शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भाईंदर परिसरामध्ये भरावमाफियांचा धुमाकूळ; सरकारी यंत्रणेची डाेळेझाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 01:27 IST

कांदळवन, नैसर्गिक पाणथळ जागी भराव

मीरा राेड : मीरा-भाईंदरमध्ये भरावमाफियांनी धुमाकूळ घातला असून राजरोस सीआरझेड, कांदळवन, नैसर्गिक पाणथळ आणि ना-विकास क्षेत्रातही त्यांनी भराव केला आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होऊन शहर बुडण्याचा धोका वाढला असताना महापालिका, पोलीस, राजकारणी आणि महसूल विभागाकडून याकडे हाेत असलेल्या डाेळेझाकीबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

महापालिकेचे रस्ते-पदपथ व विविध बांधकामे यातून माेठ्या प्रमाणात डेब्रिज निघते. मुंबईहूनही भरणीसाठी डम्पर येतात. कांदळवन, पाणथळ, सीआरझेड आणि ना-विकास क्षेत्र यांसारख्या संवेदनशील क्षेत्राच्या संरक्षणाची जबाबदारी महापालिकेसह नगरसेवक, पोलीस, महसूल, वनविभाग आदींची आहे. मात्र, अशा ठिकाणी सातत्याने हाेणाऱ्या भरावामुळे पर्यावरणाचा ऱ्हास हाेऊन पावसाचे पाणी साठवून ठेवणारे नैसर्गिक पाणवठेही नष्ट हाेत आहेत.

महापालिकेने भराव रोखण्यासाठी पथके नेमून स्वच्छता निरीक्षक, कनिष्ठ अभियंता आणि प्रभाग अधिकारी आदींना जबाबदारी दिली आहे. मात्र, तरीही भरावाची समस्या कायम असून तक्रार येईपर्यंत त्याकडे दुर्लक्ष हाेत आहे. डेब्रिजची डाेळ्यांदेखत वाहतूक सुरू असतानाही पालिका जबाबदारी झटकताना दिसत आहे, असा नागरिकांचा आराेप आहे. कांदळवन समितीमध्ये पाेलिसांचाही समावेश असून कांदळवन संरक्षणाची त्यांचीही जबाबदारी असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. 

परिमंडळ १ मीरा-भाईंदरचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. माती-दगड भरावाच्या कारवाईची जबाबदारी महसूल विभागावर आहे. तलाठी-मंडळ अधिकारी स्वतःहून गस्त घालून या माफियांना जरब बसविण्याचा प्रयत्न करीत नाहीत. भरणी करून खाजगी जमीनमालक, विकासक आदींना भूखंड तयार करून दिले जातात. खाजगीच नाही, तर सरकारी जागेतही हा प्रकार सुरू आहे. भराव टाकण्यासाठी वरून पैसेही मिळतात.

शहरासाठी केवळ चार-पाच तलाठीच आहेत. तरीही तक्रारीनुसार कांदळवनात भराव करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून दंडात्मक कारवाई केली जाते. महापालिका आणि पोलिसांना संयुक्त बैठक बोलावून कार्यवाहीची रूपरेषा ठरविण्यात येईल. - नंदकिशोर देशमुख, अपर तहसीलदार

महापालिका याकडे अजिबात दुर्लक्ष करणार नाही. भराव झालेल्याची माहिती तपासून त्यावर तत्काळ याेग्य कारवाई केली जाईल. वॉटर बॉडीज-कांदळवनातील भराव काढला जाईल. कांदळवन व वॉटरबॉडी शहरासाठी महत्त्वाच्या आहेत. - दिलीप ढोले, अतिरिक्त आयुक्त,     महापालिका

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक