शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

महिनाभर आधीच रानभाज्यांचा आस्वाद; कोरोनात प्रतिकारशक्ती वाढविण्यात फायदेशीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 07:44 IST

कोरोनाकाळात शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदिक वनस्पतींच्या सेवनाचे महत्त्व वाढले आहे. गुळवेल, गवती चहा, पुदिना अशा नानाविध गुणधर्म असलेल्या औषधी वनस्पतींचा वापर वाढला आहे.

बोर्डी : चक्रीवादळासह आलेल्या पावसाने ग्रामीण भागात वेळेपेक्षा महिनाभर आधीच रानभाज्या उगवल्या आहेत. आहारातील रानभाज्यांच्या सेवनाने शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी लाभ होतो. कोरोनाकाळात त्या बहुमूल्य असल्याने निसर्गाने ही किमया घडविल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.कोरोनाकाळात शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदिक वनस्पतींच्या सेवनाचे महत्त्व वाढले आहे. गुळवेल, गवती चहा, पुदिना अशा नानाविध गुणधर्म असलेल्या औषधी वनस्पतींचा वापर वाढला आहे. मान्सूननंतर रानमाळांवर या रानभाज्यांची उगवण होते. मात्र, चक्रीवादळामुळे चांगला पाऊस झाल्यानंतर गेल्या काही दिवसांत रानभाज्या उगवल्या आहेत. त्या खाण्याची संधी कोरोनाकाळात उपलब्ध झाली आहे. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी नागरिकांनी या भाज्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन कोसबाड कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ प्रा. विलास जाधव यांनी केले आहे.शेवली, कोळी, टाकळा, रानकेळी, सुरण अशा नानाप्रकारच्या रानभाज्या उगवल्या आहेत. त्या औषधी असून, विपुल प्रमाणात खनिजे, जीवनसत्त्वे असतात. डहाणूच्या कोसबाड येथील कृषी विज्ञान केंद्रातर्फे दरवर्षी रानभाज्यांचे प्रदर्शन आणि पाककृती स्पर्धा आयोजित केली जाते. चेन्नई येथील स्वामीनाथन फाउंडेशनच्या सहकार्याने परसबागेत अंबाडी, चवळाई, माठ, करटोली, कुर्डू, आदी रानभाज्यांचे संवर्धनही केले जाते. डहाणूतील झारली, किन्हवली या आदिवासी गावांमध्ये परसबागांची प्रात्यक्षिके आयोजित केली जातात. २५० आदिवासी कुटुंबांना प्रशिक्षण कोसबाड कृषी विज्ञान केंद्राने गेल्या वर्षी पालघर जिल्ह्यातील २५० आदिवासी कुटुंबांना विविध रानभाज्यांच्या संवर्धनाबाबत प्रशिक्षण दिले. डॉ. एम. एस. स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशन आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली सकस आहार बाग उपक्रमाद्वारे रानभाज्यांचे संवर्धन सुरू आहे. त्यांच्या सेवनाने कुपोषण निर्मूलनात मदत झाली. जिल्ह्यातील २५० शेतकऱ्यांच्या शेतावर सकस आहार प्रात्यक्षिक आयोजित केले जाणार आहे.रानभाज्या औषधी गुणधर्मयुक्त असतात. त्यांच्या आहारातील सेवनाने शरीरात रोगप्रतिकारकशक्ती वाढते आणि हे कोविडकाळात उपयुक्त ठरणार आहे.- प्रा. रूपाली देशमुख, गृहविज्ञान शास्त्रज्ञ, कोसबाड कृषी विज्ञान केंद्र. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या