शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस श्रेष्ठींच्या तंबीनंतर नाराजांची तलवार म्यान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 02:41 IST

मनोज शिंदे पहिल्या रांगेत : आव्हाडांचा करवून घेतला सत्कार

ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आनंद परांजपे यांचा प्रचार करण्याबाबतचे आदेश पक्षाने देऊनही काँग्रेस शहराध्यक्ष मनोज शिंदे यांच्या गटाने असहकार केल्याची गंभीर दखल पक्षश्रेष्ठींनी घेऊन कानउघाडणी केल्यानंतर आता शिंदे यांचा गट सुतासारखा सरळ आला आहे.

आमच्या मागण्या मान्य झाल्या तरच प्रचार करू, असा इशारा शिंदे यांनी दिला होता. परंतु, पक्षश्रेष्ठींनी कान टोचल्यावर काँग्रेसच्या शहराध्यक्षांसह नाराज मंडळींनी राष्टÑवादीपेक्षा काँग्रेसच परांजपे यांना जास्त मते मिळवून देईल, असा नारा देत यू टर्न घेतला.ठाणे शहर काँग्रेसमधील ब्लॉक अध्यक्षांनी ज्या ठिकाणी जितेंद्र आव्हाड असतील, त्या ठिकाणी आम्ही प्रचार करणार नसल्याची भूमिका घेणारे पत्र प्रदेशाध्यक्षांना पाठवले होते. तत्पूर्वी काँग्रेसमधील पूर्णेकर गटाने राष्टÑवादीच्या उमेदवाराला आमचा संपूर्ण पाठिंबा असल्याची भूमिका जाहीर केल्याने काँग्रेसमधील दोन गटांमधील वाद उफाळून आल्याचे दिसले. राष्टÑवादी काँग्रेसच्या नेत्यांनी पुढाकार घेत, काँग्रेसचे प्रवक्ते हुसेन दलवाई यांच्या उपस्थितीत अगोदर तोडगा काढला होता. त्यानंतरही ठाण्यातील काँग्रेसच्या काही मंडळींनी राष्टÑवादीविरोधात असहकार पुकारला होता. त्यांनी काही मागण्या केल्या होत्या. त्या पूर्ण झाल्या तरच आम्ही निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे काम करू, असेही स्पष्ट केले होते. मागण्या अमान्य झाल्यास मेळाव्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय या मंडळींनी घेतला होता. राष्टÑवादीच्या नेत्यांनी ही बाब काँग्रेसच्या नेतृत्वाच्या निदर्शनास आणली. काँग्रेसच्या श्रेष्ठींकडूनही नाराज मंडळींची कानउघाडणी झाल्यानंतर मंगळवारी झालेल्या आघाडीच्या मेळाव्याला या नाराजांना राष्टÑवादीने पहिल्या रांगेत जागा देऊ केली.

विशेष म्हणजे नाराज मनोज शिंदे यांच्या हस्ते राष्टÑवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि माजी मंत्री गणेश नाईक यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांच्याच पक्षातील काँग्रेसचे गटनेते विक्रांत चव्हाण यांनी नाराज मनोज शिंदे आणि इतर पदाधिकाऱ्यांची भरसभेत कानउघाडणी केली. काँग्रेसमध्ये कोणत्याही प्रकारची नाराजी नसून सर्व राजी असल्याचे त्यांनी सांगितले. परांजपे यांचे काम करायचे असल्याचा आदेश राहुल गांधी यांचा असून ज्यांना काम करायचे नसेल, त्यांनी खुशाल घरी बसावे, असा निर्वाणीचा सूर त्यांनी लावला.काँग्रेसमधील गटबाजीची कबुलीकाँग्रेसचे प्रवक्ते हुसेन दलवाई यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. काँग्रेस पक्षातील गटबाजी संपवण्यात आम्हाला यश आले नसल्याची कबुली यावेळी दलवाई यांनी दिली. मात्र, त्याचवेळी राष्टÑवादीने ही गटबाजी संपुष्टात आणली असल्याचे त्यांनी सांगितले.काँग्रेसमधील नाराजी नाट्यावर अखेर पडदा पडल्याने ही बाब आघाडीसाठी नक्कीच जमेची बाजू असली, तरी हा नाराज गट प्रत्यक्ष निवडणूक प्रचारात कसा व कितपत सक्रिय होतो, याकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांचे व काँग्रेस पक्षश्रेष्ठींचे बारीक लक्ष आहे.स्थानिक नाराज नेत्यांनी पक्षश्रेष्ठींसमोर प्रामाणिकपणे काम करण्याच्या मोठमोठ्या गोष्टी करायच्या आणि प्रत्यक्षात मात्र निवडणूक कामातून अंग काढायचे, असे विश्वासघातकी प्रकार होणार नाहीत, याकडे पक्षस्तरावर लक्ष ठेवले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडthaneठाणे