शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

काँग्रेस श्रेष्ठींच्या तंबीनंतर नाराजांची तलवार म्यान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 02:41 IST

मनोज शिंदे पहिल्या रांगेत : आव्हाडांचा करवून घेतला सत्कार

ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आनंद परांजपे यांचा प्रचार करण्याबाबतचे आदेश पक्षाने देऊनही काँग्रेस शहराध्यक्ष मनोज शिंदे यांच्या गटाने असहकार केल्याची गंभीर दखल पक्षश्रेष्ठींनी घेऊन कानउघाडणी केल्यानंतर आता शिंदे यांचा गट सुतासारखा सरळ आला आहे.

आमच्या मागण्या मान्य झाल्या तरच प्रचार करू, असा इशारा शिंदे यांनी दिला होता. परंतु, पक्षश्रेष्ठींनी कान टोचल्यावर काँग्रेसच्या शहराध्यक्षांसह नाराज मंडळींनी राष्टÑवादीपेक्षा काँग्रेसच परांजपे यांना जास्त मते मिळवून देईल, असा नारा देत यू टर्न घेतला.ठाणे शहर काँग्रेसमधील ब्लॉक अध्यक्षांनी ज्या ठिकाणी जितेंद्र आव्हाड असतील, त्या ठिकाणी आम्ही प्रचार करणार नसल्याची भूमिका घेणारे पत्र प्रदेशाध्यक्षांना पाठवले होते. तत्पूर्वी काँग्रेसमधील पूर्णेकर गटाने राष्टÑवादीच्या उमेदवाराला आमचा संपूर्ण पाठिंबा असल्याची भूमिका जाहीर केल्याने काँग्रेसमधील दोन गटांमधील वाद उफाळून आल्याचे दिसले. राष्टÑवादी काँग्रेसच्या नेत्यांनी पुढाकार घेत, काँग्रेसचे प्रवक्ते हुसेन दलवाई यांच्या उपस्थितीत अगोदर तोडगा काढला होता. त्यानंतरही ठाण्यातील काँग्रेसच्या काही मंडळींनी राष्टÑवादीविरोधात असहकार पुकारला होता. त्यांनी काही मागण्या केल्या होत्या. त्या पूर्ण झाल्या तरच आम्ही निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे काम करू, असेही स्पष्ट केले होते. मागण्या अमान्य झाल्यास मेळाव्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय या मंडळींनी घेतला होता. राष्टÑवादीच्या नेत्यांनी ही बाब काँग्रेसच्या नेतृत्वाच्या निदर्शनास आणली. काँग्रेसच्या श्रेष्ठींकडूनही नाराज मंडळींची कानउघाडणी झाल्यानंतर मंगळवारी झालेल्या आघाडीच्या मेळाव्याला या नाराजांना राष्टÑवादीने पहिल्या रांगेत जागा देऊ केली.

विशेष म्हणजे नाराज मनोज शिंदे यांच्या हस्ते राष्टÑवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि माजी मंत्री गणेश नाईक यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांच्याच पक्षातील काँग्रेसचे गटनेते विक्रांत चव्हाण यांनी नाराज मनोज शिंदे आणि इतर पदाधिकाऱ्यांची भरसभेत कानउघाडणी केली. काँग्रेसमध्ये कोणत्याही प्रकारची नाराजी नसून सर्व राजी असल्याचे त्यांनी सांगितले. परांजपे यांचे काम करायचे असल्याचा आदेश राहुल गांधी यांचा असून ज्यांना काम करायचे नसेल, त्यांनी खुशाल घरी बसावे, असा निर्वाणीचा सूर त्यांनी लावला.काँग्रेसमधील गटबाजीची कबुलीकाँग्रेसचे प्रवक्ते हुसेन दलवाई यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. काँग्रेस पक्षातील गटबाजी संपवण्यात आम्हाला यश आले नसल्याची कबुली यावेळी दलवाई यांनी दिली. मात्र, त्याचवेळी राष्टÑवादीने ही गटबाजी संपुष्टात आणली असल्याचे त्यांनी सांगितले.काँग्रेसमधील नाराजी नाट्यावर अखेर पडदा पडल्याने ही बाब आघाडीसाठी नक्कीच जमेची बाजू असली, तरी हा नाराज गट प्रत्यक्ष निवडणूक प्रचारात कसा व कितपत सक्रिय होतो, याकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांचे व काँग्रेस पक्षश्रेष्ठींचे बारीक लक्ष आहे.स्थानिक नाराज नेत्यांनी पक्षश्रेष्ठींसमोर प्रामाणिकपणे काम करण्याच्या मोठमोठ्या गोष्टी करायच्या आणि प्रत्यक्षात मात्र निवडणूक कामातून अंग काढायचे, असे विश्वासघातकी प्रकार होणार नाहीत, याकडे पक्षस्तरावर लक्ष ठेवले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडthaneठाणे