शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

वस्तूंपेक्षा आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्या, विवेक फणसळकर यांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2020 01:16 IST

घरातून चोरीला गेलेला मुद्देमाल परत मिळू शकतो. मात्र, घरातून गेलेली व्यक्ती कधीही परत येऊ शकत नाही.

कल्याण : घरातून चोरीला गेलेला मुद्देमाल परत मिळू शकतो. मात्र, घरातून गेलेली व्यक्ती कधीही परत येऊ शकत नाही. त्यामुळे नागरिकांनी प्राणापेक्षा जास्त आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्यावी, असे आवाहन ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी कल्याणमध्ये बुधवारी केले.अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभागातर्फे आयोजित मुद्देमाल हस्तांतरण सोहळा पश्चिमेतील मंगेशी बँक्वेट सभागृहात बुधवारी सायंकाळी झाला. यावेळी ते बोलत होते.घरामध्ये अनेक व्यक्ती असतानाही चोरी होते, ज्याची घरातील मंडळींना अजिबात माहिती नसते. मात्र, पोलिसांनी या चोरीचा छडा लावावा आणि आपला मुद्देमाल परत मिळवून द्यावा, अशी नागरिकांची अपेक्षा असते. हा मुद्देमाल परत मिळवणे आणि ओळख पटवून संबंधित व्यक्तीला परत करणे हा अत्यंत खडतर, असा प्रवास असल्याचे फणसळकर यांनी यावेळी म्हणाले.या कार्यक्रमात विविध पोलीस ठाण्यांच्या तपास अधिकाऱ्यांनी जप्त केलेल्या गुन्ह्यांतील सोन्याचे दागिने, महागडे मोबाइल, आलिशान गाड्या, दुचाकी आणि रोकड, असा एक कोटी १७ लाख रुपयांचा ऐवज संबंधितांना समारंभात सन्मानपूर्वक परत केला.यावेळी अपर पोलीस आयुक्त दत्तात्रेय कराळे, कल्याणचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे, उल्हासनगरचे पोलीस उपायुक्त प्रमोद शेवाळे, सहायक आयुक्त अनिल पोवार व दिलीप राऊत यांच्यासह सर्व पोलीस ठाण्यांतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी, मंगळसूत्रांसह अन्य दागिने, मोबाइल आणि रोकड परत मिळाल्यामुळे अनेकांनी समाधान व्यक्त केले.>सतर्क राहणे आवश्यकपोलिसांच्या सतर्कतेमुळे आमचा ऐवज आम्हाला परत मिळाला आहे. असे असले तरी, आपणही सतर्क राहणे गरजेचे आहे. ज्यामुळे, अशा स्वरूपाच्या घटना कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे आपण पोलिसांची सहायता करण्याबरोबरच एक चांगले नागरिक बनण्याचे कर्तव्य पार पाडू शकतो, असे मत मंजू दुबे यांनी यावेळी व्यक्त केले.>वाईट गोष्टींचे चांगल्यात रूपांतरआपल्या जीवनात चांगल्या-वाईट गोष्टी घडत असतात. आपल्या बाबतीत वाईट गोष्टी घडल्याने आज आपण इथे आलो आहोत. पण, त्या वाईट गोष्टींचे चांगल्यामध्ये रूपांतरण करून त्या गोष्टी हस्तांतरण करण्याचे काम पोलिसांनी केले असल्याचे मत महेश वाघ यांनी व्यक्त केले.>सव्वा कोटींचा मुद्देमाल केला होता परत : ठाणे ग्रामीण पोलिसांनी १२ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत झालेल्या चोरी आणि जबरी चोरीदरम्यान चोरीला गेलेले दागिने, मोबाइल, मोटारसायकल असा एक कोटी २५ लाख ६९ हजार ८३६ रुपयांचा मुद्देमाल ४५ फिर्यादींना अलिकडेच परत केला होता. त्यामध्ये अंबरनाथ येथील निवृत्त लेफ्टनंट सनी थॉमस यांची सेवा पदके आणि रोकड असा दोन लाख ३५ हजारांचा ऐवजाचाही समावेश होता.