शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

हत्या, आत्महत्या प्रकरणात तत्काळ कारवाई करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2020 02:32 IST

बदलापूरची घटना; महिला आयोगाने घेतली दखल

बदलापूर : बदलापूर येथील आठ वर्षीय मुलीची हत्या व तिच्या आईची आत्महत्या प्रकरणात पोलिसांकडून होत असलेल्या अन्यायाची राज्य महिला आयोगाने स्वत:हून गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात तत्काळ कारवाई करण्याचे आदेश आयोगाने ठाणे पोलीस आयुक्तांना दिले आहेत. ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीची दखल घेऊन आयोगाने हे आदेश दिले आहेत.फ्लॅटसह विविध कारणांसाठी सतत पैशाची मागणी तसेच घटस्फोट द्यावा यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून मीना पाटील या विवाहितेने आठ वर्षांच्या मुलीचा चाकूने गळा चिरून स्वत:ही आत्महत्या केल्याची घटना बदलापूर येथे १० जून रोजी रात्री ११ वाजता घडली. या घटनेला मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेला पती व सासू जबाबदार असून त्यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करावा यासाठी मीना हिच्या वडिलांनी मंगळवारी ठाणे, अंबरनाथ व बदलापूर येथे पोलीस अधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी केली. मात्र पोलिसांनी टोलवाटोलवी करून मीना यांच्या वडिलांचा जबाब लिहून घेत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याचे टाळले. हा जबाब महत्त्वाचा असून त्याआधारे पुढील कारवाई करू, असे सांगून नातेवाइकांची बोळवण केली. या प्रकरणाचे तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक हर्षल कुळकर्णी यांना विचारले असता, हे प्रकरण माझ्याकडे आहे. मुलीच्या वडिलांना सर्व गोष्टी सविस्तर समजावून सांगण्यात आल्या आहेत, आपण त्यांच्याकडूनच माहिती घ्यावी, असे त्यांनी सांगितले. मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी दिलेली आहे; मात्र आपण गुन्हा का दाखल केला नाही, या प्रश्नावर बोलणे मात्र त्यांनी टाळले. एकंदरीतच या प्रकरणात मीना हिचे पती अशोक पाटील पोलीस दलात असल्याने त्याला वाचविण्याचा प्रयत्न बदलापूर पोलिसांकडून केला जात असल्याचा आरोप वडील दिलीप पाटील यांनी केला.राज्य महिला आयोगाच्या समुपदेशक सुनीता गणगे यांनी पोलीस अधिकाºयांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, सदर प्रकरण गंभीर असून आयोगाने स्वत:हून त्याची दखल घेतली आहे. या प्रकरणात पोलिसांकडून तत्काळ योग्य ती कारवाई करावी व केलेल्या कारवाईचा अहवाल महिला आयोगास सादर करावा, असे आदेश दिले आहेत.