शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
3
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
4
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
5
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
6
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
7
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
8
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
9
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
10
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
11
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
12
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
13
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
14
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
15
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
16
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
17
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
18
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
19
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
20
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  

स्वच्छ भारत अभियान : केडीएमसीला हगणदरीमुक्त २ प्लसचे प्रमाणपत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 00:49 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेस हगणदरी मुक्तीचे २ प्लसचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेस हगणदरी मुक्तीचे २ प्लसचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. सार्वजनिक प्रसाधनगृहे आणि एसटीपी प्लांट, अशा दोन्ही सोयीसुविधा उपलब्ध असलेल्या शहरांना हगणदरी २ प्लसचे प्रमाणमिळते. महापालिकेच्या हद्दीत या दोन्ही सुविधा असल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट झाल्याने हे प्रमाणपत्र देण्यात आले.स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिकेस ११४ कोटी रुपये मंजूर झाले होते. त्यापैकी केवळ काही टक्के रक्कम सरकारकडून मिळणार होती. तर, उर्वरित रक्कम महापालिकेने उभारणे अपेक्षित होते. महापालिकेने या अभियानांतर्गत कचरा उचलणाऱ्या गाड्या खरेदी केल्या. तसेच ६० कोटी रुपये उंबर्डे व बारावे घनकचरा प्रकल्प उभारणे, शास्त्रोक्त पद्धतीने आधारवाडी डम्पिंग बंद करणे, यावर खर्च करण्यात येणार आहेत.स्वच्छ भारत अभियान महापालिका हद्दीत २०१४ पासून सुरू आहे. गेल्या चार वर्षांत महापालिकेस केवळ हगणदरीमुक्तीचे प्लस वनचे प्रमाणपत्र मिळाले होते. एका वर्षात महापालिकेस कोणतेही प्रमाणपत्र मिळालेले नव्हते. दरवर्षी केंद्र सरकारचे पथक पाहणी करून स्वच्छ सर्वेक्षणाचा आढावा घेते. महापालिकेने झोपडपट्टी परिसरातील ८३ सार्वजनिक शौचालये व रेल्वे स्थानक, बस स्थानक याठिकाणची २० सार्वजनिक शौचालये सुस्थितीत असल्याचा अहवाल तयार केला होता. त्यापैकी २६ सार्वजनिक शौचालयेही ही उत्कृष्ट असल्याचा दावा केला होता. मात्र, पथकाच्या पाहणीनंतर २६ सार्वजनिक शौचालयांपैकी २१ अस्वच्छ आढळली नाहीत. तसेच वाईट स्थितीतही नव्हती.एक सार्वजनिक शौचालय अत्यंत चांगले आढळून आले. तर पाच सार्वजनिक शौचालये अत्यंत स्वच्छ दिसून आली. उर्वरित १७ शौचालयेही चांगल्या स्थितीत आढळून आली. त्याचबरोबर आधारवाडी, बारावे, टिटवाळा आणि टिटवाळा पश्चिमेतील मलशुद्धीकरण केंद्रांची पथकाने पाहणी करून तेथे योग्य प्रकारे प्रक्रिया केली जात आहे का, याची पाहणी केली. त्याचबरोबर प्रक्रियेनंतर खाडी व नदीत सोडण्यात येणाºया पाण्यात बीओटी व सीओडीचे प्रमाण किती आहे, याचीही तपासणी केली. वैयक्तिक शौचालये बांधण्यासाठी सरकारने दिलेल्या निधीचा योग्य प्रकारे विनियोग झाला आहे का, याचीही पाहणी केली.अशी केली पाहणीमहापालिका हद्दीत साडेचार लाख मालमत्ता आहेत. त्यात वैयक्तिक शौचालयांचीही पाहणी केली गेली.सांडपाण्याची विल्हेवाट लावली जात आहे की नाही. त्याचबरोबर कोणी उघड्यावर शौचास बसत नाही ना याचीही पाहणी पथकाने केली.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान