शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

मीरा भाईंदर पालिकेच्या 'त्या' अधिकाऱ्यावर कडक कारवाई करा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 16:56 IST

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत मांडला औचित्याचा मुद्दा; परवानगी नसताना शहरात उभारले दोन पुतळे

ठळक मुद्देराज्य सरकार व गृह विभागाची परवानगी घेतल्याशिवाय कोणतेही पुतळे राज्यात उभारले जाऊ शकत नाही.बेकायदेशीर भूमिपूजन व उदघाटनही करून घेतले. राष्ट्रपुरुष , महापुरुष यांचे पुतळे बसविण्यास आमचा कोणताही विरोध नाही.

मीरारोड - राज्य शासनाची कोणतीही परवानगी नसताना वीर महाराणा प्रताप आणि अब्दुल कलाम यांचे पुतळे मीरा भाईंदर महापालिकेच्या बांधकाम विभागाने परवानगीशिवाय पालिकेच्या खर्चातून शहरात बसवले. सरकारच्या धोरणांची पायमल्ली करून परवानगी न घेता हे पुतळे बसवून राष्ट्रपुरुषांचा अपमान केल्याने पालिका अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे आज विधानसभेत केली.

 

राज्य सरकार व गृह विभागाची परवानगी घेतल्याशिवाय कोणतेही पुतळे राज्यात उभारले जाऊ शकत नाही. असे असताना राज्य शासनाच्या धोरणाला हरताळ फासून मीरा भाईंदर पालिकेच्या बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी विनापरवानगी परस्पर निविदा प्रक्रिया करून वीर महाराणा प्रताप व अब्दुल कलाम यांचे पुतळे बसवले होते.  विधानसभा निवडणुकीच्या आधी हे पुतळे बसवून ते ताडपत्रीने झाकून ठेवले होते. त्याचे बेकायदेशीर भूमिपूजन व उदघाटनही  करून घेतले. निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन एका पक्षाचा राजकीय फायदा होण्यासाठी एका स्थानिक नेत्याच्या सांगण्यावरून  हे पुतळे बसविण्यात आले असे नागरिकांचे म्हणणे आहे. 

 

या महापुरुषांच्या पुतळ्याची जर काही विटंबना झाली , काही अनुचित घटना घडली तर त्याला जबाबदार कोण ?  असा सवाल सरनाईक यांनी केला. असे बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या पालिका अधिकाऱ्यावर ताबडतोब निलंबनाची कारवाई करावी.  बेकायदेशीरपणे पुतळे बसविणाऱ्या अधिकाऱ्यावर व त्याचे भूमिपूजन - उदघाटन करणाऱ्यावर कडक कारवाई करावी , असे ते म्हणाले.

 

राष्ट्रपुरुष , महापुरुष यांचे पुतळे बसविण्यास आमचा कोणताही विरोध नाही. पण हे पुतळे बसवत असताना सर्व प्रक्रिया पूर्ण  व्हावी , जेणेकरून कोणताही प्रश्न पुढे उद्भवणार नाही असे सरनाईक म्हणाले. या परवानगी नसलेल्या पुतळ्याना , प्रलंबित असलेली रीतसर परवानगी देण्याबाबत तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणीही त्यांनी केली. 

टॅग्स :pratap sarnaikप्रताप सरनाईकMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक