शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
4
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
5
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
6
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
9
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
10
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
11
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
12
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
13
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
14
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
15
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
16
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
17
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
18
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
19
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
20
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं

संशयित आरोपी अरीब मजीद परतला कल्याणच्या घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2021 4:37 AM

कल्याण : सिरियातील इसिस या दहशतवादी संघटनेत सहभागी झाल्याचा आरोप असलेला अरीब मजीद (रा. कल्याण) या तरुणाला उच्च न्यायालयाने ...

कल्याण : सिरियातील इसिस या दहशतवादी संघटनेत सहभागी झाल्याचा आरोप असलेला अरीब मजीद (रा. कल्याण) या तरुणाला उच्च न्यायालयाने नुकताच सशर्त जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे न्यायालयीन कोठडीतून सहा वर्षे तीन महिन्यांनी त्याची सुटका झाली आहे. तो शुक्रवारी रात्री उशिरा त्याच्या कल्याणच्या घरी परतला आहे.

उच्च न्यायालयाने अरीब याची एक लाख रुपयांच्या जातमुचलक्याच्या वैयक्तिक जामिनावर सुटका केली आहे. मे २०१४ मध्ये कल्याणमधील चार तरुण बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी बाजारपेठ पोलिसात नोंदविली होती. या चौघांमध्ये इंजिनीअरिंगचा विद्यार्थी असलेला अरीब तसेच अमन तांडेल, सायम तानकी, फहाद शेख हे होते. काही दिवसांनी या तरुणांनी त्यांच्या कुटुंबीयांना एक मेसेज पाठविला होता. त्यामुळे ते ‘इसिस’मध्ये सहभागी झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली होती. मात्र, चौघांपैकी तिघांचा सुगावा लागलेला नाही.

अरीब हा दहशतवादी कारवायांमध्ये मारला गेल्याची माहिती सप्टेंबर २०१४ मध्ये पुढे आली होती. त्या वेळी त्याच्या नातेवाइकांनी मृत्यूची बातमी ऐकून मृत्यूपश्चात केले जाणारे नमाज पठण केले होते. मात्र, अरीब हा दहशतवादी कारवायांमध्ये मारला गेला नव्हता. नोव्हेंबर २०१४ मध्ये तो तुर्कस्तानमार्गे विमानाने प्रवास करून मुंबई विमानतळावर येत असताना त्याला अटक करण्यात आली. अरीबविरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणेने प्रतिबंधक कारवाया या दहशतवादविरोधी कायद्याखाली गुन्हा नोंदवला होता. २०१५ पासून अरीबने चार वेळा जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, तो फेटाळण्यात आला होता.

दिवसातून दोनदा पोलीस ठाण्यात लावावी लागणार हजेरी

- १७ मार्च २०२० ला राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या कोर्टाने अरीबला जामीन मंजूर केला होता. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने या जामीन अर्जाला आव्हान देत स्थगिती दिली होती. त्यानंतर तपास यंत्रणेच्या अपील अर्जावरील निर्णय न्यायालयाने राखून ठेवला होता.

न्यायालयाने दिलेली स्थगिती उठवत तपास यंत्रणेचा जामीन देण्याचा निर्णय योग्य असल्याचे म्हटल्याने अरीबला २३ फेब्रुवारी २०२१ ला सशर्त जामीन देण्यात आला.

- अरीबने त्याचा पासपोर्ट तपास यंत्रणांकडे जमा करावा. कल्याणमधील राहते घर सोडू नये. दोन महिने दिवसातून दोन वेळा कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्यात हजेरी लावावी तसेच आंतरराष्ट्रीय फोन कॉल घेऊ नयेत, या अटींवर त्याला जामीन देण्यात आला आहे.

-----------------------------