शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
2
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
3
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
4
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
5
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...
6
'द फॅमिली मॅन' सीझन ३ 'या' तारखेला होणार प्रदर्शित; 'नोव्हेंबर'मध्ये थरार पाहण्यासाठी सज्ज व्हा!
7
Yogi Adityanath: आता यूपीतील लोकांना उपचारांसाठी दिल्लीला जाण्याची गरज नाही: योगी आदित्यनाथ 
8
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
9
२०२५ मध्ये तिसऱ्यांदा डिविडेंड देणार 'ही' डिफेन्स कंपनी, एका शेअरवर ६ रुपयांचा फायदा; पटापट चेक करा डिटेल्स
10
लाडकी बहीण योजनेसाठी सरकार किती निधी देते? ‘इतके’ कोटी होतात खर्च, आकडा पाहून व्हाल अवाक्
11
तुम्ही देखील सोने-चांदी खरेदी करुन घरात ठेवलंय? CA नितीन कौशिक म्हणतात ही गुंतवणूक नाही तर...
12
राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका पडणार लांबणीवर? समोर येतंय असं कारण 
13
Suryakumar Yadav: श्रेयसच्या दुखापतीची बातमी मिळताच सूर्याचा फिजिओला फोन, आता कशी आहे त्याची तब्येत?
14
"पुन्हा मलाच...", तिसरी वेळ राष्ट्राध्यक्ष बनण्याची इच्छा; स्वतःचं कौतुक करत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...
15
प्रत्येक टनामागे १ रुपया...! 'वसंतदादा शुगर'ची चौकशी लागली; शरद पवार, अजितदादांशी संबंधीत संस्था कचाट्यात
16
"पुढच्या दीड वर्षात सिनेमा बंद होईल...", महेश मांजरेकरांनी केलं भाकीत; असं का म्हणाले?
17
समस्त ओला ईलेक्ट्रीक स्कूटर मालकांसाठी महत्वाची बातमी! तुमचे तुम्हीच स्पेअर पार्ट घ्या, मेकॅनिककडून दुरुस्त करा...
18
२५ देशामध्ये अफाट संपत्ती, मॉलचेही आहेत मालक; 'हे' आहेत UAE चे सर्वात श्रीमंत भारतीय, ५० हजार कोटींपेक्षा अधिक नेटवर्थ
19
मंदीच्या काळातही ‘या’ 8 क्षेत्रांत कर्मचारी कपातीचा धोका नाही, भविष्यात मोठी संधी; जाणून घ्या...
20
VIRAL : महिला प्रवासी रिक्षात विसरली इयरफोन; वस्तू परत करण्यासाठी रिक्षा चालकाने लढवली 'अशी' शक्कल! होतंय कौतुक

Tauktae Cyclone: ठाणे-पालघरमधील मच्छीमारांच्या १२९ बोटी समुद्रात अडकल्या; 'तौत्के' चक्रीवादळाने वाढविली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2021 06:38 IST

१८ मेपर्यंत जोरदार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे, तर चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने पुढे जाणार आहे

ठळक मुद्देसमुद्रात गेलेल्या बोटींना किनाऱ्यावर लागण्यासाठी, बंदरात येण्यासाठी मच्छीमारांना आवाहनसध्या मच्छीमारीसाठी उत्तन बंदरातून गेलेल्या ३०५ बोटींपैकी २८४ बोटी बंदरात आलेल्या आहेतपालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये तौत्के या चक्रीवादळाचा प्रभाव जाणवणार

सुरेश लोखंडे 

ठाणे : मच्छीमारीसाठी ठाणे-पालघर जिल्ह्यातील बंदरांतून ८१७ बोटी गेल्या आहेत. शनिवारी दुपारी तीन वाजेपर्यंत ६८९ बोटी बंदरात परत आलेल्या आहेत. मात्र, अद्याप १२९ बोटी अजून किनाऱ्याला लागलेल्या नसल्याने त्यांची प्रतीक्षा करण्यात येत आहे. अरबी समुद्रातील ‘तौत्के’ चक्रीवादळाच्या दृष्टीने समुद्रातील या बोटींबाबत चिंता वाढली आहे. यामध्ये ठाणे उत्तन बंदरातील ३१ बोटींसह पालघरच्या सातपाटी, डहाणू आणि वसई बंदरांतील ९७ बोटींचा समावेश आहे.

ठाण्याच्या उत्तन बंदरातून समुद्रात गेलेल्या ३०५ बोटींपैकी २२७ बोटी शनिवारी सकाळी व ४३ बोटी सायंकाळी तीन वाजेपर्यंत बंदरात आलेल्या आहेत. उर्वरित ३१ बोटी समुद्रात आहेत. याप्रमाणेच सातपाटी, एडवन, डहाणू, वसईच्या बंदरात ३३४ बोटी सकाळी बंदरात आल्या होत्या व त्यानंतर तीन वाजेपर्यंत ८५ बोटी बंदरात परतल्या आहेत. संध्याकाळपर्यंत या ४१५ बोटी बंदरात आल्या आहेत. मात्र, ८५ बोटी अजून समुद्रात असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या अहवालावरून उघड झाले आहे. अरबी समुद्रातील 'ताउते' चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी समुद्र किनारपट्टीवरील भागात पूर्णपणे सतर्कता ठेवण्यात आली आहे.

१८ मेपर्यंत जोरदार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे, तर चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने पुढे जाणार आहे. त्यापासून ठाणे, पालघर जिल्ह्यांना फारसा फटका बसणार नसला तरी सावधानता बाळगली जात आहे. समुद्रात गेलेल्या बोटींना किनाऱ्यावर लागण्यासाठी, बंदरात येण्यासाठी मच्छीमारांना आवाहन करण्यात येत आहे. सध्या मच्छीमारीसाठी उत्तन बंदरातून गेलेल्या ३०५ बोटींपैकी २८४ बोटी बंदरात आलेल्या आहेत. उर्वरित ३१ बोटींची वाट पाहिली जात आहे. 

आपत्ती नियंत्रण ‌व मदतकार्य कक्ष सतर्कठाणे जिल्ह्यातील समुद्र व खाडी किनारा, उत्तन बंदर विशेषतः पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये तौत्के या चक्रीवादळाचा प्रभाव जाणवणार आहे. त्याचा फटका जिल्ह्यातील किनारपट्टीला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यास अनुसरून जिल्हा प्रशासनास आपत्ती नियंत्रण ‌व मदतकार्य कक्ष सतर्क आहे. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातून पूर्वतयारी हाती घेतली आहे.

टॅग्स :Tauktae Cycloneतौत्के चक्रीवादळ