शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

समाज व्यवस्थेपेक्षा धर्मव्यवस्था होतेय वरचढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 04:14 IST

नयनतारा सहगल यांच्या भाषणातील राजकीय मुद्द्यांमुळे यवतमाळ येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आमंत्रण राजकीय दबावापोटी त्यांना नाकारण्यात आले.

कल्याण : नयनतारा सहगल यांच्या भाषणातील राजकीय मुद्द्यांमुळे यवतमाळ येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आमंत्रण राजकीय दबावापोटी त्यांना नाकारण्यात आले. आपल्याच हाताने भारताची प्रतिमा आपण एक असहिष्णू देश म्हणून करीत आहोत. ती आता दुरुस्त केली पाहिजे. आजचा काळ हा राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक बदलांचा आहे. या काळात समाजव्यवस्थेपेक्षा धर्माची व्यवस्था वरचढ होऊ पाहत आहे. चळवळींना संपविण्याचे सत्र सुरू झाले असल्याचे परखड मत सुप्रसिद्ध कवयित्री व महानगर मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा नीरजा यांनी रविवारी येथे व्यक्त केले.मुंबई मराठी साहित्य संघ आणि कल्याण येथील सार्वजनिक वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ४४व्या महानगर मराठी साहित्य संमेलनात नीरजा बोलत होत्या. स्वागताध्यक्ष माजी नगरसेवक रवी पाटील होते. रेखा नार्वेकर यांच्या ‘अमृतकण कोवळे’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी व्यासपीठावर कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महापौर विनीता राणे, मुंबई मराठी साहित्य संघाचे प्रमुख कार्यवाह डॉ. रा. अ. भालेराव, कार्याध्यक्ष प्रा. उषा तांबे, संस्थेच्या साहित्य शाखा कार्यवाह डॉ. उज्ज्वला मेहेंदळे, सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष राजीव जोशी, सरचिटणीस भिकू बारस्कर, कलाकार विघ्नेश जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र भामरे यांनी केले.नीरजा म्हणाल्या, पंडित नेहरू यांनी भारतीयत्वाची व्याख्या मांडताना सहिष्णू असणे, हीच भारतीय असण्याची खूण आहे, असे म्हटले होते, पण आज असहिष्णुतेवर बोलण्याची वेळ आली आहे. ही खरोखरच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कारण महाराष्ट्राची ओळख एक पुरोगामी राज्य अशीच आहे. महाराष्ट्राला प्रबोधनाचा मोठा इतिहास आहे. ७०-८०च्या दशकात प्रत्येक जण आपल्या शैलीत लिहीत होता. प्रभावाखाली लिहिणारी माणसे होती. मात्र, ती तग धरू शकली नाहीत. त्या काळी अनेक गुंतागुंतीच्या विषयांवर लिखाण व्हायचे. मात्र, अशा प्रवाहाच्या विरोधात लिहिणाऱ्यांना समाज माध्यमावर ट्रोल केले जात नव्हते. माणसाच्या आयुष्यातील निरर्थकता, त्या काळची टॅगलाइन होती. आपल्या अस्तित्वाची वेदना घेऊन लेखक लिखाण करीत होते. साहित्यातून दुर्बोधता उमटत होती. ‘कोसला’ आणि ‘सखाराम बाइंडर’ यासारखे वातावरण ढवळून निघणारे प्रयत्न त्या वेळी साहित्यातून झाले. आजचे लेखन हे कोरडेपणाकडे चाललेले आहे. एकीकडे आपण भावनात्मक विचार करतो आणि वेगळ्या पातळीवर कोरडेपणा जपतो, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.महानगरीय साहित्याचा प्रवाह क्षीण होत चाललेला आहे. आताचा काळ हा संवेदनशील माणसाला अस्वस्थ करणारा आहे. लेखकासाठी हा जिकिरीचा काळ आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील लेखक आणि कवींमध्ये अस्वस्थता जाणवत आहे. ही अस्वस्थता शहरांपुरती मर्यादित न राहता खेड्यांतदेखील आहे. सत्यपाल राठोडसारखे कवी ती आपल्या कवितेतून मांडत आहे. या सगळ्या वातावरणात तांत्रिक जगणे जाणवत आहे. जागतिकीकरणातून क्रांती झाली. त्यातून आपण चांगले आयुष्य जगू शकतो, परंतु तसे होताना दिसत नाही. स्त्रियांची अवस्था ही तशीच आहे. कवयित्री त्यावर लिहीत आहेत. ग्रामीण भागातील स्त्रियांना समाजाच्या चौकटीतून बाहेर येता येत नाही. ९० नंतरचे स्त्रियांचे लिखाण हे सीमारेषेवर धडपडताना दिसत आहे. मध्यमवर्गीय माणूस चळवळीपासून तुटू लागला आहे. अशा वेळी एक लेखक आणि कवी म्हणून काय करता येईल, हे आपण पाहिले पाहिजे, असे नीरजा या वेळी म्हणाल्या.>लेखक, कवींचे मौन का?मुंबईसह आसपासच्या सर्व महानगरांवर बिल्डरांनी कब्जा केला आहे. धनदांडग्यांचे डोळे फक्त शेअर बाजारांकडे लागले आहेत.सांस्कृतिक, सामाजिक वातावरण गढूळ झाले असताना लेखक आणि कवी त्यावर काही बोलण्यास तयार नाही. विविध आक्रमणांच्या ओझ्याखाली दबले गेले असताना माणूसपण जपण्याची जबाबदारी साहित्यिकांची आहे.दाभोलकर, गौरी लंकेश यासारख्या चळवळीतील लोकांना संपविण्याचा डाव असल्याचा आरोप करीत, सहगल यांना आमंत्रण नाकारल्याचा नीरजा यांनी निषेध केला.