शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
2
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
3
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
4
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
5
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
6
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
7
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
8
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
9
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
10
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
11
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
12
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
13
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
14
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
15
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
16
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
17
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
18
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
19
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
Daily Top 2Weekly Top 5

फारकत घेतलेले मेटे पुन्हा भाजपासोबत

By admin | Updated: June 16, 2017 02:07 IST

आघाडीतून युतीत सहभागी झालेल्या पुढे मराठा मोर्चा, शिवस्मारक आणि मंत्रीपदावरून नाराज होत भाजपापासून फारकत घेतलेल्या विनायक मेटे

लोकमत न्यूज नेटवर्कभार्इंदर : आघाडीतून युतीत सहभागी झालेल्या पुढे मराठा मोर्चा, शिवस्मारक आणि मंत्रीपदावरून नाराज होत भाजपापासून फारकत घेतलेल्या विनायक मेटे यांनी मीरा-भार्इंदर पालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला चांगल्या कामाचे प्रशस्तीपत्र दिले आहे आणि भाजपासोबत पालिका निवडणूक लढवण्याची तयारीही दर्शवली आहे. आमची संग्राम परिषद स्वतंत्र निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. पण भाजपाने प्रतिसाद दिल्यास त्यांच्यासोबतही लढण्याची तयारी असल्याचे परिषदेचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी गुरुवारी मीरा रोडच्या जीसीसी येथील पत्रकार परिषदेत जाहीर केले. मेटे यांच्या सतत बदलणाऱ्या भूमिकेवर छेडले असता त्यांनी भाजपा चांगले काम करीत आहे. त्यामुळे आम्ही राजकारणासाठी न भांडता समाजकारणाच्या माध्यमातून निवडणूक लढविणार असल्याचे तत्वज्ञान मांडले. या निवडणुकीत भाजपाला शिवसेनेचा पाडाव करता यावा यासाठी शिवसंग्राम परिषदेच्या माध्यमातून मते फोडण्याचा डाव आहे का, असे विचारताच त्यांनी तसे नसल्याचे सांगत प्रश्नाला बगल दिली. या पत्रकार परिषदेला संग्राम परिषदेचे प्रदेशाध्यक्ष सुबोध मोहिते, शिवसंग्राम परिषदेचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे, मुंबई अध्यक्ष दिलीप माने आदी पदाधिकारी उपस्थित होते. ‘नेतृत्त्वहीन ठरल्यानेच मराठा मोर्चे फसले’आरक्षणाच्या मागणीसाठी काढलेले मराठा क्रांती मोर्चे नेतृत्वहीन ठरल्याने प्रभावी ठरले नाहीत. मात्र भारतीय संग्राम व शिवसंग्राम परिषदेने यासाठी मोठे कार्य केल्याचा मेटे यांचा दावा आहे. धनगर व मुस्लिम समाजालाही आरक्षण मिळावे, अशी भूमिका त्यांनी मांडली. भाजपाध्यक्ष अमित शहा हे उद्धव ठाकरे यांना भेटणार असल्याने सेना सत्तेतून बाहेर पडणार नसल्याचा दावा त्यांनी केला. शेतकऱ्यांना वेतन द्या!राज्यातील शेतकऱ्यांना दरमहा दोन हजार रुपये वेतन, मोफत आरोग्य सेवा, दैनंदिन कामाच्या हमीचा कायदा आदी मागण्या परिषदेने केल्याचे त्यांनी सांगितले. कर्जमाफीचा निर्णय स्वागतार्ह आहे. पण सरकारने सत्तेतील सर्व घटक पक्षांशी चर्चा करुन कर्जमाफीचा तपशील जाहीर करावा, अशी पुस्ती त्यांनी जोडली. सरकारने शेतकऱ्यांना १० हजारांची मदत जाहीर केली असली, तरी ती देण्यात बँका अडवणूक करत आहेत. अशा बँकांवर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली. असा झाला अन्याय...२०१४ मध्ये पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीवेळी आघाडीतून बाहेर पडून मेटे युतीत सामील झाले. भाजपाने विधानसभा निवडणुकीत पाच जागा देण्याचे मान्य केले. त्यातील दोनच जागा दिल्या. त्यात मुंबईतील एका जागेवर परिषदेचा उमेदवार निवडून आला. तेव्हा भाजपाने मंत्रिमंडळात माझा समावेश करण्यासह महामंडळावरील नियुुक्तीबाबत आश्वासन दिले. मात्र त्यांनी घुमजाव केल्याने माझ्यावर अन्याय झाल्याची खंत मेटे यांनी व्यक्त केली. त्यामुळे संग्राम परिषदेने अनेक ठिकाणी स्वतंत्रपणे निवडणूक लढवित यश मिळवले. मीरा-भार्इंदरमध्ये भाजपासोबत निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाजपाने आश्वासने न पाळल्याबद्दल नाराजी व्यक्त करतानाच मेटे यांनी त्यांच्यासोबत जाण्याचा पवित्रा घेतला. याबाबतची बातमी ‘लोकमत’ने १३ जूनच्या अंकात प्रसिद्ध केली होती.