शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

टँकरचीही होतेय पळवापळवी

By admin | Updated: April 7, 2016 01:17 IST

कल्याण-डोंबिवलीतील पाणीप्रश्न तीव्र होत असतानाच सोसायट्यांनी पैसे भरून बुक केलेले टँकरही गायब होऊ लागल्याने पाण्याचा काळाबाजार सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे

मुरलीधर भवार,  कल्याणउल्हासनगरपाठोपाठ कल्याण-डोंबिवलीतील पाणीप्रश्न तीव्र होत असतानाच सोसायट्यांनी पैसे भरून बुक केलेले टँकरही गायब होऊ लागल्याने पाण्याचा काळाबाजार सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. संख्या तिप्पट करूनही टँकरची पळवापळवी सुरू असल्याने वेटिंग लिस्ट सतत वाढते आहे. वेळेत आणि पुरेसे पाणी मिळत नसल्याने बाटलीबंद पाण्याची मागणी वाढली आहे. त्यांचे दरही अचानक वाढले आहेत. प्रसंगी तोटा सोसून महापालिका टंचाईग्रस्त भागाला माफक दरात टँकरद्वारे पाणी पुरवते. डोंबिवली पश्चिमेतील शास्त्रीनगरमधील जय त्रिरूप सोसायटीने फेब्रुवारीत पैसे भरून बुक केलेल्या चार टँकरपैकी अवघे दोनच टँकर त्यांना मिळाले. त्यापैकी दोनच टँकर सोसायटीने पाठपुरावा केल्यावर दिले गेले. उर्वरित दोन टँकर अद्याप सोसायटीला पुरविले गेलेले नाही. हे पाणी कोणी पळवले, असा सवाल सोसायटीचे सचिव रवींद्र नेहरकर यांनी केला.याबाबत, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा म्हणाले, सोसायटीने पाठपुरावा केला नसेल, तर त्यांना टँकर मिळाला नसेल. मागणी जास्त आहे म्हणून एकाचा टँकर दुसऱ्याला दिला जात नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. टँकर वाढणार३० टक्के पाणीकपातीनंतर खाजगी कंत्राटदारांचे १५ टँकर लावण्यात आले होते. पालिका खाजगी कंत्राटदाराला पाच फेऱ्यांचे दोन हजार ३४० रुपये मोजते. पण, नागरिकांकडून एका टँकरचे ३२० रुपये घेतले जातात. टंचाई भीषण झाल्याने आणखी १५ टँकर वाढवण्यात आले आहेत. तेही कमी पडून लागल्याने १५ टँकर वाढवले जाणार आहेत. >पाण्याचा काळाबाजार : भार्इंदर : शहरातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सरकारकडून अतिरिक्त पाणीपुरवठा होत आहे. परंतु, या अतिरिक्त पाण्याचा पालिकेच्या कंत्राटावर असलेले टँकरवाले नागरिकांच्या वाट्याचे पाणी काळ्याबाजारात खाजगी टँकरवाल्यांना खुलेआम विक्री करीत असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. यापूर्वीही पाणीटंचाईची झळ शहराला बसली असतानाच वरसावे येथील जलवाहिनीच्या व्हॉल्व्हमधील गळतीचा गैरफायदा घेणाऱ्या पाणीमाफियांची चोरी उघड झाली होती. > पाण्याच्या दोनच तक्रारी ठाणे : पाण्यासंदर्भातील अडचणी किंवा तक्रारींबाबत ठाणे जिल्हाधिकारी डॉ. अश्विनी जोशी यांनी सुरू केलेल्या १०७७ या टोल फ्री क्रमांकावर पहिल्याच दिवशी दुपारी ३ वाजेपर्यंत दोनच तक्रारी आल्या. यामध्ये ठाणे शहरातून एक तर दुसरी नवी मुंबईतून आली आहे. सर्वत्र पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे. त्यातच, ठाणे जिल्ह्यातील विविध जलसाठ्यांतील पाणीसाठा हा अत्यल्प आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांत वेगळ्या स्वरूपात पाणीकपात करण्यास सुरुवात केली आहे.