शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

शिवसेना उपजिल्हाप्रमुखाच्या आंदोलनाला पालकमंत्री, आमदाराचा पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2017 17:28 IST

भाईंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेत एकाच पदावर गेल्या १५ ते २० वर्षांपासून ठाण मांडणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची त्वरित बदली करून आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी बेकायदेशीर कारभाराला आळा घालावा, यासाठी ठाणे उपजिल्हाप्रमुख शंकर विरकर यांनी उदयापासून बेमुदत धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

राजू काळेभाईंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेत एकाच पदावर गेल्या १५ ते २० वर्षांपासून ठाण मांडणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची त्वरित बदली करून आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी बेकायदेशीर कारभाराला आळा घालावा, यासाठी ठाणे उपजिल्हाप्रमुख शंकर विरकर यांनी उदयापासून बेमुदत धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. त्याला पालकमंत्री एकनाथ शिंदे व आमदार प्रताप सरनाईक पाठिंबा दिल्याचे जाहीर करून सरनाईक यांनी त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची लेखी पत्राद्वारे मागणी आयुक्तांकडे केली आहे.पालिकेत विविध विभागांतील अनेक अधिकारी एकाच पदावर गेल्या १५ ते २० वर्षांपासून कार्यरत असल्याने ते बेकायदेशीर कारभाराला खतपाणी घालीत आहेत, असे अधिकारी सत्ताधारी भाजपाचे सल्लागार होऊन आर्थिक वाटमारी करून त्यांना खूश करीत आहेत. त्यामुळे अनेक प्रस्ताव प्रशासनाची मान्यता नसतानाही सत्ताधारी त्या अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने परस्पर महासभेत मांडून आपले आर्थिक गणित जुळवित आहेत. अशा बेकायदेशीर प्रकारात ते अधिकारी जवळच्या कंत्राटदारांशी साटेलोटे करून भ्रष्टाचार करीत असल्याचा आरोप करीत त्या अधिकाऱ्यांची इतर विभागासह पदावर बदली करण्यात यावी, अशी लेखी मागणी उपजिल्हाप्रमुखांनी आयुक्तांकडे केली होती.मात्र त्यावर कार्यवाही न केल्यास शुक्रवारपासून पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ बेमुदत धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. प्रशासनाकडून ठोस कार्यवाही न झाल्याने उपजिल्हाप्रमुखांनी आंदोलन छेडण्यावर शिक्कामोर्तब केल्याचे वृत्त लोकमतने १४ डिसेंबरच्या हॅलो ठाणे पुरवणीत प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत पालकमंत्री एकनाथ शिंदे व आमदार प्रताप सरनाईक यांनी पाठिंबा आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. यात प्रामुख्याने सेनेचे पालकमंत्री असतानाही भाजपाच्या वर्चस्वाखातर त्यांच्यावर पालिका आयुक्तांना ठोस कारवाईच्या आदेशाखेरीज पाठिंबा देण्याची वेळ आल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे राज्याचे शिलेदार बनलेल्या भाजपाने सेनेची नाकेबंदीच केल्याचे स्पष्ट झाले आहे. आ. सरनाईक यांनी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांना धाडलेल्या पत्रात सत्ताधारी भाजपाचे नेतृत्वाने पालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून बेकायदेशीर कारभाराचे सल्ले देत असून तेच अर्थपूर्ण संबंध असलेल्या कंत्राटदारांना त्या नेतृत्वाला भेटण्याचा सल्ला देऊन आपली पोळी भाजतात. जे ठराव महासभेत मंजूर झाले आहेत, ते प्रशासनाच्या मान्यतेशिवाय परस्पर रद्द करण्याचा ठराव बेकायदेशीरपणे बहुमताच्या जोरावर मंजूर केला जातो. परिवहन सेवेच्या कंत्राटापासून ते नाट्यगृहाच्या विकासालाच सत्ताधा-यांनी त्या अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने खो घालण्यात आला आहे. तसेच विरोधी पक्षनेतेपदाचा वादही त्याच अधिकाऱ्यांच्या सुपीक डोक्यातून आल्याने सत्ताधाऱ्यांच्या कारभार त्या अधिकाऱ्यांप्रमाणे भ्रष्ट झाल्याचा आरोप सरनाईक यांनी केला आहे.मीरा-भार्इंदर महापालिकेत बेकायदेशीर कारभाराची दखल सरकारला सध्याच्या चालू अधिवेशनातच घेण्यास भाग पाडू.- ठाणे जिल्हा, पालकमंत्री, एकनाथ शिंदेसत्ताधाऱ्यांच्या तुघलकी काराभाराला पालिकेतील भ्रष्ट अधिकारी जबाबदार असुन तेच बेकायदेशीर कारभाराला खतपाणी घालीत आहेत. अशा अधिका-यांचे थेट निलंबन करून आयुक्तांनी त्यांच्या कारभाराची चौकशी सक्षम अधिकाऱ्यामार्फत करावी.- प्रताप सरनाईक, आमदार

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे