शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

Tauktae Cyclone: ठाणे-पालघरमधील मच्छीमारांच्या १२९ बोटी समुद्रात अडकल्या; 'तौत्के' चक्रीवादळाने वाढविली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2021 06:38 IST

१८ मेपर्यंत जोरदार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे, तर चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने पुढे जाणार आहे

ठळक मुद्देसमुद्रात गेलेल्या बोटींना किनाऱ्यावर लागण्यासाठी, बंदरात येण्यासाठी मच्छीमारांना आवाहनसध्या मच्छीमारीसाठी उत्तन बंदरातून गेलेल्या ३०५ बोटींपैकी २८४ बोटी बंदरात आलेल्या आहेतपालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये तौत्के या चक्रीवादळाचा प्रभाव जाणवणार

सुरेश लोखंडे 

ठाणे : मच्छीमारीसाठी ठाणे-पालघर जिल्ह्यातील बंदरांतून ८१७ बोटी गेल्या आहेत. शनिवारी दुपारी तीन वाजेपर्यंत ६८९ बोटी बंदरात परत आलेल्या आहेत. मात्र, अद्याप १२९ बोटी अजून किनाऱ्याला लागलेल्या नसल्याने त्यांची प्रतीक्षा करण्यात येत आहे. अरबी समुद्रातील ‘तौत्के’ चक्रीवादळाच्या दृष्टीने समुद्रातील या बोटींबाबत चिंता वाढली आहे. यामध्ये ठाणे उत्तन बंदरातील ३१ बोटींसह पालघरच्या सातपाटी, डहाणू आणि वसई बंदरांतील ९७ बोटींचा समावेश आहे.

ठाण्याच्या उत्तन बंदरातून समुद्रात गेलेल्या ३०५ बोटींपैकी २२७ बोटी शनिवारी सकाळी व ४३ बोटी सायंकाळी तीन वाजेपर्यंत बंदरात आलेल्या आहेत. उर्वरित ३१ बोटी समुद्रात आहेत. याप्रमाणेच सातपाटी, एडवन, डहाणू, वसईच्या बंदरात ३३४ बोटी सकाळी बंदरात आल्या होत्या व त्यानंतर तीन वाजेपर्यंत ८५ बोटी बंदरात परतल्या आहेत. संध्याकाळपर्यंत या ४१५ बोटी बंदरात आल्या आहेत. मात्र, ८५ बोटी अजून समुद्रात असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या अहवालावरून उघड झाले आहे. अरबी समुद्रातील 'ताउते' चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी समुद्र किनारपट्टीवरील भागात पूर्णपणे सतर्कता ठेवण्यात आली आहे.

१८ मेपर्यंत जोरदार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे, तर चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने पुढे जाणार आहे. त्यापासून ठाणे, पालघर जिल्ह्यांना फारसा फटका बसणार नसला तरी सावधानता बाळगली जात आहे. समुद्रात गेलेल्या बोटींना किनाऱ्यावर लागण्यासाठी, बंदरात येण्यासाठी मच्छीमारांना आवाहन करण्यात येत आहे. सध्या मच्छीमारीसाठी उत्तन बंदरातून गेलेल्या ३०५ बोटींपैकी २८४ बोटी बंदरात आलेल्या आहेत. उर्वरित ३१ बोटींची वाट पाहिली जात आहे. 

आपत्ती नियंत्रण ‌व मदतकार्य कक्ष सतर्कठाणे जिल्ह्यातील समुद्र व खाडी किनारा, उत्तन बंदर विशेषतः पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये तौत्के या चक्रीवादळाचा प्रभाव जाणवणार आहे. त्याचा फटका जिल्ह्यातील किनारपट्टीला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यास अनुसरून जिल्हा प्रशासनास आपत्ती नियंत्रण ‌व मदतकार्य कक्ष सतर्क आहे. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातून पूर्वतयारी हाती घेतली आहे.

टॅग्स :Tauktae Cycloneतौत्के चक्रीवादळ