शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

Tauktae Cyclone: झाडे कोसळलेल्या ठिकाणांना भरपावसात विरोधीपक्ष नेत्यांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2021 17:02 IST

तौक्ते  चक्रीवादळाचा फटका ठाण्याच्या काही भागांनाही बसला आहे. ठाणे शहरात सुटलेल्या थोड्याशा वार्‍यानेही 12 झाडे उन्मळून पडली असून 13 झाडांच्या फांद्या कोसळल्या.

ठाणे (प्रतिनिधी)- तौक्ते  चक्रीवादळाचा फटका ठाण्याच्या काही भागांनाही बसला आहे. ठाणे शहरात सुटलेल्या थोड्याशा वार्‍यानेही 12 झाडे उन्मळून पडली असून 13 झाडांच्या फांद्या कोसळल्या. या ठिकाणी विरोधी पक्षनेते अश्रफ शानू पठाण यांनी भेटी दिल्या. दरम्यान, ही झाडे कोसळण्याचे प्रकार ठाणे महानगर पालिकेचे वृक्षप्राधिकरणामुळेच झाले आहेत. सध्या कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी भावी काळात एखाद्याचा जीव गेला तर त्यास जबाबदार कोण असेल? असा सवाल  करुन जर वृक्षप्राधिकरण खात्याचे काम जर अग्नीशमन दलाकडून केले जात असेल तर हे खाते हवेच कशाला, ते बरखास्त करुन टाका, अशा शब्दात शानू पठाण यांनी संताप व्यक्त केला. विशेष म्हणजे, सोमवारी ठामपाची स्थायी समितीची बैठक होती. या बैठकीमध्ये शानू पठाण हे रस्त्यावरुनच सहभागी झाले. त्यांनी सर्व सदस्यांना तसेच सभापतींना रस्त्यावर पडलेल्या झाडांच्या फांद्यांचा खच आणि उन्मळून पडलेली झाडे ऑनलाईन दाखवून कारवाईची मागणी केली. 

तौक्ते चक्रीवादळामुळे ठाण्यातही काही ठिकाणी पडझड झाली. ठाण्याच्या अनेक भागात झाडे उन्मळून पडली. काही ठिकाणी फांद्या कोसळल्या. झाडे उन्मळून पडण्याच्या घटनांमध्ये काही जीवितहानी झाली नसली तरी विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी सर्व ठिकाणांची पाहणी केली. या पाहणीमध्ये राम मारुती रोड , नौपाडा आदी भागात एकही अधिकारी फिरकला नसल्याचे पठाण यांच्या निदर्शनास आले. विशेष म्हणजे, छ. शिवाजी महाराज रुग्णालयाची कमान कोसळल्यानंतरही त्या ठिकाणी अधिकारी पोहचलेच नसल्याचे दिसून आले.  या पाहणीनंतर, ठामपाच्या वृक्षप्राधिकरण खात्याने वेळीच फांद्यांची छाटणी न केल्यामुळे या दुर्घटना घडल्या असल्याचा आरोप पठाण यांनी केला. यावेळी त्यांच्या सोबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष विक्रम खामकर हे उपस्थित होते. 

दरम्यान, “काही दिवसांपूर्वी गडकरी रंगयातन येथे रिक्षावर झाड कोसळून दोघांचा मागील वर्षी पाचपाखाडी येथे झाडाची फांदी कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये एका युवकाचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या स्मृती ताज्या असतानाही ठामपाच्या वृक्षप्राधिकरण खात्याकडून योग्य अशी कार्यवाही केली जात नाही. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये सुमारे 400 झाडांची छाटणी करण्यात आली होती. मात्र, ठाणे पालिकेने झाडांच्या छाटणीकडे पूर्णत: दुर्लक्ष केले आहे. वास्तविक पाहता, आठवडाभर आधी वादळाची पूर्वकल्पना देण्यात आलेली असतानाही ठाणे पालिकेच्या वृक्षप्राधिकरण खात्याने तपासणी करायला हवी होती. मात्र, अशी तपासणी न केल्यामुळेच धोकादायक झालेले वृक्ष कोसळले आहेत. अद्याप मान्सूनला सुरुवात झालेली नाही. पावसाळ्यात अशा दुर्घटना घडून एखाद्याचा जीव गेला तर त्याची जबाबदारी वृक्षप्राधिकरणचे अधिकारी घेतील का?  या खात्याकडे जबाबदार अधिकारी नाहीत, उपयुक्त साधने नाहीत; अशा वेळी दुर्घटना घडली की अग्नीशमन दलाला पाचारण केले जाते. जर, प्रत्येक वेळी अग्नीशमन दलाची क्रयशक्ती वाया घालवली जात असेल तर वृक्षप्राधिकरण खाते हवेच कशाला?” असा सवालही शानू पठाण यांनी उपस्थित केला आहे.

ऑनलाईन स्थायी समितीत दाखविले रस्त्यावरचे दृश्यसोमवारी ठाणे महानगर पालिकेच्या स्थायी समितीची ऑनलाईन बैठक होती. या बैठकीमध्ये पाहणी दौर्‍यातूनच शानू पठाण हे सहभागी झाले. त्यांनी स्थायी समितीच्या सभापतींना रस्त्यावर पडलेल्या झाडांच्या फांद्याचा खच दाखविला. तसेच, एकही अधिकारी घटनास्थळी नसल्याचे दाखवून दिले. एकूणच पालिकेच्या कारभाराची ऑनलाईन पोलखोल शानू पठाण यांनी केली.

 

टॅग्स :Tauktae Cycloneतौत्के चक्रीवादळ