून दिले. एकूणच पालिकेच्या कारभाराची ऑनलाईन पोलखोल शानू पठाण यांनी केली.

 

टॅग्स :Tauktae Cycloneतौत्के चक्रीवादळ