शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

टँकरचीही होतेय पळवापळवी

By admin | Updated: April 7, 2016 01:17 IST

कल्याण-डोंबिवलीतील पाणीप्रश्न तीव्र होत असतानाच सोसायट्यांनी पैसे भरून बुक केलेले टँकरही गायब होऊ लागल्याने पाण्याचा काळाबाजार सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे

मुरलीधर भवार,  कल्याणउल्हासनगरपाठोपाठ कल्याण-डोंबिवलीतील पाणीप्रश्न तीव्र होत असतानाच सोसायट्यांनी पैसे भरून बुक केलेले टँकरही गायब होऊ लागल्याने पाण्याचा काळाबाजार सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. संख्या तिप्पट करूनही टँकरची पळवापळवी सुरू असल्याने वेटिंग लिस्ट सतत वाढते आहे. वेळेत आणि पुरेसे पाणी मिळत नसल्याने बाटलीबंद पाण्याची मागणी वाढली आहे. त्यांचे दरही अचानक वाढले आहेत. प्रसंगी तोटा सोसून महापालिका टंचाईग्रस्त भागाला माफक दरात टँकरद्वारे पाणी पुरवते. डोंबिवली पश्चिमेतील शास्त्रीनगरमधील जय त्रिरूप सोसायटीने फेब्रुवारीत पैसे भरून बुक केलेल्या चार टँकरपैकी अवघे दोनच टँकर त्यांना मिळाले. त्यापैकी दोनच टँकर सोसायटीने पाठपुरावा केल्यावर दिले गेले. उर्वरित दोन टँकर अद्याप सोसायटीला पुरविले गेलेले नाही. हे पाणी कोणी पळवले, असा सवाल सोसायटीचे सचिव रवींद्र नेहरकर यांनी केला.याबाबत, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा म्हणाले, सोसायटीने पाठपुरावा केला नसेल, तर त्यांना टँकर मिळाला नसेल. मागणी जास्त आहे म्हणून एकाचा टँकर दुसऱ्याला दिला जात नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. टँकर वाढणार३० टक्के पाणीकपातीनंतर खाजगी कंत्राटदारांचे १५ टँकर लावण्यात आले होते. पालिका खाजगी कंत्राटदाराला पाच फेऱ्यांचे दोन हजार ३४० रुपये मोजते. पण, नागरिकांकडून एका टँकरचे ३२० रुपये घेतले जातात. टंचाई भीषण झाल्याने आणखी १५ टँकर वाढवण्यात आले आहेत. तेही कमी पडून लागल्याने १५ टँकर वाढवले जाणार आहेत. >पाण्याचा काळाबाजार : भार्इंदर : शहरातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सरकारकडून अतिरिक्त पाणीपुरवठा होत आहे. परंतु, या अतिरिक्त पाण्याचा पालिकेच्या कंत्राटावर असलेले टँकरवाले नागरिकांच्या वाट्याचे पाणी काळ्याबाजारात खाजगी टँकरवाल्यांना खुलेआम विक्री करीत असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. यापूर्वीही पाणीटंचाईची झळ शहराला बसली असतानाच वरसावे येथील जलवाहिनीच्या व्हॉल्व्हमधील गळतीचा गैरफायदा घेणाऱ्या पाणीमाफियांची चोरी उघड झाली होती. > पाण्याच्या दोनच तक्रारी ठाणे : पाण्यासंदर्भातील अडचणी किंवा तक्रारींबाबत ठाणे जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांनी सुरू केलेल्या १०७७ या टोल फ्री क्रमांकावर पहिल्याच दिवशी दुपारी ३ वाजेपर्यंत दोनच तक्रारी आल्या. यामध्ये ठाणे शहरातून एक तर दुसरी नवी मुंबईतून आली आहे. सर्वत्र पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे. त्यातच, ठाणे जिल्ह्यातील विविध जलसाठ्यांतील पाणीसाठा हा अत्यल्प आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांत वेगळ्या स्वरूपात पाणीकपात करण्यास सुरुवात केली आहे.