शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
3
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
4
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
6
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
7
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
8
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
9
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
11
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
12
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
13
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
14
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
15
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
16
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
17
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
19
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
20
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले

लक्ष्मी नदीचे सौंदर्य लयास; माफियांकडून बेकायदा भराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 23:00 IST

गावपाडे पाण्याखाली, शेती नामशेष होणार

- धीरज परबमीरा रोड : मीरा-भाईंदर महापालिका हद्दीतील लक्ष्मी नदी व तिच्या पात्र परिसराचे सौंदर्य माफियांनी प्रशासन व राजकारण्यांना हाताशी धरून ओरबाडून भकास करायचा सपाटा लावला आहे. पूरनियंत्रण रेषा, सीआरझेड, इको सेन्सेटिव्ह झोन, नाविकास क्षेत्र असूनही सर्रास उल्लंघन केले जात आहे. बेकायदा भराव व बांधकामांमुळे पर्यावरणाचा ºहास होत असून येथील आदिवासीपाडे, गावे पाण्याखाली येऊ लागली आहेत. शेती, बागायती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. विशेष म्हणजे हा परिसर नवनिर्वाचित महापौर ज्योत्स्ना हसनाळे व आमदार प्रताप सरनाईक यांच्या मतदारसंघातील आहे.डोंगरावरून येणारा पावसाळ्यातील पाण्याचा मोठा प्रवाह या लक्ष्मी नदीतूनच पुढे जातो. या निसर्गरम्य ठिकाणच्या बहुतांश जमिनी मूळ आदिवासींच्या आहेत. पण, अनेकांनी त्या आदिवासी जमिनी विविध मार्गांनी आपल्या अखत्यारित घेतल्या आहेत. तब्बल २० ते २५ फूट इतक्या उंचीचा भराव थेट नदी व पात्रात करून भूखंड तयार केले. तेथे कच्ची, पक्की बांधकामे करून वाणिज्य वापर सुरू आहे. नैसर्गिक पाण्याच्या प्रवाह क्षेत्रातही खाजगी लोकांनी भराव केले आहेत. या भरावामुळे काही वर्षांपासून चेणेगाव-पाडे व परिसरात पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होत असल्याने आदिवासी व ग्रामस्थ संतापले आहेत. भविष्यात येथील राष्ट्रीय महामार्ग अर्थात घोडबंदर मार्गही पाण्याखाली येण्याचा धोका निर्माण झाला आहे. अनेकांची शेती व बागायती उद्ध्वस्त झाली आहे.महसूल विभागाने केवळ भरावाचे मोजमाप घेऊन दंड लावण्याची खानापूर्तीकेली आहे. या चालणाऱ्या भरावाकडे कानाडोळा करत आहेत. महापालिका न्याय देत नसल्याने चेणे येथील जमीनधारक अजय पाठक यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. २०११ पासून या ठिकाणी बेकायदा भराव करण्याचे प्रकार सुरू झाल्याचे सांगत महामार्गालगत तर २५ फूट इतका भराव नदी व पात्र परिसरात केला आहे. १४४ ते १४६ या सर्व्हे क्रमांकावर भरावप्रकरणी एक कोटी ६२ लाखांचा बोजा चढवला होता, पण तोच दंड जिल्हाधिकारी कार्यालयाने २२ लाखांवर आणला. येथील भराव काढण्याचे आदेश देण्याची विनंती न्यायालयास केली असून न्यायालयाने कोर्ट कमिशन नियुक्त केले आहे.लोकप्रतिनिधींचीही चौकशी कराभराव, बांधकामांविरोधात श्रमजीवी संघटनेने सतत तक्रारी केलेल्या आहेत. बेजबाबदार अधिकाऱ्यांना निलंबित करून माफियांवर गुन्हे दाखल केले पाहिजेत. झालेला भराव, बांधकामे काढून याला संरक्षण देणाºया लोकप्रतिनिधींचीही चौकशी करावी, असे श्रमजीवी संघटनेचे महाराष्ट्र सरचिटणीस बाळाराम भोईर यांनी सांगतिले.