शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण, भयंकर, भयावह! रशियाचा युक्रेनवर मोठा ड्रोन अटॅक; ४ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
2
"साताऱ्यातील आरोपीला गोळ्या घाला"; आरजी कर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांची मोठी मागणी
3
बाईक घसरली, रायडरचा मृत्यू, बसला आग... एक नव्हे दोन अपघात; कुर्नूलमध्ये नेमकं काय घडलं?
4
निवडणूक झाली की लगेच निकाल, तिन्हींची एकत्र मतमोजणी अशक्य; ईव्हीएम सांभाळून ठेवणे जिकिरीचे
5
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - २६ ऑक्टोबर २०२५; प्रत्येक कामात यश, अचानक धनलाभ होईल
6
"भाजपचे नेते काहीही बोलून जातात", बाहेरच्यांना आवरा, आम्ही शहर सांभाळतो : प्रताप सरनाईक
7
IND W vs BAN W Live Streaming : कुठं आणि कसा पाहाल भारत-बांगलादेश यांच्यातील सामना?
8
कर्जमाफी मागणाऱ्या शेतकऱ्यांना अजित पवारांनी दिला हिशेब, म्हणाले, "जरा सबुरीने घ्या..."
9
'मॅडम फिट प्रमाणपत्र द्या', पोलिसांचा सर्वत्र दबाव, पाच महिने 'ती' मागत होती न्याय; खासदार व पीएचाही उल्लेख
10
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
11
पुढील आठवडा पुन्हा पावसाचा; कोकण किनारपट्टीसह मराठवाडा, विदर्भाला इशारा
12
'तक्रार केल्याने दिला जास्त त्रास'; महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी पीएसआय बदने, बनकर अटकेत
13
पबमध्ये ओळख, कॉलवरून वाद; तरुणीला नेले फरफटत! बोरिवलीतील पबसमोरील थरारक घटना
14
१० ते १५ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; एसआयआरचा पहिला टप्पा पुढील आठवड्यात सुरू
15
धार्मिक द्वेषाचा अजेंडा राबवण्याचा डाव, सणातही समाजामध्ये द्वेष पसरविण्याचे काम : वर्षा गायकवाड
16
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
17
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
18
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
19
वादग्रस्त प्रतिभा टॉवरच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाचा स्थगितीस नकार, निर्णयाने दिलासा
20
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले

स्वा. सावरकरांना ‘भारतरत्न’ द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 00:50 IST

‘भारतरत्न’ या सर्वोच्च पुरस्काराने नेल्सन मंडेला यांना सन्मानित केले;

डोंबिवली :‘भारतरत्न’ या सर्वोच्च पुरस्काराने नेल्सन मंडेला यांना सन्मानित केले; मात्र देशासाठी, मातृभूमीसाठी आयुष्य वेचलेल्या स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांना मात्र सन्मानापासून वंचित ठेवण्यात आले. हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या मोदी सरकारने सावरकरांना मरणोत्तर भारतरत्न जाहीर करावे. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी त्यासाठी पाठपुरावा करावा. डोंबिवलीकरांसह असंख्य सावरकरप्रेमींची ती इच्छा आहे, असे मत पुण्याचे प्रख्यात व्याख्याते पार्थ बावस्कर यांनी व्यक्त केले.सावरकरांच्या १३६ व्या जयंतीनिमित्त राज्यमंत्री चव्हाण यांनी येथील सावरकर उद्यानामध्ये मंगळवारी व्याख्यान आणि सावरकर जीवनपट या विषयावर चित्रप्रदर्शनाचे आयोजन केले होते. त्यावेळी बावस्कर बोलत होते. युवकांनी जास्तीतजास्त सावरकर साहित्याचे वाचन करावे. मातृभूमी प्रेम, भारताला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी सावरकरांचे तसेच त्यांचे वडील बंधू, धाकटे बंधू आणि पूर्ण कुटुंबीयांनी दिलेली आहुती यासंदर्भात त्यांनी उपस्थितांना सांगितले. मातृभूमीला स्वातंत्र्य मिळावे आणि पुढील पिढीला गुलामगिरीमुक्त करण्यासाठी काळ्या पाण्याची शिक्षा, असंख्य वेदना सहन केल्याचे ते म्हणाले.अंदमान येथील स्वा. सावरकरांच्या ओळी काढून टाकण्यात आल्या आहेत. तेव्हापासून चव्हाण यांनी सावरकर उद्यानात त्या ओळी पुन्हा लागत नाहीत, तोपर्यंत अखंड ज्योत अखंड तेवत ठेवली आहे. आता पुन्हा मोदी सरकार आले आहे, ही ज्योत अखंड तेवत ठेवावी लागणार नाही, याची जबाबदारी चव्हाण हे घेतील आणि त्यासाठी येथील नागरिकांनीही पाठपुरावा करावा, असे आवाहन बावस्कर यांनी केले. त्यावर राज्यमंत्री चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रव्यवहार करणार असल्याचे सांगितले.यानिमित्ताने भरवण्यात आलेल्या सावरकर जीवनपट चित्रप्रदर्शनाला असंख्य डोंबिवलीकरांनी आवर्जून उपस्थिती लावली. त्यावेळी भाजपचे नगरसेवक संदीप पुराणिक, पक्षाचे जिल्हा सरचिटणीस शशिकांत कांबळे, सुरेश पुराणिक, संजीव बीडवाडकर, प्रभू कापसे आदींसह असंख्य सावरकरप्रेमी आवर्जून उपस्थितहोते.