शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
3
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
4
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
5
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
6
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
7
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश
8
Navratri 2025: अष्टमी-नवमीला 'या' दिशेला दिवा लावा; अखंड दिवा लावण्याचे लाभ मिळतील 
9
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली
10
IND vs WI: सर्फराज खानला विंडिजविरूद्ध कसोटी संघात का घेतलं नाही? अखेर BCCI ने दिलं उत्तर
11
'लडाखमध्ये जे घडत आहे ते चिंताजनक, प्रत्येक देशभक्ताने लोकांना पाठिंबा दिला पाहिजे'; अरविंद केजरीवाल यांनी स्पष्टच सांगितले
12
"पुन्हा NDA चे सरकार आल्यास नीतीश कुमार नव्हे तर...!"; ओवेसींनी सांगितलं, कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री?
13
नवरात्र २०२५: ललिता सहस्रनामाचे नियमित करा पठण, देवी सदैव करेल पाठराखण; अपार लाभ-समृद्धी! 
14
ट्रम्पनी H-1B फीवरून ब्लॅकमेल केले, अमेरिकी कंपनीने भारतातच १२,००० नोकऱ्यांची घोषणा केली...
15
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
16
पुढच्या वर्षी ९४,००० पर्यंत जाणार Sensex; HSBC नं दृष्टीकोन बदलला, भारताचं रेटिंगही वाढवलं
17
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
18
बुद्धिबळाची 'राणी'! वडिलांची साथ, लेकीने रचला इतिहास; बिहारची पहिली महिला FIDE मास्टर
19
Tiger Attack: समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
20
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...

हवालदाराने वाचवला तरुणाचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2019 01:21 IST

वैजोला पुलावरील घटना : साईनाथ कराळे यांनी घेतली पाण्यात उडी

टिटवाळा : कायद्याचे रक्षक असलेल्या पोलिसांविषयी नेहमीच नागरिकांच्या मनात भीती असते. पण, याच पोलिसाच्या वर्दीआड माणूसही लपलेला असतो. याचा प्रत्यय मंगळवारी एका तरुणाला आला. सोनावळे-बापगाव या रस्त्यावर वैजोला गावाजवळील नाल्यावरील पुलावरून वाहणाऱ्या पाण्यातून दुचाकीसह वाहून जाणाºया राहुल पाटील या तरुणाला पडघा पोलीस ठाण्यांतर्गत येणाºया बापगाव दूरक्षेत्राचे पोलीस हवालदार साईनाथ कराळे यांनी जीवाची पर्वा न करता पाण्याच्या प्रवाहात उडी घेत वाचवले. यावेळी त्यांच्यासोबत पोलीस नाईक डी.आर. पाटीलही घटनास्थळी होते.

बापगावमधील जय मल्हारनगर येथे राहणारा राहुल हा तरु ण सोनावळे येथील एका गोडाउनमध्ये सिक्युरिटीचे काम करतो. ड्युटी संपवून तो सोनावळेमार्गे दुचाकीवरून मंगळवारी रात्री ९.३० वाजता घरी परतत असताना वैजोला येथील नाल्याच्या पुलावरून वाहणाºया पाण्याचा अंदाज त्याला आला नाही. मात्र, पाण्याचा प्रवाह वेगात असल्याने तो दुचाकीसह वाहून जाऊ लागला. त्यामुळे प्रसंगावधान राखत त्याने दुचाकी सोडून दिली आणि नाल्यालगत असलेल्या विजेच्या खांबाला पकडून राहिला. त्याचवेळी त्याने मोबाइलवरून पुणे येथील नातेवाइकांना फोन लावून सर्व प्रकार कळवला. त्यांनी तत्काळ ठाणे कंट्रोलला फोन करून या घटनेची माहिती दिली. ठाणे कंट्रोलवरून पडघा पोलीस ठाण्याला फोन केला. याबाबत ९.४५ वाजता बापगाव पोलीस चौकीवरील पोलीस नाईक पाटील यांना माहिती मिळताच त्यांनी कराळे यांना सोबत घेऊ न घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा राहुल हा प्रवाहापासून बचाव करण्यासाठी विजेच्या खांबाला पकडून असल्याचे बॅटरीच्या उजेडात पाटील आणि कराळे यांनी पाहिले. तेव्हा कराळे यांनी मागचापुढचा विचार न करता कपडे काढून नाल्याच्या प्रवाहात उडी घेतली आणि राहुल याला सुखरूप नाल्याच्या प्रवाहातून बाहेर काढले. तेव्हा राहुल घाबरलेल्या अवस्थेत होता. त्याला कराळे आणि पाटील यांनी धीर देत दुचाकीवरून घरी सोडले. दोन्ही पोलीस त्याच्यासाठी देवदूत ठरले. पोलिसांनी बजावलेले कर्तव्य आणि दाखवलेली माणुसकी सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरला आहे.तरुणाने वाचवले बालिकेचे प्राण : धोधो कोसळणाºया पावसामुळे आलेल्या पुरामुळे कल्याण ग्रामीण भागात शुक्रवारी रात्री हाहाकार उडाला होता. मोहनेमधील यादवनगरमध्ये एका घरात अडकलेल्या सहा महिन्यांच्या बालिकेचा जीव प्रशांत तरे या तरुणाने दाखवलेल्या धाडसामुळे वाचू शकला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्रशांत यांच्यासह अजय कोट, कैलाश कोट, नंदू पांडे यांनी ४० ते ५० लोकांना पाण्यातून सुखरूप बाहेर काढले.

टॅग्स :thaneठाणेfloodपूरMumbaiमुंबई