शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

Tauktae Cyclone: ठाणे-पालघरमधील मच्छीमारांच्या १२९ बोटी समुद्रात अडकल्या; 'तौत्के' चक्रीवादळाने वाढविली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2021 06:38 IST

१८ मेपर्यंत जोरदार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे, तर चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने पुढे जाणार आहे

ठळक मुद्देसमुद्रात गेलेल्या बोटींना किनाऱ्यावर लागण्यासाठी, बंदरात येण्यासाठी मच्छीमारांना आवाहनसध्या मच्छीमारीसाठी उत्तन बंदरातून गेलेल्या ३०५ बोटींपैकी २८४ बोटी बंदरात आलेल्या आहेतपालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये तौत्के या चक्रीवादळाचा प्रभाव जाणवणार

सुरेश लोखंडे 

ठाणे : मच्छीमारीसाठी ठाणे-पालघर जिल्ह्यातील बंदरांतून ८१७ बोटी गेल्या आहेत. शनिवारी दुपारी तीन वाजेपर्यंत ६८९ बोटी बंदरात परत आलेल्या आहेत. मात्र, अद्याप १२९ बोटी अजून किनाऱ्याला लागलेल्या नसल्याने त्यांची प्रतीक्षा करण्यात येत आहे. अरबी समुद्रातील ‘तौत्के’ चक्रीवादळाच्या दृष्टीने समुद्रातील या बोटींबाबत चिंता वाढली आहे. यामध्ये ठाणे उत्तन बंदरातील ३१ बोटींसह पालघरच्या सातपाटी, डहाणू आणि वसई बंदरांतील ९७ बोटींचा समावेश आहे.

ठाण्याच्या उत्तन बंदरातून समुद्रात गेलेल्या ३०५ बोटींपैकी २२७ बोटी शनिवारी सकाळी व ४३ बोटी सायंकाळी तीन वाजेपर्यंत बंदरात आलेल्या आहेत. उर्वरित ३१ बोटी समुद्रात आहेत. याप्रमाणेच सातपाटी, एडवन, डहाणू, वसईच्या बंदरात ३३४ बोटी सकाळी बंदरात आल्या होत्या व त्यानंतर तीन वाजेपर्यंत ८५ बोटी बंदरात परतल्या आहेत. संध्याकाळपर्यंत या ४१५ बोटी बंदरात आल्या आहेत. मात्र, ८५ बोटी अजून समुद्रात असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या अहवालावरून उघड झाले आहे. अरबी समुद्रातील 'ताउते' चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी समुद्र किनारपट्टीवरील भागात पूर्णपणे सतर्कता ठेवण्यात आली आहे.

१८ मेपर्यंत जोरदार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे, तर चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने पुढे जाणार आहे. त्यापासून ठाणे, पालघर जिल्ह्यांना फारसा फटका बसणार नसला तरी सावधानता बाळगली जात आहे. समुद्रात गेलेल्या बोटींना किनाऱ्यावर लागण्यासाठी, बंदरात येण्यासाठी मच्छीमारांना आवाहन करण्यात येत आहे. सध्या मच्छीमारीसाठी उत्तन बंदरातून गेलेल्या ३०५ बोटींपैकी २८४ बोटी बंदरात आलेल्या आहेत. उर्वरित ३१ बोटींची वाट पाहिली जात आहे. 

आपत्ती नियंत्रण ‌व मदतकार्य कक्ष सतर्कठाणे जिल्ह्यातील समुद्र व खाडी किनारा, उत्तन बंदर विशेषतः पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये तौत्के या चक्रीवादळाचा प्रभाव जाणवणार आहे. त्याचा फटका जिल्ह्यातील किनारपट्टीला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यास अनुसरून जिल्हा प्रशासनास आपत्ती नियंत्रण ‌व मदतकार्य कक्ष सतर्क आहे. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातून पूर्वतयारी हाती घेतली आहे.

टॅग्स :Tauktae Cycloneतौत्के चक्रीवादळ