शहरं
Join us  
Trending Stories
1
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
2
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
4
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
5
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
6
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
7
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
8
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
9
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
10
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
11
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
12
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
13
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
14
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
15
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
16
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
17
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
18
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
19
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
20
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)

केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थितीत स्वच्छता अभियानाचा शुभारंभ

By नितीन पंडित | Updated: January 3, 2024 16:40 IST

कार्यक्रमाचा शुभारंभ बुधवारी भिवंडीतील अंजुर दिवे या गावात केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते स्वच्छता अभियान राबवून करण्यात आला.

भिवंडी : भारत सरकारच्या पंचायत राज मंत्रालय, ठाणे जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग यांच्या माध्यमातून रेवदंडा येथील कै.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सहकार्याने ठाणे जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायतीं मध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ बुधवारी भिवंडीतील अंजुर दिवे या आपल्या स्वतःच्या गावात केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते स्वच्छता अभियान राबवून करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाधिकारी अशोक शिंनगारे, मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदाल, उपविभागीय अधिकारी अमित सानप, तहसीलदार अधिक पाटील,गटविकास अधिकारी डॉ प्रदीप घोरपडे,माजी जिल्हा परिषद सदस्य देवेश पाटील यांसह अनेक शासकीय विभागातील अधिकारी कर्मचारी,ग्रामपंचायत पदाधिकारी,स्थानिक ग्रामस्थ शाळकरी विद्यार्थी सहभागी झाले होते.

ठाणे जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायत क्षेत्रात स्वच्छता अभियान राबवून ठाणे ग्रामीण स्वच्छ सुंदर करण्याचा संकल्प नववर्षानिमित्त केला असल्याचे सांगत केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी हा पथदर्शी कार्यक्रम यशस्वी करून त्यानंतर महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील २ लाख ६० ग्रामपंचायती व ६ लाख ४० हजार गावांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्याचा मानस आहे. ग्रामीण भागातील गाव पातळी पासून स्वच्छता अभियाना राबविल्यास खऱ्या अर्थाने देश विकसित होण्यास हातभार लागणार आहे अशी प्रतिक्रिया यावेळी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडीKapil Patilकपिल मोरेश्वर पाटील