शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वस्तूंपेक्षा आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्या, विवेक फणसळकर यांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2020 01:16 IST

घरातून चोरीला गेलेला मुद्देमाल परत मिळू शकतो. मात्र, घरातून गेलेली व्यक्ती कधीही परत येऊ शकत नाही.

कल्याण : घरातून चोरीला गेलेला मुद्देमाल परत मिळू शकतो. मात्र, घरातून गेलेली व्यक्ती कधीही परत येऊ शकत नाही. त्यामुळे नागरिकांनी प्राणापेक्षा जास्त आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्यावी, असे आवाहन ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी कल्याणमध्ये बुधवारी केले.अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभागातर्फे आयोजित मुद्देमाल हस्तांतरण सोहळा पश्चिमेतील मंगेशी बँक्वेट सभागृहात बुधवारी सायंकाळी झाला. यावेळी ते बोलत होते.घरामध्ये अनेक व्यक्ती असतानाही चोरी होते, ज्याची घरातील मंडळींना अजिबात माहिती नसते. मात्र, पोलिसांनी या चोरीचा छडा लावावा आणि आपला मुद्देमाल परत मिळवून द्यावा, अशी नागरिकांची अपेक्षा असते. हा मुद्देमाल परत मिळवणे आणि ओळख पटवून संबंधित व्यक्तीला परत करणे हा अत्यंत खडतर, असा प्रवास असल्याचे फणसळकर यांनी यावेळी म्हणाले.या कार्यक्रमात विविध पोलीस ठाण्यांच्या तपास अधिकाऱ्यांनी जप्त केलेल्या गुन्ह्यांतील सोन्याचे दागिने, महागडे मोबाइल, आलिशान गाड्या, दुचाकी आणि रोकड, असा एक कोटी १७ लाख रुपयांचा ऐवज संबंधितांना समारंभात सन्मानपूर्वक परत केला.यावेळी अपर पोलीस आयुक्त दत्तात्रेय कराळे, कल्याणचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे, उल्हासनगरचे पोलीस उपायुक्त प्रमोद शेवाळे, सहायक आयुक्त अनिल पोवार व दिलीप राऊत यांच्यासह सर्व पोलीस ठाण्यांतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी, मंगळसूत्रांसह अन्य दागिने, मोबाइल आणि रोकड परत मिळाल्यामुळे अनेकांनी समाधान व्यक्त केले.>सतर्क राहणे आवश्यकपोलिसांच्या सतर्कतेमुळे आमचा ऐवज आम्हाला परत मिळाला आहे. असे असले तरी, आपणही सतर्क राहणे गरजेचे आहे. ज्यामुळे, अशा स्वरूपाच्या घटना कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे आपण पोलिसांची सहायता करण्याबरोबरच एक चांगले नागरिक बनण्याचे कर्तव्य पार पाडू शकतो, असे मत मंजू दुबे यांनी यावेळी व्यक्त केले.>वाईट गोष्टींचे चांगल्यात रूपांतरआपल्या जीवनात चांगल्या-वाईट गोष्टी घडत असतात. आपल्या बाबतीत वाईट गोष्टी घडल्याने आज आपण इथे आलो आहोत. पण, त्या वाईट गोष्टींचे चांगल्यामध्ये रूपांतरण करून त्या गोष्टी हस्तांतरण करण्याचे काम पोलिसांनी केले असल्याचे मत महेश वाघ यांनी व्यक्त केले.>सव्वा कोटींचा मुद्देमाल केला होता परत : ठाणे ग्रामीण पोलिसांनी १२ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत झालेल्या चोरी आणि जबरी चोरीदरम्यान चोरीला गेलेले दागिने, मोबाइल, मोटारसायकल असा एक कोटी २५ लाख ६९ हजार ८३६ रुपयांचा मुद्देमाल ४५ फिर्यादींना अलिकडेच परत केला होता. त्यामध्ये अंबरनाथ येथील निवृत्त लेफ्टनंट सनी थॉमस यांची सेवा पदके आणि रोकड असा दोन लाख ३५ हजारांचा ऐवजाचाही समावेश होता.